शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

चालकाचा ताबा सुटल्याने कार नदीत कोसळून सांगलीचे तिघे ठार, रिसेप्शन संपवून परतताना दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 12:07 IST

सर्व मृत सांगलीचे; तीन गंभीर जखमी

जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : कृष्णा नदीवरील उदगाव-अंकली पुलावरून कार थेट नदीत कोसळून पती-पत्नीसह तरुणी जागीच ठार तर तिघेजण गंभीर झाले. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास लग्नाच्या रिसेप्शनचा कार्यक्रम आटोपून परतताना जुन्या पुलावर कार चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ४०), प्रेरणा प्रसाद खेडेकर (वय ३६, दोघे रा. मारुती रोड गावभाग, सांगली) व वैष्णवी संतोष नार्वेकर (वय २१, रा. आकाशवाणी केंद्राजवळ, सांगली) अशी मृतांची नावे असून, समरजित प्रसाद खेडेकर (वय ६, रा. मारुती रोड गावभाग, सांगली), वरद संतोष नार्वेकर (वय २१) व साक्षी संतोष नार्वेकर (वय ४०, दोघे रा. गंगाधरनगर, गुरुकृपानगर, सांगली) हे तिघेजण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे. दरम्यान, या अपघातप्रकरणी कारचालक मृत प्रसाद खेडेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतची तक्रार वरद नार्वेकर यांनी दिली.वरद नार्वेकर यांच्या नातेवाईकाचे लग्न बुधवारी कोल्हापूर येथे होते. संध्याकाळी सात वाजता हॉटेल पॅव्हेलियन याठिकाणी रिसेप्शन ठेवण्यात आले होते. हा कार्यक्रम आटोपून रात्री साडेअकराच्या सुमारास सर्वजण कारमधून सांगलीकडे परतत होते. कार चालविणारेे प्रसाद यांना झाेप येत असल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकी वाहन थेट उदगाव-अंकली येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून शंभर ते दीडशे फुट खाली कोसळले. या अपघातात प्रसाद खेडेकर, प्रेरणा खेडेकर, वैष्णवी नार्वेकर हे जागीच ठार झाले. तर समरजित खेडेकर, संतोष नार्वेकर, साक्षी नार्वेकर हे तिघेजण गंभीर जखमी झाले.पुलावरून कार खाली कोसळल्यामुळे वाहनाचा चक्काचूर झाला आहे. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सुरुवातीला सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी क्रेनच्या साहाय्याने चारचाकी वाहन बाहेर काढण्यात आले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक नितीश खाटमोडे-पाटील, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, पोलिस उपनिरीक्षक विशाल जगताप, पोलिस कर्मचारी विजय पोवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

एकाच ठिकाणी तीनवेळा अपघातसांगलीकडे जाणाऱ्या कृष्णा नदीवरील या जुन्या पुलाजवळ दोनवेळा संरक्षक पाईपला धडकून कार कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र अपघात झालेल्या ठिकाणी उपाययोजना राबविण्यात आलेल्या नाहीत. बुधवारी रात्री याच ठिकाणी पुन्हा कार कोसळून तिघांना जीव गमवावा लागला.दहा मिनिटांत येतो.. शेवटचा निरोपअंकली पुलावरील अपघात चालकाच्या डुलकीमुळे झाल्याचे जयसिंगपूर पोलिसांनी सांगितले. प्रसाद हे कुटुंबासह तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरला गेले होते. बुधवारी रात्री सांगलीला परतताना दोन गाड्या पाठोपाठ येत होत्या. एका गाडीत प्रसाद खेडेकर, पत्नी प्रेरणा, बहीण साक्षी, भाची वैष्णवी, भाचा वरद, मुलगा समरजित असे सहा जण होते. रात्रीचा प्रवास असल्याने दोन्ही गाड्यांतील नातलग मोबाइलवरून सतत परस्परांच्या संपर्कात होते. प्रसाद यांची गाडी पुढे, तर दुसरी गाडी मागे होती. दुसरी गाडी पथकर नाक्याजवळ आल्यानंतर त्यांचा शेवटचा संपर्क झाला. प्रसादने १० मिनिटांत येतो असे सांगितले. त्यानंतर दुसरी गाडी प्रसादला ओव्हरटेक करून पुलावरून सांगलीकडे गेली. ती सांगलीत पोहोचल्यावर पुन्हा एकदा फोन केला, मात्र प्रसाद किंवा गाडीतील अन्य कोणी फोनला प्रतिसाद देत नसल्याचे पाहून नातेवाईक परत मागे पुलावर आले. तेव्हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले.एकुलत्या मुलाचा मृत्यूप्रसाद खेडेकर यांचा सांगलीत गवळी गल्ली परिसरात दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. ते कुटुंबात एकुलते एक होते. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आहेत. आरवाडे हायस्कूलच्या पिछाडीस नरसोबा बोळात त्यांचे घर आहे. त्यांची बहीण साक्षी नार्वेकर या सांगलीतच कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ राहतात. त्यांचाही गणपती मंदिर परिसरात कारागिरीचा व्यवसाय आहे. अपघातानंतर सराफ कट्टा परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू