शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पर्यटनाचा वाजवताहेत ढोल, वनखात्याचा नवा झोल; केवळ महसूल गोळा करण्यावर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 11:37 AM

वास्तविक, वन्यजीवांचे संवर्धन करणे ही वनविभागाची मुख्य जबाबदारी आहे. निसर्ग आणि वनपर्यटनाच्या माध्यमातून जनतेचे, पर्यटकांचे मनोरंजन करणे, त्यांची करमणूक करणे हे काम वन्यजीव संरक्षण संवर्धनाचे सर्व कायदे धाब्यावर बसवून वनविभाग करू लागले आहे.

संदीप आडनाईककोल्हापूर : काजवा महोत्सवाबरोबरच वनविभागाने राधानगरी आणि दाजीपूर परिसरात जंगल सफारी सुरू केली आहे. यातूनही वन विभाग महसूल जमा करीत आहे. अभयारण्य आणि राखीव क्षेत्रात तसेच व्याघ्र कॉरिडॉरमध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी मुभा दिल्यामुळे वन्यप्राण्यांच्या संवर्धनाऐवजी वनपर्यटनालावनविभाग चालना देत आहे.

वनविभागाने सातारा जिल्ह्यातील कास पठारावर, सागरेश्वर आणि राधानगरी, दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात जंगल सफारी, मेळघाट, ताडोबा या ठिकाणीही वनविभागाने रात्रसफारी सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक, वन्यजीवांचे संवर्धन करणे ही वनविभागाची मुख्य जबाबदारी आहे. निसर्ग आणि वनपर्यटनाच्या माध्यमातून जनतेचे, पर्यटकांचे मनोरंजन करणे, त्यांची करमणूक करणे हे काम वन्यजीव संरक्षण संवर्धनाचे सर्व कायदे धाब्यावर बसवून वनविभाग करू लागले आहे. इतकेच नव्हेतर, गाड्या खरेदी करून पर्यटकांकडून प्रतिव्यक्ती ठरावीक रक्कम घेतली जात आहे. वनखात्याचे विश्रामगृह उपलब्ध करून दिले जात आहे.

इतर राज्यांत रात्री प्रवेशाला बंदी

  • वनक्षेत्र परिसरात रात्री निशाचर व वन्यप्राण्यांचा वावर असतो. हे वन्यप्राणी रात्री पाण्यासाठी, शिकारीसाठी आणि अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. रात्री वन्य प्राण्यांच्या अधिवासात माणसांनी प्रवेश केल्यास त्यांच्या नैसर्गिक दिनक्रमात व्यत्यय निर्माण होतो. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासात रात्रसफारी व जंगल सफारी केवळ पर्यटनासाठी सुरू करणे धोकादायक आहे. हे वन्यप्राणी माणसांवर हल्लाही करू शकतात.
  • कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यातील वनक्षेत्रात रात्री माणसांच्या प्रवेशाला पूर्ण बंदी आहे. महाराष्ट्रात मात्र अशी बंदी नसल्याने रात्रीही वनक्षेत्रात माणसांचा हस्तक्षेप सुरू असतो. यावर वनविभागाचे प्रभावी नियंत्रण नाही.

व्यापारी पद्धतीने, कर्तव्ये बाजूला ठेवून, जबाबदारी टाळून वनविभाग वनपर्यटनाला चालना देत आहे. वास्तविक, निसर्गपूरक पद्धतीने वनपर्यटनाला चालना दिली पाहिजे. इतर राज्यांतील वनपर्यटनाची तुलना करता आपल्याकडे सुरू असलेले वनपर्यटन पूर्णत: निसर्गपूरक नाही. या पर्यटनात अनेक चुका व त्रुटी आहेत. यात सुधारणा करणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही सुधारणा व बदल न करता रात्र सफारी, जंगल सफारीसारखे निसर्गविरोधी व वन्यजीव संरक्षण व संवर्धनविरोधी उपक्रम सुरू केले आहेत. - डॉ. मधुकर बाचुळकर, वनस्पती शास्त्रज्ञ.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटनforest departmentवनविभाग