शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नवे पारगावच्या महावितरण कार्यालयावर स्वाभिमानीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : कोरोना काळातील वीज बिले भरली नाहीत म्हणून वीज कनेक्शन तोडल्यास महावितरण विरुद्ध तीव्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : कोरोना काळातील वीज बिले भरली नाहीत म्हणून वीज कनेक्शन तोडल्यास महावितरण विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी दिला. शिष्टमंडळाने नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील शाखा अभियंता श्रुती वैद्य यांना मागण्यांचे निवेदन दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीज बिलांची होळी केली.

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर मोर्चा काढून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या लाॅकडाऊन काळातील लोकांना रोजगार नसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले. लाॅकडाऊन काळातील वीज बिले माफ करून उर्वरित काळातील वीज बिले टप्प्याने भरून घ्यावीत, वीज कनेक्शन तोडू नयेत, तोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊन स्वाभिमानीकडून तत्काळ तोडलेली कनेक्शन्स जोडण्यात येतील, असा इशारा दिला.

यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, विभाग प्रमुख संपतराव पवार, शिवाजी आंबेकर, जावेद मुल्ला, नितीन कांबळे, संपत रूपणे, अक्षय कांबळे, अरुण पाटील, संजय रूपणे, पांडुरंग कुंभार, नामदेव पाटील, कृष्णात मोहिते, रघुनाथ भोसले, आदी उपस्थित होते.

१८ पारगाव स्वाभिमानी

फोटो ओळी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील महावितरण शाखा अभियंता श्रुती वैद्य यांना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे व कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.