शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, पण भीती कायम; ‘राधानगरी’ ९० टक्के भरले, ८३ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 12:25 IST

नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरूच : आणखी चार दिवस ऑरेंज अलर्ट

कोल्हापूर : जिल्ह्यात काल, सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यात राधानगरी धरण ९० टक्के भरल्याने कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे खुले होणार असल्याने भीती कायम आहे. सुरक्षितता म्हणून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. आणखी चार दिवस जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून, पंचगंगेची पातळी ४०.२ फुटांपर्यंत पोहोचली आहे. तब्बल ८३ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.रविवारी रात्रभर व सोमवारी सकाळी पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केली. त्यानंतर दिवसभर उघडझाप राहिली. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. राधानगरी धरण ९० टक्के भरले आहे. या धरणातून वीजनिर्मितीसाठी १४०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर ‘वारणा’सह इतर छोट्या धरणातून कमीअधिक प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाण्यांना फूग आहे. सतर्कता म्हणून नदीकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. तब्बल ८३ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असली तरी काही गावांना पुराच्या पाण्यामुळे बेटाचे स्वरूप आले आहे. तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.कासारी नदीतून बैलगाडी वाहून गेलीकसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथे कासारी नदीच्या पुराच्या पाण्यात बैलगाडी वाहून केली. यामध्ये दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.चिखली, आंबेवाडीतील नागरिकांचे स्थलांतरपंचगंगेच्या पुराचा तडाखा बसणाऱ्या आंबेवाडी, प्रयाग चिखलीसह सर्वच नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर करणे सुरू आहे. पुराचे पाणी अद्याप गावात घुसले नसले तरी दक्षता म्हणून स्थानिक प्रशासनाने संभाव्य पूरबाधित कुटुंबांचे सक्तीने स्थलांतर सुरू केले आहे.

दुधगंगा धरण निम्मे भरले

दुधगंगा धरणातून यंदा ६ टीएमसी पाणी अधिक सोडल्याने हे धरण भरणार की नाही? याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने हे धरण निम्मे भरले आहे.जिल्ह्यातील ७१ मार्ग बंदजिल्ह्यातील १४ राज्य, २५ प्रमुख जिल्हा मार्ग, १३ इतर जिल्हा मार्ग, तर १९ ग्रामीण मार्ग असे ७१ मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद आहेत.

‘कुंभी’ ८० टक्के भरले

सावर्डे : कुंभी धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. सोमवारी दिवसभरात या परिसरात ८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने धरण कोणत्याही क्षणी भरू शकते. कुंभीमधून सध्या प्रतिसेकंद ४००, कोंदे धरणातून ९३६ घनफूट पाण्याचा विसर्ग कुंभी नदीत होत आहे. त्यामुळे पुराचे पाणी झपाट्याने वाढत असून, नदीकाठच्या नागिरकांनी दक्षता घेऊन स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी अजिंक्य पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरriverनदीWaterपाणी