शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

साखरेचा विक्री दर ३१०० रुपये होणार; आठवड्यात निर्णय; केंद्राच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:43 AM

साखर कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखरेचा किमान विक्रीदर २९०० रुपये प्रतिक्विंटलवरून ३१०० रुपये करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत

ठळक मुद्देयावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मंगळवारी विश्वसनीय सूत्रांनी दिली.साखरेचा किमान विक्रीदर ३५०० रुपये प्रतिक्विंटल करावा, अशी मागणी साखर कारखानदारांची आहे.

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : साखर कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखरेचा किमान विक्रीदर २९०० रुपये प्रतिक्विंटलवरून ३१०० रुपये करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत. येत्या आठवड्यातच यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मंगळवारी विश्वसनीय सूत्रांनी दिली.

अतिरिक्त उत्पादन आणि त्यामुळे घसरलेल्या साखरेच्या दरामुळे साखर कारखाने अडचणीत आल्याने गेल्यावर्षी जून महिन्यात साखरेचा किमान विक्रीदर २९०० रुपये प्रतिक्विंटल असा केंद्र सरकारने निश्चित केला. यासह विविध उपाययोजनाही केल्या तरीही गेल्या हंगामात १०३ लाख टन साखर शिल्लक राहिली. त्यात चालू हंगामातही ३०७ लाख टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज आहे. साखरेचा प्रतिक्विंटल उत्पादनखर्च ३४०० रुपये आहे. तो साखर विक्रीतून भरून निघत नाही. उसाची एफआरपी देणेही शक्य होत नाही. त्यामुळे साखरेचा किमान विक्रीदर ३५०० रुपये प्रतिक्विंटल करावा, अशी मागणी साखर कारखानदारांची आहे.

चालू हंगामातील देशातील साखर कारखान्यांकडे सध्या उसाची २० हजार कोटींची एफआरपी थकीत आहे. साखरेचे दर न वाढल्यास ती देताच येणार नाही, अशी भूमिका कारखान्यांनी घेतली आहे. त्यातच लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पाच राज्यांतील पराभवानंतर केंद्र सरकार कोणताही धोका पत्करायला तयार नाही. त्याचे प्रत्यंतर केंद्राच्या अंतरिम अर्थसंकल्पात आले आहे. ऊस उत्पादक आणि साखर उद्योगासाठी या अर्थसंकल्पात काहीच नव्हते. यामुळे या उद्योगाने नाराजी व्यक्त केली होती. ती दूर करून हा उद्योग अडचणींतून बाहेर काढण्यासाठी साखरेचा किमान विक्रीदर ३१०० रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जवळजवळ घेतला आहे. त्याची घोषणा आठवड्याभरात होणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, साखर उद्योगाला अडचणींतून बाहेर काढण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निती आयोगाने एका कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना केल्याची माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली आहे.दर वाढल्यास काय होईल?साखरेचा किमान विक्री दर वाढल्यास साखर कारखान्यांना बॅँकाकडून मिळणाऱ्या अ‍ॅडव्हान्स रकमेतही वाढ होऊन एफआरपी देण्यासाठी त्यांना मदत होईल.साखर निर्यातीचा कोटा ठरवून देऊन केंद्र सरकारने कारखान्यांना साखर निर्यात सक्तीची केली आहे. सध्याच्या आंतरराष्टÑीय बाजारातील दरानुसार कारखान्यांना देशांतर्गत दरापेक्षा सुमारे २०० रुपये कमी मिळतात.

हा तोटा ४०० रुपयांवर जाईल. मात्र, निर्यात केल्याशिवाय अतिरिक्त साखरेचा प्रश्न सुटणार नाही हे कारखान्यांनी लक्षात घ्यायला हवे. दर वाढल्यास खुल्या बाजारातील साखरेचे दर त्या प्रमाणात वाढतील. साहजिकच त्याचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर पडेल.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी