शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

‘स्वाभिमानी’ची तीन हजारांची मागणी!

By admin | Updated: October 25, 2016 01:09 IST

आज ऊस परिषद : पहिल्या उचलीसाठी मागणीचा ठराव होण्याची शक्यता

कोल्हापूर / जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १५वी ऊस परिषद आज, मंगळवारी जयसिंगपूर येथे होत असून, यामध्ये उसाच्या पहिल्या उचलीचा बार उडणार आहे. यंदाच्या हंगामात केवळ ‘एफआरपी’ घेणार नसून, त्यापेक्षा जास्त पहिली उचल असेल, असा प्रयत्न संघटनेचा आहे. राज्यातील सरासरी ‘एफआरपी’ व साखरेचे दर पाहता तीन हजार रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीचा ठराव या ऊस परिषदेत होण्याची शक्यता आहे. ऊस परिषदेत उचलीचा आकडा जाहीर करायचा आणि तो कारखान्यांनी ग्राह्य मानायचा, असेच गेले १४ वर्षे साखर कारखानदारीत सुरू आहे. त्यामुळे ऊस परिषदेकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या असतात. मागील वर्षी साखरेचे दर कोसळल्याने दराबाबत ‘स्वाभिमानी’ फारशी आग्रही राहिली नाही. ‘एफआरपी’ पदरात पाडून घेतानाच त्यांची दमछाक उडाली; पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. एप्रिलपासून साखरेचे दर वधारल्याने यंदाच्या हंगामात ‘एफआरपी’वर थांबणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. सध्या साखरेचे दर ३५०० रुपयांपर्यंत आहेत, त्यात यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने साखरेचे दर भडकणार आहेत. याचा अंदाज घेऊन यंदाची उचल किती मागायची, याचा अभ्यास ‘स्वाभिमानी’ने केला आहे. यंदा महाराष्ट्रात सरासरी २५०० रुपये प्रतिटन ‘एफआरपी’ होते. ही उचल कारखाने सहज देऊ शकतात; पण त्यापेक्षा पाचशे रुपये जादा शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच आजच्या ऊस परिषदेत तीन हजार रुपये पहिल्या उचलीचा बार उडण्याची शक्यता आहे. जयसिंगपुरात नगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे यंदाच्या ऊस परिषदेची जागा बदलण्यात आली आहे. झेले चित्रमंदिराजवळ मालू ग्रुपच्या मैदानावर परिषद होत आहे. सोमवारी ऊस परिषदेच्या निमित्ताने जय्यत तयारी करण्याचे काम मैदानावर सुरू होते. याठिकाणी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभर मेळावे, बैठका, रॅलीद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पहिल्यांदाच कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रूपाने परिषदेत मंत्र्याची उपस्थिती असणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते कोणता हल्लाबोल करतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे या ऊस परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.