शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ShivSena-Vanchit Alliance: कार्यकर्त्यांच्या पातळीवर युती कितपत उतरते त्यावरच यश, राजकीय विश्लेषकांचे मत

By विश्वास पाटील | Published: January 24, 2023 2:28 PM

ठाकरे-आंबेडकर युतीचे महाविकास आघाडीतही पडसाद उमटू शकतात

विश्वास पाटील कोल्हापूर : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेली युती कार्यकर्त्यांच्या पातळीवर कितपत उतरते यावरच या युतीचे महाराष्ट्राच्या राजकारणातील भवितव्य अवलंबून असेल, अशी प्रतिक्रिया राजकीय अभ्यासकांतून व्यक्त झाली. ही युती झाल्यानंतर ‘लोकमत’ने त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्की काय परिणाम होईल, हे जाणून घेतले. शिवसेनेतील फुटीनंतर एकटे पडलेल्या ठाकरे यांना नवीन मित्र जोडल्याचे मानसिक आधार या युतीतून मिळू शकतो.राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून परस्परविरोधी भूमिका असलेल्या लोकांशी युती करत आहेत. त्यांनी संभाजी ब्रिगेडशी आघाडी केली आहे. त्यानंतर आता आंबेडकर यांच्याशी युतीचा निर्णय घेतला. शिवसेनेतील बंडानंतरही मुंबईत ठाकरे गटाचे आजही वर्चस्व आहे. तिथे आंबेडकर यांना मानणाराही वर्ग आहे.शिवसेनेची हिंदूत्वाबद्दलची आक्रमक भूमिका राहिली आहे. आणि आंबेडकर यांचा हिंदुत्व, सावरकर विचारधारा यांना विरोध राहिला आहे. त्यामुळे हे मतभेद कसे सांधणार हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दोन्हीकडील नेत्यांना पुढाकार घ्यावा लागेल. कारण मतभेदाचे प्रदर्शन झाल्यास भाजप व शिंदे गट त्याचे भांडवल करण्यास टपून बसलेला असेल. म्हणून दोन्हीकडील नेत्यांना तोंडावर नियंत्रण ठेवावे लागेल.

राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार म्हणाले, या युतीचा जास्त फायदा शिवसेनेला होऊ शकतो. परंतु शिवसेनेचा पारंपरिक मतदार आंबेडकर यांना स्वीकारणार का, हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. आतापर्यंत परस्परविरोधी विचारधारेचे हे दोन पक्ष आहेत. त्यांचे हितसंबंध वेगवेगळे आहेत. आंबेडकर यांचा पक्ष चळवळीशी संबंधित आहे. शिवसेना तशी प्रस्थापित वर्गाचे राजकारण करते. गावपातळीवर हे घटक एकमेकांच्या विरोधात राहिले आहेत. त्यामुळे नेत्यांतील मनोमीलन कार्यकर्त्यांच्या पातळीवर घडवून आणण्याचे आव्हान असेल.महाविकास आघाडीतही पडसादठाकरे-आंबेडकर युतीचे महाविकास आघाडीतही पडसाद उमटू शकतात, असे या दोन्ही विश्लेषकांना वाटते. कारण राष्ट्रवादी हा बहुजन समाजाच्या नावाखाली मुख्यत: मराठ्यांच्या हिताचे राजकारण करणारा पक्ष आहे. फुटीनंतर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यांना महाविकास आघाडीतील जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी नव्या युतीचा फायदा होऊ शकेल.

काही निरीक्षणे...

  • आंबेडकर यांना मानणारा मतदार शिवसेनेकडे वळेल
  • शिवसेनेचा पारंपरिक मतदार वंचितकडे वळवण्याचे आव्हान
  • दोन्ही पक्षांच्या मतदारांनी युती स्वीकारली तर त्याचा मोठा लाभ दोघांनाही
  • आंबेडकर यांना महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्ष कितपत स्वीकारतात यावर प्रश्नचिन्ह
टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी