शहरं
Join us  
Trending Stories
1
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
2
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
3
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
4
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
5
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
6
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
7
Farming: ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मिळणार ५० हजार
8
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
9
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
10
Bigg Boss 19: शिव ठाकरेचा 'महाराष्ट्रीयन भाऊ'ला फूल सपोर्ट! प्रणित मोरेसाठी केली पोस्ट, म्हणाला- "भाऊ..."
11
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
12
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
13
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
14
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
16
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
17
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
18
Nashik: मालेगावी आणखी साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त, वर्ध्यातून आलेल्या दोघांना अटक
19
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
20
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
Daily Top 2Weekly Top 5

हवाई अंतर कमी करणे कारखानदारीच्या मुळावर, नेमका फायदा काय हे स्पष्ट होण्याची गरज 

By विश्वास पाटील | Updated: June 17, 2023 13:41 IST

शेतकरी संघटनांतील वर्चस्वाच्या राजकारणात साखर कारखानदारीचे वांगे होईल, असा आग्रह धरणे चुकीचे आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची २५ किलोमीटरची अट शिथिल करण्याची मागणी साखर कारखानदारीच्या मुळावर उठणारी आहे. दोन्ही काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असलेल्या साखर कारखानदारीत आता निम्मे कारखाने भाजपचे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनच या निर्णयास विरोध होऊ शकतो. शेतकरी संघटनांतील वर्चस्वाच्या राजकारणात साखर कारखानदारीचे वांगे होईल, असा आग्रह धरणे चुकीचे आहे.रयत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार समिती नेमण्याची घोषणा करून टाकली आहे. परंतु, सध्याच्या महाराष्ट्रातील साखर हंगामाचा विचार केल्यास कितीही ऊस झाला तरी कधीही गाळपाविना ऊस शिल्लक राहिला अशी स्थिती उदभवलेली नाही. मागील दहा वर्षांत फक्त २०२१-२२ च्या हंगामातच सरासरी गाळप १७३ दिवस झाले आहे. सोलापूर, अहमदनगर व मराठवाड्यात चांगला पाऊस झाला की त्यावर्षी गाळप दोनशे टक्के वाढते व पावसाने ओढ दिल्यास ते पन्नास टक्क्यांवर येते. तसे या हंगामात झाल्याने गाळप वाढले. तो अपवाद वगळता कधीच १५० पेक्षा जास्त गाळप झालेले नाही. सरासरी १६० दिवस कारखाना सुरू राहिला तरच तो आर्थिकदृष्ट्या परवडतो. अन्यथा तब्बल २७५ दिवस कायम कामगारांचा पगाराचा बोजा सहन करावा लागतो. हंगाम कितीही दिवस चालला तरी त्याच्या मेंटेनन्ससाठी येणारा खर्च तेवढाच असतो. प्रत्येक जिल्ह्यातील दोन-तीन कारखाने बंद असूनही एकही टन ऊस शिल्लक राहत नाही. नजिकच्या काळात कोणत्याच जिल्ह्यात नव्या सिंचन योजना होणार नसल्याने ऊस क्षेत्र वाढणार आहे, अशीही स्थिती नाही. उसाची पुरेशी उपलब्धतता नसताना मग नुसतेच कारखाने वाढवण्यात मागणी करणाऱ्यांचा व शासनाचाही काय फायदा आहे हे स्पष्ट होण्याची गरज आहे.

मागील हंगामातील सरासरी गाळप दिवसकोल्हापूर : १२४, पुणे : १३२, सोलापूर : ११८, अहमदनगर : १२१, औरंगाबाद : १२४, नांदेड : ११७, अमरावती -९६ आणि नागपूर-१०० :

महाराष्ट्रातील साखर उद्योगाची सद्य:स्थितीसहकारी साखर कारखाने - १०६खासगी कारखाने - १०४प्रतिदिन गाळप क्षमता : ८ लाख ८२ हजार ५५०.एकूण ऊस गाळप : १० कोटी ५२ लाखसाखर उत्पादन : १ कोटी ५३ लाख टनसरासरी गाळप दिवस : १२१

हवाई अंतराची अट शिथिल करण्याची मागणी साखर कारखानदारीस मारक आहे. एकेकाळी 180 दिवस चालणारा साखर हंगाम आता कसा बसा 100 दिवसावर आला आहे.. अनेक कारखाने गाळप क्षमता वाढवत आहेत. सहकारी साखर कारखानदारी नेहमीच स्पर्धात्मक राहिली आहे. त्यामुळे आत्ता हवाई अंतर कमी करून कारखाने वाढवल्यास चांगले चाललेले कारखाने ऊसा अभावी अडचणीत येतील. - समरजीत घाटगे, अध्यक्ष, शाहू साखर कारखाना, कागल

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने