शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

सलग दुसऱ्या दिवशी वळवाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 6:59 PM

Kolhapur Rain : सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याला वळवाच्या जोरदार सरींनी झोडपून काढले. विजांचा कडकडाट झाला तरी कुठेही अनुचित घटना घडली नाही. काही ठिकाणी हुलकावणी, तर कुठे जोरदार आलेल्या या पावसाने उकाड्याने हैराण जिवाला गारव्याची अनुभूती दिली.

ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशी वळवाने झोडपले उकाड्याने हैराण जिवाला गारव्याची अनुभूती

कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याला वळवाच्या जोरदार सरींनी झोडपून काढले. विजांचा कडकडाट झाला तरी कुठेही अनुचित घटना घडली नाही. काही ठिकाणी हुलकावणी, तर कुठे जोरदार आलेल्या या पावसाने उकाड्याने हैराण जिवाला गारव्याची अनुभूती दिली.या पावसाचा उन्हाळी पिकाच्या काढणीवर परिणाम होणार असला तरी ऊस पिकासाठी पाऊस पोषक असल्याने शेतकरी सुखावला आहे. शुक्रवारी मध्य रात्रीपर्यंत पाऊस पडल्याने शनिवारी सकाळपासूनच कुंद आणि दमट वातावरण होते. प्रचंड उष्माही जाणवत होता. दुपारनंतर उन्हाचा तडाखा वाढला आणि त्यापाठोपाठ सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवातही झाली. जोरदार आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली तरी दिवसभराच्या उष्म्यापासूनही दिलासा मिळाला. अजून दोन दिवस पावसाचे राहतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी बहुतांश लोक घरातच होते. शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे बऱ्याच गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. तो लवकर पूर्ववत न झाल्याने घरी असूनही लोकांना सुटीचा आनंद घेता आला नाही. निवांतपणे क्रिकेट सामने पाहण्याच्या आनंदावरही पाणी सोडावे लागले. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर