शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

kolhapur Politics: पाच दशकांच्या राजकीय संघर्षाला विराम; संपतराव-पी.एन.यांच्यात दिलजमाई, विधानसभेला एकजूट महत्त्वाची ठरणार

By विश्वास पाटील | Updated: November 8, 2023 13:52 IST

दोघेही आयुष्यभर जातीयवादी पक्षांच्या वळचणीला कधी गेले नाहीत

विश्वास पाटीलकोल्हापूर : राजकीय वैर जरूर होते, परंतु त्यांनी कधीही एकमेकांवर कंबरेखालील वार केले नाहीत. दोघांनाही राजकारण कळू लागल्यावर जो झेंडा हातात घेतला तो आजअखेर खाली ठेवला नाही. पक्षाशी, विचाराशी गद्दारी त्यांच्या रक्तात नाही. दोघेही आयुष्यभर जातीयवादी पक्षांच्या वळचणीला कधी गेले नाहीत. तरीही त्यांच्यात चार पिढ्यांमध्ये राजकीय विरोध सुरू राहिला. भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने हा तब्बल पाच तपांचा विरोध मागे टाकून शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार व काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांच्यात राजकीय समझोता झाला आहे. हा कारखाना निवडणुकीसाठी तडजोड झाली असली तरी ती यापुढेही कायम राहण्याची शक्यताच जास्त आहे. त्याचा परिणाम करवीर विधानसभेसह जिल्हा परिषद निवडणुकीवरही होणार आहे.करवीर तालुक्यातील सडोली खालसा हे सुमारे पाच हजार लोकवस्तीचे भोगावती नदीच्या काठावर वसलले संपन्न गाव. खरेतर महाराष्ट्र व कर्नाटकाला एकेकाळी बुलडोझरचे गाव म्हणून त्याची ओळख जास्त. त्या गावातील रामजी बाबजी पाटील व गणपतराव बाबूराव पवार ही दोन घराणी. मूळची तत्कालीन शेका पक्षाची विचारधारा मानणारी. पुढे दत्तात्रय रामजी पाटील यांचे घराणे काँग्रेसच्या विचारधारेकडे वळले. तेव्हापासून या दोन घराण्यातला राजकीय विरोध सुरू झाला. तो संघर्षाच्या पातळीवर फारसा कधी उतरला नाही.ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून ही दोन घराणी एकमेकांच्या विरोधात लढत राहिली, परंतु निवडणूक झाली की गावातील राजकीय हवा विरून जायची. त्यावरून वाद, मारामारी कधीच झाली नाही. एकमेकांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी कधीच पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारायला लावले नाहीत. दोघांचीही गावात कधी दहशत नाही. दोघांचेही गट मजबूत. ग्रामपंचायत, सेवा संस्था, पाणीपुरवठा, जिल्हा परिषद, साखर कारखाना, जिल्हा बँकेपासून ते विधानसभा-लोकसभेपर्यंत एकमेकांच्या विरोधात कायमच लढले. त्यांना एकत्र आणण्याचे काम चौथ्या पिढीने केले. गेल्या विधानसभेला आमदार पाटील यांचा मुलगा राहुल पाटील पहिल्यांदा संपतराव पवार यांच्या घरी गेला व पाठिंबा देण्याची विनंती केली. तिथे सुरू झालेली ही समझोता एक्स्प्रेस आता कारखान्यातही पुढे धावली आहे.

सडोलीला २० वर्षे आमदारकी..पी.एन.पाटील (काँग्रेस) व संपतराव पवार (शेकाप) यांच्यात १९९५, १९९९, २००४ आणि २००९ अशा चार लढती झाल्या. त्यामध्ये संपतराव पवार दोन वेळा विजयी झाले व एकदा पी.एन.पाटील विजयी झाले. २००९ ला दोन्ही सडोलीकर शिवसेनेच्या चंद्रदिप नरके यांच्याकडून पराभूत झाले.

भोगावतीत १९७३ पासून विरोधभोगावतीच्या राजकारणात या दोन्ही घराण्यांत १९७३ पासून विरोध आहे. शेका पक्षाकडून संपतराव पवार, त्यांचे चुलत भाऊ अशोकराव पवार हे उपाध्यक्ष झाले. काँग्रेसकडून दिवंगत नारायण पाटील हे उपाध्यक्ष झाले. पुढे त्यांचाच मुलगा संभाजीराव पाटील, दीपक पाटील व आता पी.एन. पाटील या चुलत भावांना कारखान्याचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली.

संस्थात्मक उभारणी..पी.एन. पाटील यांनी राजीव गांधी सूतगिरणी, श्रीपतरावदादा बँक, निवृत्ती तालुका संघ अशा संस्थांची उभारणी केली. संपतराव यांनी खत कारखान्याची उभारणी केली परंतु तो त्यांना चालवून दाखवता आला नाही. खत आधी की सूत आधी ही ईर्षा एका विधानसभा निवडणुकीत गाजली.

वैचारिक बांधीलकी..माजी आमदार संपतराव पवार व आमदार पाटील हे आयुष्यभर आपापल्या झेंड्याशी प्रामाणिक राहिले. पवार यांनी शेका पक्षाच्या लाल झेंड्याला कधी बट्टा लागू दिला नाही. विजयी व्हावे म्हणून लढायचे ही त्यांची कधीच विचारधारा नव्हती. चुकीचे होतंय त्याला विरोध या विचाराने त्यांनी राजकारण केले. पी.एन. पाटील यांनीही अनेकदा संधी येऊनही काँग्रेसशी कधीच गद्दारी केली नाही. जातीयवादी विचारधारेला विरोध हा त्यांच्यातील समान धागा राहिला.

नोकरीची संधी..पी.एन. व संपतराव यांनी मतदारसंघातील शेकडो तरुणांना नोकरीस लावले. परंतु, त्यांच्याकडून कधीच अर्धा कप चहाही घेतला नाही. दोघांनीही सामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. दोघांनी एकमेकांचे चारित्र्यहनन होईल अशी टीका कधीच केली नाही. त्यांनी कधीच आरोप करताना एकमेकांचे नावही घेतले नाही. आमच्या विरोधकांना असेच ते म्हणत असत. हे दोघे त्यांच्या राजकीय जीवनात एकदाही एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. पुढच्या राजकारणातही हे दोघे एका व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता धूसर आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणP. N. Patilपी. एन. पाटील