शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

शेतकरी संघाचे संचालक मंडळ बरखास्त करा : वसंतराव मोहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 13:08 IST

शेतकरी सहकारी संघाचे संचालक मंडळ अकार्यक्षम असल्याने रोज एक अपहाराचे प्रकरण उघड होत आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढल्याने संघ आर्थिक अरिष्टात सापडल्याने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देशेतकरी संघाचे संचालक मंडळ बरखास्त करा : वसंतराव मोहिते शिष्टमंडळाने केली जिल्हा उपनिबंधकांकडे मागणी

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे संचालक मंडळ अकार्यक्षम असल्याने रोज एक अपहाराचे प्रकरण उघड होत आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढल्याने संघ आर्थिक अरिष्टात सापडल्याने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे केली.गेल्या वर्षभरात शेतकरी संघाच्या सात शाखांत अपहाराच्या घटना घडल्या आहेत. अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई न करता मिटवामिटवी केल्याने अपहार बोकाळल्याचे वसंतराव मोहिते यांनी निदर्शनास आणून दिले. संघावर एक रुपयांचे कर्ज नव्हते, पण या मंडळींनी ८ ते १० कोटींचे कर्ज केले आहे. संचालकच संघाच्या धोरणांची पायमल्ली करत असून लाखो रुपयांचा उधारीवर मालाची उचल केली आहे.

संघाच्या मोक्याच्या जागा आपल्या मर्जीप्रमाणे कोणतीही जाहिरात न देता भाड्याने दिल्या आहेत, त्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे. एकूणच संघाचा कारभार चिंताजनक असून संस्थेच्या हिताला घातक आहे. सततच्या अपहाराच्या प्रकारामुळे अकार्यक्षम संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी सभासदांमधून होत आहे.

संस्थेचे हित आणि सभासदांच्या मागणीचा विचार करून संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासकांची नियुक्ती करावी. त्याचबरोबर गेल्या चार वर्षांत केलेल्या कारभाराची सखोल चौकशी करून संघाचे झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करून घ्यावे, अशी मागणी वसंतराव मोहिते यांनी केली.यावर, तक्रारीनुसार संघाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी अ‍ॅड. अशोकराव साळोखे, माजी संचालक सुरेश देसाई, प्रभातराव माने (भादोले), वसंत पाटील (वडणगे), संघाचे माजी कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते, विजय पोळ आदी उपस्थित होते.सभासदांबाबत २५ नोव्हेंबरला सुनावणीशेतकरी संघाचे २३ हजार जुने सभासद विद्यमान संचालक मंडळाने कमी केले आहेत. विरोधातील याचिकेवर बुधवारी सुनावणी होऊन अंतिम सुनावणी २५ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुरेश देसाई यांचे सभासदत्वही रद्द केले आहे, त्यास त्यांनी आव्हान दिले असून त्याची सुनावणीही यावेळी होणार आहे.परवानगीशिवाय नोकरभरतीपरवानगीशिवाय नोकरभरती करू नये, असे स्पष्ट आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले असताना तो धुडकावत भरती केल्याचे मोहिते यांनी निदर्शनास आणून दिले.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर