शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

स्टार ८४१...‘मृगा’चा तडाका, ‘आद्रर्का’ची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ‘मृग’ नक्षत्राने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडवून दिली. चार-दिवस झालेल्या जोरदार पावसाचा ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ‘मृग’ नक्षत्राने शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडवून दिली. चार-दिवस झालेल्या जोरदार पावसाचा तडाका बसल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले. आता ‘आद्रर्का’ नक्षत्रात पावसाचे काहीसी उसंत घेतली असली तरी त्याची धास्ती मात्र कायम आहे. जूनमध्ये सरासरी ३४८ मिलिमीटर पाऊस पडल्याने खरीप पिकांची पुरती दाणादाण उडवून दिली आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यात सध्या पावसाचे ओढ दिल्याने पिके धोक्यात आली आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती काहीसी वेगळी आहे. माॅन्सून सक्रिय झाला आणि त्याचा जोर वाढत गेला. ‘मृग’ नक्षत्राच्या शेवटच्या टप्यात सलग तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने गेल्या दहा वर्षांत पहिल्यादांच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात नद्यांना पूर आला. जिल्ह्यात खरिपाची ५५ टक्के पेरणी झाली आहे. धूळवाफ पेरणी झालेल्या भाताची उगवण झाली. मात्र जोरदार पावसाने अनेक ठिकाणी भात पीक कुजल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भुईमूग, सोयाबीनचेही काही ठिकाणी नुकसान झाले आहे. खरा पाऊस लागणारी नक्षत्रे अजून लागायची आहेत. एरव्ही कोरडे जाणारे ‘मृग’ नक्षत्र जोरदार लागल्याने पुढील नक्षत्राचा काय नूर राहील. याविषयी सगळ्यांच्या मनात धास्ती आहे.

जून महिन्यातील पावसाची सरासरी - १४० मिलिमीटर

आतापर्यंत झालेला पाऊस - ३४८ मिलिमीटर

सर्वात कमी पाऊस - २१३ मिलिमीटर, शिरोळ तालुका

सर्वात जास्त पाऊस - ८१९ मिलिमीटर, गगनबावडा तालुका

तालुकानिहाय झालेली पेरणी हेक्टरमध्ये

तालुका पेरणी

हातकणंगले ५२००

शिरोळ १२५०

पन्हाळा २८००

शाहुवाडी ५५०

राधानगरी ७६००

गगनबावडा ११५०

करवीर ८७६०

कागल ७९००

गडहिंग्लज ११६००

भुदरगड १२०५०

आजरा ६३००

चंदगड १३०२५

तालुकानिहाय पेरणी आणि झालेला पाऊस

तालुका पाऊस मिलिमीटर

हातकणंगले २१६

शिरोळ २१३

पन्हाळा ३११

शाहुवाडी ४२७

राधानगरी ४१८

गगनबावडा ८१९

करवीर २७७

कागल ३४०

गडहिंग्लज ३६५

भुदरगड ३४४

आजरा ४१८

चंदगड ४९४

सरासरीच्या २० टक्के पाऊस जूनमध्येच

जिल्ह्याची माॅन्सूनमधील सरासरी १७१४ मिलिमीटर आहे. जूनच्या चार-पाच दिवसांतच त्यातील २० टक्के म्हणजेच ३४८ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस सरासरीच्या ५१ टक्के शिरोळमध्ये तर ४० टक्के हातकणंगले तालुक्यात झाला आहे.

कोट-

मृग नक्षत्रात एवढा पाऊस कधीच होत नाही. मात्र चार-पाच दिवस झालेल्या जोरदार पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान केले. आठ-नऊ महिने वाढवलेले ऊस आडवे झाले आहेत.

- बळवंत पाटील (शेतकरी, शिरगाव)

फोटो ओळी : मागील आठवड्यात कोल्हापुरात झालेल्या जोरदार पावसाने ऊस पिकात पाणी उभा राहिले. (फोटो-२३०६२०२१-कोल-ऊस) (छाया- नसीर अत्तार)