शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

‘स्वाभिमानी’ची तीन हजारांची मागणी!

By admin | Updated: October 25, 2016 01:09 IST

आज ऊस परिषद : पहिल्या उचलीसाठी मागणीचा ठराव होण्याची शक्यता

कोल्हापूर / जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १५वी ऊस परिषद आज, मंगळवारी जयसिंगपूर येथे होत असून, यामध्ये उसाच्या पहिल्या उचलीचा बार उडणार आहे. यंदाच्या हंगामात केवळ ‘एफआरपी’ घेणार नसून, त्यापेक्षा जास्त पहिली उचल असेल, असा प्रयत्न संघटनेचा आहे. राज्यातील सरासरी ‘एफआरपी’ व साखरेचे दर पाहता तीन हजार रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीचा ठराव या ऊस परिषदेत होण्याची शक्यता आहे. ऊस परिषदेत उचलीचा आकडा जाहीर करायचा आणि तो कारखान्यांनी ग्राह्य मानायचा, असेच गेले १४ वर्षे साखर कारखानदारीत सुरू आहे. त्यामुळे ऊस परिषदेकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या असतात. मागील वर्षी साखरेचे दर कोसळल्याने दराबाबत ‘स्वाभिमानी’ फारशी आग्रही राहिली नाही. ‘एफआरपी’ पदरात पाडून घेतानाच त्यांची दमछाक उडाली; पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. एप्रिलपासून साखरेचे दर वधारल्याने यंदाच्या हंगामात ‘एफआरपी’वर थांबणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. सध्या साखरेचे दर ३५०० रुपयांपर्यंत आहेत, त्यात यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने साखरेचे दर भडकणार आहेत. याचा अंदाज घेऊन यंदाची उचल किती मागायची, याचा अभ्यास ‘स्वाभिमानी’ने केला आहे. यंदा महाराष्ट्रात सरासरी २५०० रुपये प्रतिटन ‘एफआरपी’ होते. ही उचल कारखाने सहज देऊ शकतात; पण त्यापेक्षा पाचशे रुपये जादा शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच आजच्या ऊस परिषदेत तीन हजार रुपये पहिल्या उचलीचा बार उडण्याची शक्यता आहे. जयसिंगपुरात नगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे यंदाच्या ऊस परिषदेची जागा बदलण्यात आली आहे. झेले चित्रमंदिराजवळ मालू ग्रुपच्या मैदानावर परिषद होत आहे. सोमवारी ऊस परिषदेच्या निमित्ताने जय्यत तयारी करण्याचे काम मैदानावर सुरू होते. याठिकाणी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभर मेळावे, बैठका, रॅलीद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पहिल्यांदाच कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रूपाने परिषदेत मंत्र्याची उपस्थिती असणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते कोणता हल्लाबोल करतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे या ऊस परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.