शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

मोदी हटाओ, संविधान बचाओ; कोल्हापुरात इंडिया आघाडीची निदर्शने 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 22, 2023 15:41 IST

सरकारकडून स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचे काम

कोल्हापूर : देशातील मुलभूत प्रश्नांवर वाचा फोडणाऱ्या १४६ खासदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीचा, स्वातंत्र्याचा गळा चेपण्याचे काम आहे. मोदी सरकारला विरोधक संपवून देशावर हुकुमशाही लादायची आहे.. पण आपण एकजुटीने, शाहूंच्या भूमितून वैचारीक लढा देऊया असा निर्धार करत शुक्रवारी इंडिया आघाडीच्यावतीने बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, संविधान जिंदाबाद, लोकशाहीची हत्या करणारा मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी, भाजप हटाओ देश बचाओ,, अशा घोषणांनी चौक दणाणून गेला.विरोधी पक्षातील १४६ खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील, जयंत आसगावकर, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, शिवसेनेचे विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, पद्मजा तिवले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अविनाश नारकर, शेतकरी कामगार पक्षाचे बाबुराव कदम, व्यंकाप्पा भोसले, शारंगधर देशमुख, ईश्वर परमार, सतिशचंद्र कांबळे, आपचे संदीप देसाई यांच्यासह सहभागी पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सतेज पाटील म्हणाले, महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य दिले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आपण एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचे काम केले जात आहे. लोकशाहीच्या मंदिरात येऊन आंदोलन करण्याची वेळ तरुणांवर येते याचे आत्मपरीक्षण सरकारने करावे. संसदेत खासदारांना नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. हा प्रश्न फक्त निलंबनाचा नाही तर खासदारांचे निलंबन करून तीन कायदे मंजूर करायेच होते.विजय देवणे म्हणाले, हा लोकशाहीला हुकुमशाहीकडे नेण्याचा प्रकार आहे. इंडिया आघाडीची एवढी धास्ती घेतली की, सगळ्या विरोधी खासदारांना संसदेबाहेर घालवायला निघाले आहे. मत व्यक्त करणाऱ्यांचे निलंबन हा अजेंडा राबवला जात आहे. हा चोराच्या उलट्या बोंबा मारण्याचा प्रकार आहे.व्ही. बी. पाटील म्हणाले, खासदारांनी महत्वाच्या विषयावर करण्याची मागणी केली तर त्यांच्यासह काही अनुपस्थित खासदारांचेही निलंबन केले गेले. उदय नारकर म्हणाले, मोदी आणि भाजपने त्यांचा प्रचार करण्यासाठी शासकीय यंत्रणेला दावणीला बांधले आहे. मोदी सरकारने काढलेल्या संकल्प यात्रेला जनतेतून विरोध होत आहे. आपचे संदीप देसाई तसेच शिवाजीराव परुळेकर यांनीही मनोगत मांडले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagitationआंदोलन