शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

शाहूंच्या पुरोगामी विचारांनेच कोल्हापूरसह देशाची प्रगती, शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 12:38 IST

पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी हा लढा शाहू महाराजांच्या काळापासून चालत आला आहे. चांगले ध्येय घेऊन काम सुरू केले की विरोध हा होतोच.

कोल्हापूर : पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी हा लढा शाहू महाराजांच्या काळापासून चालत आला आहे. चांगले ध्येय घेऊन काम सुरू केले की विरोध हा होतोच. शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन नवीन पिढीने शिक्षणाकडे लक्ष द्यावे, कुस्ती, कला-क्रीडा क्षेत्रात पुढे यावे. पुरोगामीत्वाच्या दिशेने चालत राहिलो तर कोल्हापूरच नव्हे तर देशाची प्रगती होईल, असा विश्वास शाहू छत्रपती यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. शाहू महाराजांच्या या कृतज्ञता पर्वाचा डंका नागपूरपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राजर्षी शाहू छत्रपती कृतज्ञता पर्वाला दिमाखात प्रारंभ झाला. भवानी मंडपात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. याअंतर्गत छत्रपती शाहू मिलसह जिल्ह्यात ठिकठिकाणी २२ मेपर्यंत शाहूंच्या विचारांचा जागर होणार आहे. केवळ ४९ वर्षांचे आयुष्य आणि २८ वर्षे कारकीर्द लाभलेल्या शाहू महाराजांनी आपल्या काळात कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगती व परिवर्तनासाठी डोंगराएवढे काम उभे केले.

त्यांच्या या कार्याचा वसा पुढच्या पिढीला देत महाराजांना जगभर पोहोचविण्याच्या उद्देशाने या कृतज्ञता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे, आमदार जयश्री जाधव, जयंत आसगावकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रकुलगुरू पी. एस. पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.

शाहू महाराज म्हणाले, शाहू मिलमधील स्मारकाचे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी सर्वांनी त्याकडे लक्ष द्यावे. या वर्षांत त्यांच्या कार्याचे स्मारक म्हणून याकडे आपण पाहिले पाहिजे. महाराष्ट्र शासन शाहूंचे विचार जागरण्याचे काम करत आहे. केंद्र शासनानेही काही प्रमाणात हे काम केले आहे. परंतु, त्यांना शाहू महाराज कळणे हेच मुळी कठीण आहे.

या सोहळ्यात शाहू छत्रपती यांनी खासदार संभाजीराजे यांचा चिमटा काढला. ते म्हणाले, आपण शाहूंचे कार्य देशात पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहात. त्यांच्या कार्याची महती अभ्यासपूर्ण मांडता आहात ही खूप चांगली गोष्ट आहे. पण हे जरा लवकर कळलं असतं तर बरं झालं असतं. उशिरा का होईना केंद्रातील नेत्यांना शाहू समजायला लागतील ही चांगली गोष्ट आहे. शाहू महाराजांच्या या कृतज्ञता पर्वाचा डंका पार नागपूरपर्यंत पोहोचला पाहिजे.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात उमटवलेल्या कार्यकर्तुत्वाचे प्रतिबिंब अनेक राज्यांत उमटले. शाहूंचा इतिहास लाभलेल्या कोल्हापुरात दैदिप्यमान भूगोल निर्माण करण्याची ताकद आहे. त्याची सुुरूवात शाहू कृतज्ञता पर्वाने करूया. याअंतर्गत दागिन्यांची जत्रा, कला-सांस्कृतिक उपक्रम, कृषी प्रदर्शन, शाहिरी, चप्पल महोत्सव, तालुकावार कुस्ती स्पर्धा, राधानगरी ट्रेक, मातीच्या कलाकृती असे अनेक उपक्रम घेतले जाणार आहेत.

खासदार संभाजीराजे म्हणाले, शाहू महाराज हे राजवाड्यात राहणारे, संवेदनशील लोकनेते होते. शोषित, अन्याय सहन करणाऱ्या जनतेची अवस्था बघून त्यांनी बहुजनांचे लढे उभारले. जे ज्या-ज्या ठिकाणी गेले तिथे शाहू कृतज्ञता पर्व झाले पाहिजे. शाहू महाराजांनी उभारलेल्या वास्तूंची दुरवस्था झाली आहे. त्या वास्तूंचा जीर्णोद्धार होणे ही त्यांना वाहिलेली खरी कृतज्ञता असेल.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रास्ताविकात महापुरुषांचे काम आणि वारसा सुरू राहणे हे त्यांच्या अनुयायांवर अवलंबून असते. आपण सगळे कोल्हापूरचा विकास करून शाहू महाराजांना आदरांजली वाहूया, असे सांगून शाहू कृतज्ञता पर्वाच्या आयोजनामागील उद्देश सांगितला. या विचार पर्वात कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. प्राचार्य महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले.

१०० व्याख्याने आणि १०० सेकंद

मंत्री पाटील म्हणाले, या पर्वांतर्गत ५ मे रोजी जिल्ह्यात एकाचवेळी १०० व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ मे रोजी शाहू मिल ते शाहू समाधीस्थळापर्यंत समता फेरी काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता जिल्ह्यात १०० सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांना आदरांजली वाहिली जाईल. यादिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्री येण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती