शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांना तुटपुंजे मानधन...

By admin | Updated: July 17, 2015 23:06 IST

उपसरपंचांना मानधन नाही.. : मानधनात वाढ करण्याची मागणी

नाना जाधव - भादोले -ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांना शासन आणि ग्रामपंचायतीकडून अतिशय तुटपुंजे मानधन मिळत असून, उपसरपंचांना तर मानधनच मिळत नाही. शासनाच्या विविध योजनांची गावात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच, उपसरपंचांना तसेच ग्रामपंचायत सदस्यांना तालुक्यात, जिल्ह्यात पदरमोड करून हेलपाटे मारावे लागत असल्याने शासनाने सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.ग्रामपंचायत सरपंचांना शासन आणि ग्रामपंचायतीमार्फत मानधन देण्यात येते. हे मानधन लोकसंख्येच्या प्रमाणात तीन टप्प्यांवर निश्चित करण्यात आले आहे. दोन हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंचांना मासिक ४०० रुपये, तर दोन हजार ते आठ हजारांपर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावातील सरपंचांना ६०० रुपये, तर आठ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंचांना ८०० रुपये मानधन देण्यात येते. यापैकी ७५ टक्के मानधन शासनाकडून, तर २५ टक्के मानधन ग्रामपंचायतीकडून देण्यात येते.एकंदरीत सरपंचांना अतिशय तुटपुंजे मानधन मिळते. सरपंचांच्या गैरहजेरीत कार्यभार पाहणाऱ्या उपसरपंचांना मासिक २५ रुपये मानधन देण्यात येते. तसेच महिला सरपंच असणाऱ्या अनेक गावांत उपसरपंचांना विकासकामांचा पाठपुरावा करावा लागतो. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या अनेक योजना थेट गावांमध्ये राबविण्यात येतात. या योजनेच्या माहितीसाठी तालुकास्तरावर, जिल्हा स्तरावर बैठकीचे आयोजन होते. यासाठी सरपंचांना उपस्थित राहावे लागते. विविध कामांचा निधी मिळविण्यासाठी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार व खासदार यांना भेटून निधीसाठी पाठपुरावा करावा लागतो. या प्रवास खर्चासाठी सरपंच, उपसरपंच यांना पदरमोड करावी लागते. याची शासनाने दखल घेऊन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.ग्रामीण भागातील केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांना अतिशय कमी मानधन मिळते. त्यांच्या मानधनात वाढ करावी. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. - सुजित मिणचेकर, आमदार