शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ‘शेकाप’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 1:04 PM

यावेळी पोलीस व आंदोलकांत झटापट झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. जोपर्यंत शेतकºयाला सरकारी मदत मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी एकही देणे देणार नाही, असा इशारा राज्य सरचिटणीस संपतराव पवार-पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देफाटक ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न : शेतकरी एकही देणे देणार नाहीत : संपतराव पवार-पाटील

कोल्हापूर : शेतकºयाला विनाअट सरसकट शंभर टक्के कर्जमाफी देण्यात यावी, महापुरातील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, परतीच्या पावसाने उरलीसुरली पिकेही नष्ट झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. दरम्यान, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकाचा दरवाजा ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व आंदोलकांत झटापट झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. जोपर्यंत शेतकºयाला सरकारी मदत मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी एकही देणे देणार नाही, असा इशारा राज्य सरचिटणीस संपतराव पवार-पाटील यांनी दिला.

दसरा चौक येथून दुपारी साडेबाराच्या सुमारास संपतराव पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी बैलगाडीमध्ये शेतकºयाचा आक्रोश आणि व्यथा मांडणारे फलक लावले होते; तर ‘शेती वाचवा, अन्नदाता जगवा’, ‘शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी’ असे फलक आंदोलकांच्या हातांत झळकत होते. व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. या ठिकाणी आंदोलकांनी बंद फाटक ढकलून आत घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना रोखताना पोलिसांशी झटापट होऊन काहीवेळ गोंधळ उडाला. यावेळी संपतराव पवार-पाटील व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यानंतर आंदोलकांनी फाटकासमोरच ठिय्या मारत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना संपतराव पवार-पाटील यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली. अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदत व शेतकºयांना कर्जमाफी अद्याप मिळालेली नसून ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शेतकरी वीज, महसूल, ग्रामपंचायत यातील कोणतेही सरकारी देणे देणार नाहीत, असा इशारा संपतराव पवार-पाटील यांनी दिला.यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात मागण्या अशा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळावी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनापात्र शेतकºयांना कर्जमाफीत प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अतिवृष्टीमुळे झालेल्या व्यापारी, शेतकºयांना मूल्यांकन करून ताबडतोब नुकसानभरपाई द्यावी, कृषी वीजपंप पाईपलाईन मिळावी, वीज मीटर बदलून कृषिपंपाची बिले माफ करावीत, सरकारी पाणीपट्टी माफ करावी, चालू ऊस गळीत हंगामाकरिता कृषिमूल्य आयोगाने ‘एफआरपी’ची किंमत बदललेली नाही, ती वाढवावी, उसाची ‘एफआरपी’ ऊस कारखान्याला गेल्यापासून १४ दिवसांत देण्यात यावी, कृषी उत्पन्न बाजार समिती बंदीचा निर्णय मागे घ्यावा.

आंदोलनात जिल्हा सरचिटणीस भारत पाटील, दिलीपकुमार जाधव, बाबूराव कदम, केरबा पाटील, अशोकराव पवार-पाटील, वसंत कांबळे, अमित कांबळे, राजेंद्र देशमाने, उज्ज्वला कदम, बाबासाहेब देवकर, एकनाथ पाटील, संजय डकरे, सुशांत बोरगे, आदींसह शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते 

टॅग्स :Strikeसंपkolhapurकोल्हापूर