शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, अंगणवाड्यांच्या विकासाला रोजगार हमीचे पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:53 IST

समीर देशपांडे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत शाळा आणि अंगणवाड्यांसाठी संरक्षक ...

समीर देशपांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत शाळा आणि अंगणवाड्यांसाठी संरक्षक भिंती, शौचालये यासाठी आग्रही मागणी करणाऱ्या गावांसाठी महाराष्ट्र शासनाने निधी मिळविण्याचा एक चांगला मार्ग दाखविला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक कामे करण्याची संधी गावांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिचा फायदा करून घेण्यासाठी मात्र गावागावांनी कंबर कसण्याची गरज आहे.

सध्या रोजगार हमीमधून कामे करण्यामध्ये महाराष्ट्र पिछाडीवर आहे. पश्चिम बंगालचे या योजनेचे अंदाजपत्रक ८ हजार कोटी रुपयांचे आहे, तर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशचे अंदाजपत्रक अनुक्रमे ८ आणि ५ हजार कोटी रुपयांचे आहे. महाराष्ट्र मात्र केवळ २४०० कोटी रुपयांवरच थांबला आहे. यासाठी आता रोजगार हमी योजनेतून विविध विकासकामे करण्याचा निर्धार महाराष्ट्र शासनाने केला आहे.

याचाच एक भाग म्हणून गावागावांत या योजनेच्या माध्यमातून कोणकोणती कामे करता येतील याचा अभ्यास केला जात आहे. यातूनच मग जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांसाठी खालील कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खालील कामे पर्यावरणपूरक असल्याने लहान वयातच या प्रश्नांविषयीही मुला-मुलींमध्ये आस्था निर्माण होईल, असाही आशावाद व्यक्त केला जात आहे. अर्थात यासाठी ग्रामस्थांना रोजगार देण्यासाठी ६० टक्के आणि साहित्यासाठी ४० टक्के खर्च करण्याची अट कायम आहेच.

-------------------------------------------

जि. प. शाळा, अंगणवाड्यांमध्ये ही करता येतील कामे

१) शाळेसाठी कीचनशेड २) रेन वाॅटर हार्वेस्टिंग संरचना ३) शोषखड्डा ४) मल्टीयुनिट शौचालय

५) खेळाचे मैदान ६) संरक्षक भिंत ७) बिहार पॅटर्न वृक्षलागवड ८) परिसरात पेव्हिंग ब्लाक ९) परिसरात, बाहेर नाला बांधकाम १०) शाळा, अंगणवाडीकडे येणारे रस्ते गुणवत्तापूर्ण करणे

११) बोअरवेल पुनर्भरण १२) गांडुळ खत प्रकल्प १३) नापेड कंपोस्ट

-------------------------------------------

प्रधान सचिवांचा पुढाकार

रोजगार हमी योजनेचे महाराष्ट्राचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी याबाबत चांगलाच पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे अन्य निधीवर मर्यादा येत असताना रोजगार हमी योजनेद्वारे अधिक निधी मिळविण्याचा निर्धार त्यांच्या या विभागाने केला आहे. त्यामुळे या योजनेतून महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक निधी आणण्यासाठी नंदकुमार यांनी ७५ पानांचा सविस्तर शासन आदेश काढला आहे.