शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कोल्हापूरकरांच्या दातृत्वामुळे थांबली दुर्गम भागातील मुलींची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2021 11:02 AM

दुर्गम आणि ग्रामीण भागात असणाऱ्या शाळेसाठी मुलांची रोज तीन किलोमीटरपेक्षा अधिक पायपीट होत होती .सायकल मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता.

संदीप आडनाईक

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात असणाऱ्या शाळेसाठी रोज तीन किलोमीटरपेक्षा अधिक अंतर चालत जाणाऱ्या शाळकरी मुलांची पायपीट कोल्हापूर आणि इचलकरंजीकरांच्या दातृत्वामुळे आता थांबणार आहे. कसबा तारळे येथील भोगावती सांस्कृतिक मंडळ संचलित पु. शि. (तथा) काका आठवले विद्यार्थी वसतिगृहाच्या पुढाकाराने राधानगरी तालुक्यातील सहा वाड्यांमधील सुमारे २५ जणांना ही सायकल भेट मिळाली. त्यामध्ये २१ मुलींचा समावेश आहे. सायकल मिळाल्यामुळे त्यांच्या तोंडावर दिसणारा आनंद अवर्णनीय होता.

राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील कसबा तारळे भोगावती सांस्कृतिक मंडळ संचलित पु. शि. (तथा) काका आठवले विद्यार्थी वसतिगृहाच्या माध्यमातून परिसरातील दुर्गम आणि ग्रामीण भागाचा मार्च २०२० मध्ये आवश्यकता पडताळणी सर्वेक्षण करण्यात आला होता. त्यात दळणवळणाच्या साधनांचा अभाव असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना हायस्कूलसाठी रोज तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालत जावे लागत असल्याचे निदर्शनास आले.

ही पायपीट थांबवण्यासाठी यावर्षी संस्थेमार्फत ‘सायकल भेट अभियान’ राबविण्यात आले. या अभियानासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील नागरिकांना जुन्या वापरात नसलेल्या पण सुस्थितीतील सायकल देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला शहरवासीयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सप्टेंबर २०२१ अखेर एकूण पंचवीस सायकल, आवश्यक ती दुरुस्ती करून, भेट स्वरूपात विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.

तालुक्यातील जोंधळेवाडी व आपटाळ येथील कार्यक्रमात वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी, अतिरिक्त सरकारी वकील अमित महाडेश्वर यांच्या हस्ते या सायकलींचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी एम. डी. पाटील, पांडुरंग भोसले, माधव ठाकूर आणि व्यवस्थापक श्रीकांत वष्ट उपस्थित होते. या अभियानाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे कार्यकर्ते कृष्णराव माळी, सागर कवडे आणि तानाजी माळी यांनी विशेष प्रयत्न केले.

दुसऱ्या टप्प्यात आणखी ४० सायकली देणार

- पहिल्या टप्प्यात ६ वाड्यांमधील २५ विद्यार्थ्यांना या सायकली देण्यात आल्या. त्यामध्ये २१ विद्यार्थिनींचा समावेश होता.- वसतिगृहामार्फत सायकल भेट अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये डिसेंबर महिन्यात उर्वरित दुर्गम वाड्यांमधील विद्यार्थ्यांना ३० ते ४० सायकल देण्याची संस्थेची योजना आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीSchoolशाळाStudentविद्यार्थी