शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

हवाई अंतर कमी करणे कारखानदारीच्या मुळावर, नेमका फायदा काय हे स्पष्ट होण्याची गरज 

By विश्वास पाटील | Updated: June 17, 2023 13:41 IST

शेतकरी संघटनांतील वर्चस्वाच्या राजकारणात साखर कारखानदारीचे वांगे होईल, असा आग्रह धरणे चुकीचे आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची २५ किलोमीटरची अट शिथिल करण्याची मागणी साखर कारखानदारीच्या मुळावर उठणारी आहे. दोन्ही काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असलेल्या साखर कारखानदारीत आता निम्मे कारखाने भाजपचे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनच या निर्णयास विरोध होऊ शकतो. शेतकरी संघटनांतील वर्चस्वाच्या राजकारणात साखर कारखानदारीचे वांगे होईल, असा आग्रह धरणे चुकीचे आहे.रयत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार समिती नेमण्याची घोषणा करून टाकली आहे. परंतु, सध्याच्या महाराष्ट्रातील साखर हंगामाचा विचार केल्यास कितीही ऊस झाला तरी कधीही गाळपाविना ऊस शिल्लक राहिला अशी स्थिती उदभवलेली नाही. मागील दहा वर्षांत फक्त २०२१-२२ च्या हंगामातच सरासरी गाळप १७३ दिवस झाले आहे. सोलापूर, अहमदनगर व मराठवाड्यात चांगला पाऊस झाला की त्यावर्षी गाळप दोनशे टक्के वाढते व पावसाने ओढ दिल्यास ते पन्नास टक्क्यांवर येते. तसे या हंगामात झाल्याने गाळप वाढले. तो अपवाद वगळता कधीच १५० पेक्षा जास्त गाळप झालेले नाही. सरासरी १६० दिवस कारखाना सुरू राहिला तरच तो आर्थिकदृष्ट्या परवडतो. अन्यथा तब्बल २७५ दिवस कायम कामगारांचा पगाराचा बोजा सहन करावा लागतो. हंगाम कितीही दिवस चालला तरी त्याच्या मेंटेनन्ससाठी येणारा खर्च तेवढाच असतो. प्रत्येक जिल्ह्यातील दोन-तीन कारखाने बंद असूनही एकही टन ऊस शिल्लक राहत नाही. नजिकच्या काळात कोणत्याच जिल्ह्यात नव्या सिंचन योजना होणार नसल्याने ऊस क्षेत्र वाढणार आहे, अशीही स्थिती नाही. उसाची पुरेशी उपलब्धतता नसताना मग नुसतेच कारखाने वाढवण्यात मागणी करणाऱ्यांचा व शासनाचाही काय फायदा आहे हे स्पष्ट होण्याची गरज आहे.

मागील हंगामातील सरासरी गाळप दिवसकोल्हापूर : १२४, पुणे : १३२, सोलापूर : ११८, अहमदनगर : १२१, औरंगाबाद : १२४, नांदेड : ११७, अमरावती -९६ आणि नागपूर-१०० :

महाराष्ट्रातील साखर उद्योगाची सद्य:स्थितीसहकारी साखर कारखाने - १०६खासगी कारखाने - १०४प्रतिदिन गाळप क्षमता : ८ लाख ८२ हजार ५५०.एकूण ऊस गाळप : १० कोटी ५२ लाखसाखर उत्पादन : १ कोटी ५३ लाख टनसरासरी गाळप दिवस : १२१

हवाई अंतराची अट शिथिल करण्याची मागणी साखर कारखानदारीस मारक आहे. एकेकाळी 180 दिवस चालणारा साखर हंगाम आता कसा बसा 100 दिवसावर आला आहे.. अनेक कारखाने गाळप क्षमता वाढवत आहेत. सहकारी साखर कारखानदारी नेहमीच स्पर्धात्मक राहिली आहे. त्यामुळे आत्ता हवाई अंतर कमी करून कारखाने वाढवल्यास चांगले चाललेले कारखाने ऊसा अभावी अडचणीत येतील. - समरजीत घाटगे, अध्यक्ष, शाहू साखर कारखाना, कागल

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने