शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, पण भीती कायम; ‘राधानगरी’ ९० टक्के भरले, ८३ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 12:25 IST

नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरूच : आणखी चार दिवस ऑरेंज अलर्ट

कोल्हापूर : जिल्ह्यात काल, सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यात राधानगरी धरण ९० टक्के भरल्याने कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे खुले होणार असल्याने भीती कायम आहे. सुरक्षितता म्हणून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. आणखी चार दिवस जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून, पंचगंगेची पातळी ४०.२ फुटांपर्यंत पोहोचली आहे. तब्बल ८३ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.रविवारी रात्रभर व सोमवारी सकाळी पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केली. त्यानंतर दिवसभर उघडझाप राहिली. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. राधानगरी धरण ९० टक्के भरले आहे. या धरणातून वीजनिर्मितीसाठी १४०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर ‘वारणा’सह इतर छोट्या धरणातून कमीअधिक प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाण्यांना फूग आहे. सतर्कता म्हणून नदीकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. तब्बल ८३ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असली तरी काही गावांना पुराच्या पाण्यामुळे बेटाचे स्वरूप आले आहे. तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.कासारी नदीतून बैलगाडी वाहून गेलीकसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथे कासारी नदीच्या पुराच्या पाण्यात बैलगाडी वाहून केली. यामध्ये दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.चिखली, आंबेवाडीतील नागरिकांचे स्थलांतरपंचगंगेच्या पुराचा तडाखा बसणाऱ्या आंबेवाडी, प्रयाग चिखलीसह सर्वच नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर करणे सुरू आहे. पुराचे पाणी अद्याप गावात घुसले नसले तरी दक्षता म्हणून स्थानिक प्रशासनाने संभाव्य पूरबाधित कुटुंबांचे सक्तीने स्थलांतर सुरू केले आहे.

दुधगंगा धरण निम्मे भरले

दुधगंगा धरणातून यंदा ६ टीएमसी पाणी अधिक सोडल्याने हे धरण भरणार की नाही? याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने हे धरण निम्मे भरले आहे.जिल्ह्यातील ७१ मार्ग बंदजिल्ह्यातील १४ राज्य, २५ प्रमुख जिल्हा मार्ग, १३ इतर जिल्हा मार्ग, तर १९ ग्रामीण मार्ग असे ७१ मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद आहेत.

‘कुंभी’ ८० टक्के भरले

सावर्डे : कुंभी धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. सोमवारी दिवसभरात या परिसरात ८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने धरण कोणत्याही क्षणी भरू शकते. कुंभीमधून सध्या प्रतिसेकंद ४००, कोंदे धरणातून ९३६ घनफूट पाण्याचा विसर्ग कुंभी नदीत होत आहे. त्यामुळे पुराचे पाणी झपाट्याने वाढत असून, नदीकाठच्या नागिरकांनी दक्षता घेऊन स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी अजिंक्य पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरriverनदीWaterपाणी