शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

‘नानां’ना बालेकिल्ल्यात रोखण्याची रणनीती

By admin | Updated: October 21, 2015 00:09 IST

अखेरच्या टप्प्यातील घडामोडी निर्णायक : ताराराणी आघाडी व शिवसेनेत रंगतदार सामना

कसबा बावडा : भोसलेवाडी-कदमवाडी या सर्वसाधारण गटासाठी खुल्या असलेल्या प्रभाग क्र. ८ मध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक लढविलेले नगरसेवक सत्यजित कदम (ताराराणी आघाडी) यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी सर्व पक्षांच्या उमेदवारांनी व्यूहरचना आखली आहे. कदम व शिवसेनेचे उपशहर प्रमुख अरविंद मेढे असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीने मकरंद जोंधळे यांना, काँग्रसने दीपकसिंह पाटील यांना, तर बहुजन विकासने सुंदर मोरे यांना उमेदवारी दिली आहे. हे सर्व उमेदवार आपला प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून सत्यजित कदम यांच्याकडे पाहतात. या-ना-त्या प्रकारे कदम यांना रोखण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. पक्षाचे नेतेही व्यूहरचनेत सहभागी आहेत. कदम यांचा प्रचार मात्र अगदी आखीव-रेखीव असा पद्धतशीरपणे आणि नियोजन पद्धतीने सुरू आहे.सत्यजित कदम हे महाडिक कुटुंबीयांचे जवळचे नातेवाईक आहेत. परिसरात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते पुन्हा निवडणूक रिंरगणात उतरले आहेत. कदम घराण्याला राजकीय वारसा असल्याने ते सर्वत्र चांगले परिचित आहेत. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते व उपशहर प्रमुख अरविंद मेढे यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. २०१० च्या महापालिकेच्या निवडणुकीत स्मिता माळी यांना भोसलेवाडी-कदमवाडी या प्रभागातून निवडून आणण्यात मेढेंचा सिंहाचा वाटा होता. आता ते स्वत: उमेदवार असल्याने शिवसेनेने आपली सर्व ताकद या प्रभागात लावली आहे. प्रभाग कदमवाडी चौकापासून ते अगदी जाधववाडी मेनरोडपर्यंत जरी पसरलेला असला, तरी सर्व पक्षांच्या उमेदवारांची निवडणूक कार्यालये कदमवाडी मुख्य चौकात आहेत. कदमवाडी आणि भोसलेवाडीतील समीकरणे विजयाचे पारडे फिरवू शकतात. कदम आणि मेढे यांचे पारंपरिक मतदान याठिकाणीच एकवटलेले आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार मकरंद जोंधळे यांनी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार प्रचार सुरू केला आहे. प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आपण रिंगणात उतरलो असल्याचे ते प्रचार करताना सांगतात. काँग्रेसचे दीपकसिंह पाटील यांनीही प्रचारास जोरात सुरुवात केली आहे. बहुजन विकासचे सुंदर मोरे यांचाही प्रचार सुरू आहे. या प्रभागात एकूण पाच उमेदवार रिंगणात असले तरी सत्यजित कदम व शिवसेनेचे अरविंद मेढे यांच्यातच लढत होईल असे चित्र आहे. सत्यजित कदम यांना आपण मोठ्या फरकाच्या मताधिक्क्याने विजयी होऊ, असा आशावाद आहे. मेढेही आपला विजय निश्चित असल्याचे बोलतात. राष्ट्रवादीचे उमेदवार जोंधळे यांना या दोन उमेदवारांच्या मतविभागणीचा फायदा आपणास होईल असे वाटते. काँग्रेसला मोठी परंपरा असल्याने आपला विजय नक्की असल्याची दीपकसिंह पाटील यांना आशा आहे. सुंदर मोरे यांनाही विजयाची खात्री आहे. असे जरी असले, तरी शेवटच्या क्षणाला नेमकी बाजी कोण मारणार, यावर निकाल स्पष्ट होणार आहे. प्रभागात ५५५० मतदारांची संख्या आहे. त्यात ७० टक्के मतदार हे मराठा, १५ टक्के ओबीसी, दहा टक्के बीसी, तर पाच टक्के इतर समाजाचे आहेत. त्यामुळे एका विशिष्ट समाजाची मते अमुक एका उमेदवाराला मिळतील अशी जातीनिहाय टक्केवारी होऊ शकत नाही.बिग फाईटकदमवाडी-भोसलेवाडी