नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली; सहा ठार, चौघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 12:30 PM2024-02-23T12:30:02+5:302024-02-23T12:30:57+5:30

लग्नसोहळ्याला जात असताना बेळगावजवळ झाला अपघात; मृत कित्तूर, धारवाड येथील

Six people were killed in an accident near Belgaum | नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली; सहा ठार, चौघे जखमी

नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली; सहा ठार, चौघे जखमी

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मंग्यानकोप्प गावाजवळ कित्तूरकडून बिडीमार्गे लग्नसोहळ्याला जाणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटून झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सहाजण ठार झाले. गुरुवारी दुपारी हा अपघात झाला. मृत व्यक्ती हे कित्तूर व धारवाड येथील आहेत.

कित्तूर व धारवाड येथील जमादार व लंगोटी कुटुंबातील लोक कारमधून (एमएच १२, इ एक्स ३०५२) या लग्नसोहळ्यासाठी बिडी गावाकडे निघाले होते. मंग्यानकोप्प गावाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. त्यात शाहरुख पेंढारी (३०), इकबाल जमादार (५०), सानिया लंगोटी (३७), उमर लंगोटी (१७), शबनम लंगोटी (३७), फरहान लंगोटी (१३) हे सहाजण ठार झाले तर चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून बेळगावचे एसपी भीमा शंकर गुळेद घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी केली.

Web Title: Six people were killed in an accident near Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.