शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

चालकाचा ताबा सुटल्याने कार नदीत कोसळून सांगलीचे तिघे ठार, रिसेप्शन संपवून परतताना दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 12:07 IST

सर्व मृत सांगलीचे; तीन गंभीर जखमी

जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : कृष्णा नदीवरील उदगाव-अंकली पुलावरून कार थेट नदीत कोसळून पती-पत्नीसह तरुणी जागीच ठार तर तिघेजण गंभीर झाले. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास लग्नाच्या रिसेप्शनचा कार्यक्रम आटोपून परतताना जुन्या पुलावर कार चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ४०), प्रेरणा प्रसाद खेडेकर (वय ३६, दोघे रा. मारुती रोड गावभाग, सांगली) व वैष्णवी संतोष नार्वेकर (वय २१, रा. आकाशवाणी केंद्राजवळ, सांगली) अशी मृतांची नावे असून, समरजित प्रसाद खेडेकर (वय ६, रा. मारुती रोड गावभाग, सांगली), वरद संतोष नार्वेकर (वय २१) व साक्षी संतोष नार्वेकर (वय ४०, दोघे रा. गंगाधरनगर, गुरुकृपानगर, सांगली) हे तिघेजण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे. दरम्यान, या अपघातप्रकरणी कारचालक मृत प्रसाद खेडेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबतची तक्रार वरद नार्वेकर यांनी दिली.वरद नार्वेकर यांच्या नातेवाईकाचे लग्न बुधवारी कोल्हापूर येथे होते. संध्याकाळी सात वाजता हॉटेल पॅव्हेलियन याठिकाणी रिसेप्शन ठेवण्यात आले होते. हा कार्यक्रम आटोपून रात्री साडेअकराच्या सुमारास सर्वजण कारमधून सांगलीकडे परतत होते. कार चालविणारेे प्रसाद यांना झाेप येत असल्याने त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकी वाहन थेट उदगाव-अंकली येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून शंभर ते दीडशे फुट खाली कोसळले. या अपघातात प्रसाद खेडेकर, प्रेरणा खेडेकर, वैष्णवी नार्वेकर हे जागीच ठार झाले. तर समरजित खेडेकर, संतोष नार्वेकर, साक्षी नार्वेकर हे तिघेजण गंभीर जखमी झाले.पुलावरून कार खाली कोसळल्यामुळे वाहनाचा चक्काचूर झाला आहे. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सुरुवातीला सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी क्रेनच्या साहाय्याने चारचाकी वाहन बाहेर काढण्यात आले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक नितीश खाटमोडे-पाटील, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, पोलिस उपनिरीक्षक विशाल जगताप, पोलिस कर्मचारी विजय पोवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

एकाच ठिकाणी तीनवेळा अपघातसांगलीकडे जाणाऱ्या कृष्णा नदीवरील या जुन्या पुलाजवळ दोनवेळा संरक्षक पाईपला धडकून कार कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र अपघात झालेल्या ठिकाणी उपाययोजना राबविण्यात आलेल्या नाहीत. बुधवारी रात्री याच ठिकाणी पुन्हा कार कोसळून तिघांना जीव गमवावा लागला.दहा मिनिटांत येतो.. शेवटचा निरोपअंकली पुलावरील अपघात चालकाच्या डुलकीमुळे झाल्याचे जयसिंगपूर पोलिसांनी सांगितले. प्रसाद हे कुटुंबासह तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरला गेले होते. बुधवारी रात्री सांगलीला परतताना दोन गाड्या पाठोपाठ येत होत्या. एका गाडीत प्रसाद खेडेकर, पत्नी प्रेरणा, बहीण साक्षी, भाची वैष्णवी, भाचा वरद, मुलगा समरजित असे सहा जण होते. रात्रीचा प्रवास असल्याने दोन्ही गाड्यांतील नातलग मोबाइलवरून सतत परस्परांच्या संपर्कात होते. प्रसाद यांची गाडी पुढे, तर दुसरी गाडी मागे होती. दुसरी गाडी पथकर नाक्याजवळ आल्यानंतर त्यांचा शेवटचा संपर्क झाला. प्रसादने १० मिनिटांत येतो असे सांगितले. त्यानंतर दुसरी गाडी प्रसादला ओव्हरटेक करून पुलावरून सांगलीकडे गेली. ती सांगलीत पोहोचल्यावर पुन्हा एकदा फोन केला, मात्र प्रसाद किंवा गाडीतील अन्य कोणी फोनला प्रतिसाद देत नसल्याचे पाहून नातेवाईक परत मागे पुलावर आले. तेव्हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले.एकुलत्या मुलाचा मृत्यूप्रसाद खेडेकर यांचा सांगलीत गवळी गल्ली परिसरात दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. ते कुटुंबात एकुलते एक होते. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आहेत. आरवाडे हायस्कूलच्या पिछाडीस नरसोबा बोळात त्यांचे घर आहे. त्यांची बहीण साक्षी नार्वेकर या सांगलीतच कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ राहतात. त्यांचाही गणपती मंदिर परिसरात कारागिरीचा व्यवसाय आहे. अपघातानंतर सराफ कट्टा परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू