शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

विद्यार्थीपूरक योजना, शाळांना माहितीच नाय; राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेतून मिळते अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 18:26 IST

२१ ऑगस्ट २०२२ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार एखादा विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू पावला तरीही त्याला अनुदान मिळणार

समीर देशपांडेकोल्हापूर : पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याला अपघात झाला, शस्त्रक्रिया करावी लागली किंवा अपघाती, आजारपणाने मृत्यू झाला, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येते. राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून पालकांना ही मदत मिळते याची माहितीच अनेक शाळांना नसल्याचे दिसून आले आहे.अशा पद्धतीने नुकसानभरपाई किंवा सुरक्षा कवच देण्यासाठी निधी देण्याची राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना विमा कंपन्यांमार्फत २० ऑगस्ट २००३ पासून राबवण्यात येत होती. या विम्याचे हप्ते शासन भरत होते; परंतु विमा कंपन्या अनेक कारणे सांगून पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होत्या. त्यामुळे ११ जुलै २०११ रोजी सानुग्रह अनुदान योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर २७ ऑगस्ट २०१२ पासून ती नियमितपणे राबवण्यात येऊ लागली.मात्र, या योजनेमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झाला किंवा एखादा, दुसरा अवयव निकामी झाला तरच अनुदान मिळत होते. मात्र, २१ ऑगस्ट २०२२ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार एखादा विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू पावला तरीही त्याला अनुदान मिळणार आहे. अपघातानंतर शस्त्रक्रिया करावी लागली तरीही अनुदान मिळणार आहे. मात्र, या नव्या योजनेची फारशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना नसल्याचे दिसून आले आहे.याबाबत माध्यमिक, प्राथमिक आणि महापालिकेचे शिक्षणाधिकारी आणि तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अधिकची माहिती मिळू शकते.

अशांना मिळते अनुदान

  • विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू १ लाख ५० हजार रुपये
  • अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास म्हणजे २ अववय, दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी झाल्यास १ लाख रुपये
  • अपघातामुळे कायमचे अपंगत्व १ अवयव किंवा १ डोळा कायम निकामी झाल्यास ७५ हजार रुपये
  • अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा अधिकाधिक १ लाख रुपये
  • विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास १ लाख ५० हजार रुपये
  • विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास म्हणजे क्रीडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेचा धक्का, वीज अंगावर पडून अशांना प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा अधिकाधिक १ लाख रुपये या योजनेतून मिळू शकतात.

२१ जूननंतरच्या सर्वांना मिळू शकते अनुदान२१ जून २०२२ रोजी हा शासन आदेश काढण्यात आल्यामुळे त्यानंतर पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतीत असे प्रकार झाले असतील तर त्यांनी तातडीने याबाबत प्रस्ताव केल्यास त्यांनाही ही मदत मिळू शकते. पालक आणि शाळेने याबाबतचे प्रस्ताव तयार करावयाचे असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती या प्रस्तावांना अंतिम मान्यता देते. यावर जिल्हा शल्यचिकित्सकांची स्वाक्षरी आवश्यक असते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीAccidentअपघात