शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

शिक्षक राजकारणात गुंतले अन् विद्यार्थी परीक्षेला मुकले, कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडेत घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 12:44 IST

विक्रम पाटील   करंजफेण : घुंगूर  (ता.शाहुवाडी) येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे १८ विद्यार्थी बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय एन ...

विक्रम पाटील करंजफेण : घुंगूर  (ता.शाहुवाडी) येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे १८ विद्यार्थी बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय एन . एम. एम. एस. परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले. मात्र त्यांचे परीक्षा केंद्र कोतोली ( ता.पन्हाळा ) येथे असल्याने त्यांना या केंद्रात परीक्षा देता आली नाही. त्यामुळे १८ विद्यार्थ्यांचे वर्षेभराचे कष्ट वाया जाऊन सारथीची शिष्यवृत्ती हातून गेली. घुंगूर  हायस्कूलमधील एका कर्मचार्‍यांची पत्नी थेट सरपंचपदाच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरली होती. त्यामुळे येथील मुख्याध्यापकासह अन्य शिक्षक कर्मचारी प्रचारात गुंतले असल्याने विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रिका देखील पहायला त्यांना वेळ नसल्याचे सांगत पालकांनी याप्रकाराबाबत संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करून संबंधितावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. बांबवडे येथील केंद्रावर बांबवडे, सोनुलें, पिशवी, शित्तुरतर्फे मलकापूर या केंद्रातील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. घुंगुरच्या विद्यालयाने सोईनुसार कोतोली केंद्राची निवड केली होती. पंधरा दिवसांपूर्वी प्रवेशपत्रिका ऑनलाईन आल्याचे केंद्र संचालकांनी संबंधित मुख्याध्यापकांना देखील कळविले होते. परीक्षेची १० वाजून २० मिनिटाची वेळ असताना आज मुख्याध्यापक किंवा संबंधित शिक्षक १८ परीक्षार्थींना बांबवडे परीक्षा केंद्रावर १० वाजून २५ मिनिटांनी घेऊन आले. त्यांना कोतोली केंद्रावर जायचे होते मात्र तेथे न जाता चुकीच्या केंद्रावर पाच मिनिटे उशिरा घेऊन आले होते. १५ दिवसांपूर्वी ऑनलाईन प्रवेशपत्र दिले असतानाही मुख्याध्यापक किंवा संबंधित शिक्षकांनी व विद्यार्थी यापैकी कोणीच न पाहिल्याने हा गोंधळ झाला.केंद्रावर अतिरिक्त पेपर दिलेले असतात, पण नियम, अटी पूर्ण केल्याशिवाय त्या पेपरचे सील काढता येत नाही. विद्यार्थी चुकीच्या परीक्षा केंद्रावर उशिरा आल्याने त्यांना अतिरिक्त पेपर देता येत नाही. शिक्षकांनी काळजीपूर्वकप्रवेशपत्रिका न पाहिल्याने हा प्रकार घडला असल्याचे पं.स.शिक्षणाधिकारी जयश्री जाधव यांनी सांगितले.घुंगूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांशी संपर्क केला असता वर्गशिक्षकांना सदर विभागाचे काम सोपवले होते. दिवसभरात त्यांच्याशी संपर्क झाला नाही. शिक्षकांशी संपर्क करून विद्यार्थी, पालकांशी चर्चा करतो असे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीexamपरीक्षाSchoolशाळाTeacherशिक्षकgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक