शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘स्वाभिमानी’ची तीन हजारांची मागणी!

By admin | Updated: October 25, 2016 01:09 IST

आज ऊस परिषद : पहिल्या उचलीसाठी मागणीचा ठराव होण्याची शक्यता

कोल्हापूर / जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १५वी ऊस परिषद आज, मंगळवारी जयसिंगपूर येथे होत असून, यामध्ये उसाच्या पहिल्या उचलीचा बार उडणार आहे. यंदाच्या हंगामात केवळ ‘एफआरपी’ घेणार नसून, त्यापेक्षा जास्त पहिली उचल असेल, असा प्रयत्न संघटनेचा आहे. राज्यातील सरासरी ‘एफआरपी’ व साखरेचे दर पाहता तीन हजार रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीचा ठराव या ऊस परिषदेत होण्याची शक्यता आहे. ऊस परिषदेत उचलीचा आकडा जाहीर करायचा आणि तो कारखान्यांनी ग्राह्य मानायचा, असेच गेले १४ वर्षे साखर कारखानदारीत सुरू आहे. त्यामुळे ऊस परिषदेकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या असतात. मागील वर्षी साखरेचे दर कोसळल्याने दराबाबत ‘स्वाभिमानी’ फारशी आग्रही राहिली नाही. ‘एफआरपी’ पदरात पाडून घेतानाच त्यांची दमछाक उडाली; पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. एप्रिलपासून साखरेचे दर वधारल्याने यंदाच्या हंगामात ‘एफआरपी’वर थांबणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. सध्या साखरेचे दर ३५०० रुपयांपर्यंत आहेत, त्यात यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने साखरेचे दर भडकणार आहेत. याचा अंदाज घेऊन यंदाची उचल किती मागायची, याचा अभ्यास ‘स्वाभिमानी’ने केला आहे. यंदा महाराष्ट्रात सरासरी २५०० रुपये प्रतिटन ‘एफआरपी’ होते. ही उचल कारखाने सहज देऊ शकतात; पण त्यापेक्षा पाचशे रुपये जादा शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच आजच्या ऊस परिषदेत तीन हजार रुपये पहिल्या उचलीचा बार उडण्याची शक्यता आहे. जयसिंगपुरात नगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे यंदाच्या ऊस परिषदेची जागा बदलण्यात आली आहे. झेले चित्रमंदिराजवळ मालू ग्रुपच्या मैदानावर परिषद होत आहे. सोमवारी ऊस परिषदेच्या निमित्ताने जय्यत तयारी करण्याचे काम मैदानावर सुरू होते. याठिकाणी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभर मेळावे, बैठका, रॅलीद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पहिल्यांदाच कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रूपाने परिषदेत मंत्र्याची उपस्थिती असणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते कोणता हल्लाबोल करतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे या ऊस परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.