शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

शिक्षक राजकारणात गुंतले अन् विद्यार्थी परीक्षेला मुकले, कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडेत घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 12:44 IST

विक्रम पाटील   करंजफेण : घुंगूर  (ता.शाहुवाडी) येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे १८ विद्यार्थी बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय एन ...

विक्रम पाटील करंजफेण : घुंगूर  (ता.शाहुवाडी) येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे १८ विद्यार्थी बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय एन . एम. एम. एस. परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले. मात्र त्यांचे परीक्षा केंद्र कोतोली ( ता.पन्हाळा ) येथे असल्याने त्यांना या केंद्रात परीक्षा देता आली नाही. त्यामुळे १८ विद्यार्थ्यांचे वर्षेभराचे कष्ट वाया जाऊन सारथीची शिष्यवृत्ती हातून गेली. घुंगूर  हायस्कूलमधील एका कर्मचार्‍यांची पत्नी थेट सरपंचपदाच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरली होती. त्यामुळे येथील मुख्याध्यापकासह अन्य शिक्षक कर्मचारी प्रचारात गुंतले असल्याने विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रिका देखील पहायला त्यांना वेळ नसल्याचे सांगत पालकांनी याप्रकाराबाबत संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करून संबंधितावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. बांबवडे येथील केंद्रावर बांबवडे, सोनुलें, पिशवी, शित्तुरतर्फे मलकापूर या केंद्रातील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. घुंगुरच्या विद्यालयाने सोईनुसार कोतोली केंद्राची निवड केली होती. पंधरा दिवसांपूर्वी प्रवेशपत्रिका ऑनलाईन आल्याचे केंद्र संचालकांनी संबंधित मुख्याध्यापकांना देखील कळविले होते. परीक्षेची १० वाजून २० मिनिटाची वेळ असताना आज मुख्याध्यापक किंवा संबंधित शिक्षक १८ परीक्षार्थींना बांबवडे परीक्षा केंद्रावर १० वाजून २५ मिनिटांनी घेऊन आले. त्यांना कोतोली केंद्रावर जायचे होते मात्र तेथे न जाता चुकीच्या केंद्रावर पाच मिनिटे उशिरा घेऊन आले होते. १५ दिवसांपूर्वी ऑनलाईन प्रवेशपत्र दिले असतानाही मुख्याध्यापक किंवा संबंधित शिक्षकांनी व विद्यार्थी यापैकी कोणीच न पाहिल्याने हा गोंधळ झाला.केंद्रावर अतिरिक्त पेपर दिलेले असतात, पण नियम, अटी पूर्ण केल्याशिवाय त्या पेपरचे सील काढता येत नाही. विद्यार्थी चुकीच्या परीक्षा केंद्रावर उशिरा आल्याने त्यांना अतिरिक्त पेपर देता येत नाही. शिक्षकांनी काळजीपूर्वकप्रवेशपत्रिका न पाहिल्याने हा प्रकार घडला असल्याचे पं.स.शिक्षणाधिकारी जयश्री जाधव यांनी सांगितले.घुंगूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांशी संपर्क केला असता वर्गशिक्षकांना सदर विभागाचे काम सोपवले होते. दिवसभरात त्यांच्याशी संपर्क झाला नाही. शिक्षकांशी संपर्क करून विद्यार्थी, पालकांशी चर्चा करतो असे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीexamपरीक्षाSchoolशाळाTeacherशिक्षकgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक