शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

दहा दिवसांच्या उघडिपीनंतर सक्रीय झाल्याने पिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 11:54 IST

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली आहे. १0 दिवसांच्या उघडिपीनंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने खरीप पिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात १३५.८५ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस ५२.५० मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला.

ठळक मुद्देदहा दिवसांच्या उघडिपीनंतर सक्रीय झाल्याने पिकांना दिलासादोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली आहे. १0 दिवसांच्या उघडिपीनंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याने खरीप पिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात १३५.८५ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस ५२.५० मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला.आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने काहीशी दडी मारली होती. गेले १0 दिवस खडखडीत ऊन पडल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. माळरानावरील भात, भुईमूग, नागली पिके ढगाकडे बघत होती; पण गुरुवारपासून वातावरणात बदल होत गेला आणि दुपारनंतर हलक्या सरी कोसळू लागल्या. गुरुवारी रात्रभर व शुक्रवारी सकाळी दहापर्यंत पावसाची रिपरिप कायम राहिली. सकाळी ११ नंतर पावसाने उघडीप दिली असली, तरी सायंकाळनंतर पुन्हा हलक्या सरी कोसळल्या.या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला असून, कडक ऊनानंतर आता पाऊस सुरू झाल्याने तो पिकांच्या वाढीस पोषक ठरला आहे. गेले दोन दिवस पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यांत चांगला पाऊस झाला. इतर तालुक्यांत तुरळक पाऊस झाला असून, येत्या दोन दिवसांत पावसाचा हळूहळू जोर वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’ ईशान्य अरबी समुद्राच्या वर समुद्रसपाटीपासून ५.४ किलोमीटरपर्यंत आहे. त्याच्या प्रभावामुळे कोकण व गोव्यात मोठा पाऊस होईल. येत्या दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये-हातकणंगले-३, शिरोळ-१.१४, पन्हाळा-१९.८६, शाहूवाडी-३०.१७, राधानगरी-१०.१७, गगनबावडा-५२.५०, करवीर-३.६४, कागल-३.४३, गडहिंग्लज-निरंक, भुदरगड-२०.२०, आजरा-२.७५, चंदगड-३. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर