शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

हवाई अंतर कमी करणे कारखानदारीच्या मुळावर, नेमका फायदा काय हे स्पष्ट होण्याची गरज 

By विश्वास पाटील | Updated: June 17, 2023 13:41 IST

शेतकरी संघटनांतील वर्चस्वाच्या राजकारणात साखर कारखानदारीचे वांगे होईल, असा आग्रह धरणे चुकीचे आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची २५ किलोमीटरची अट शिथिल करण्याची मागणी साखर कारखानदारीच्या मुळावर उठणारी आहे. दोन्ही काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असलेल्या साखर कारखानदारीत आता निम्मे कारखाने भाजपचे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनच या निर्णयास विरोध होऊ शकतो. शेतकरी संघटनांतील वर्चस्वाच्या राजकारणात साखर कारखानदारीचे वांगे होईल, असा आग्रह धरणे चुकीचे आहे.रयत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार समिती नेमण्याची घोषणा करून टाकली आहे. परंतु, सध्याच्या महाराष्ट्रातील साखर हंगामाचा विचार केल्यास कितीही ऊस झाला तरी कधीही गाळपाविना ऊस शिल्लक राहिला अशी स्थिती उदभवलेली नाही. मागील दहा वर्षांत फक्त २०२१-२२ च्या हंगामातच सरासरी गाळप १७३ दिवस झाले आहे. सोलापूर, अहमदनगर व मराठवाड्यात चांगला पाऊस झाला की त्यावर्षी गाळप दोनशे टक्के वाढते व पावसाने ओढ दिल्यास ते पन्नास टक्क्यांवर येते. तसे या हंगामात झाल्याने गाळप वाढले. तो अपवाद वगळता कधीच १५० पेक्षा जास्त गाळप झालेले नाही. सरासरी १६० दिवस कारखाना सुरू राहिला तरच तो आर्थिकदृष्ट्या परवडतो. अन्यथा तब्बल २७५ दिवस कायम कामगारांचा पगाराचा बोजा सहन करावा लागतो. हंगाम कितीही दिवस चालला तरी त्याच्या मेंटेनन्ससाठी येणारा खर्च तेवढाच असतो. प्रत्येक जिल्ह्यातील दोन-तीन कारखाने बंद असूनही एकही टन ऊस शिल्लक राहत नाही. नजिकच्या काळात कोणत्याच जिल्ह्यात नव्या सिंचन योजना होणार नसल्याने ऊस क्षेत्र वाढणार आहे, अशीही स्थिती नाही. उसाची पुरेशी उपलब्धतता नसताना मग नुसतेच कारखाने वाढवण्यात मागणी करणाऱ्यांचा व शासनाचाही काय फायदा आहे हे स्पष्ट होण्याची गरज आहे.

मागील हंगामातील सरासरी गाळप दिवसकोल्हापूर : १२४, पुणे : १३२, सोलापूर : ११८, अहमदनगर : १२१, औरंगाबाद : १२४, नांदेड : ११७, अमरावती -९६ आणि नागपूर-१०० :

महाराष्ट्रातील साखर उद्योगाची सद्य:स्थितीसहकारी साखर कारखाने - १०६खासगी कारखाने - १०४प्रतिदिन गाळप क्षमता : ८ लाख ८२ हजार ५५०.एकूण ऊस गाळप : १० कोटी ५२ लाखसाखर उत्पादन : १ कोटी ५३ लाख टनसरासरी गाळप दिवस : १२१

हवाई अंतराची अट शिथिल करण्याची मागणी साखर कारखानदारीस मारक आहे. एकेकाळी 180 दिवस चालणारा साखर हंगाम आता कसा बसा 100 दिवसावर आला आहे.. अनेक कारखाने गाळप क्षमता वाढवत आहेत. सहकारी साखर कारखानदारी नेहमीच स्पर्धात्मक राहिली आहे. त्यामुळे आत्ता हवाई अंतर कमी करून कारखाने वाढवल्यास चांगले चाललेले कारखाने ऊसा अभावी अडचणीत येतील. - समरजीत घाटगे, अध्यक्ष, शाहू साखर कारखाना, कागल

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने