शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राजर्षी शाहू स्मृती जागर: शाहू महाराज यांचे धर्मविचार आजही क्रांतिकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 16:04 IST

संस्थान इंग्रजांच्या अंकीत असतानाही त्यांनी धर्मसुधारणेच्या प्रयत्नांना जे बळ दिले, त्यातून सत्यशोधक धर्माचा विचार कोल्हापुरात अधिक बळकट झाला. आजही याच विचारांमुळे कोल्हापूर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पुरोगामी म्हणून ओळखले जाते.

डॉ. देविकाराणी पाटील (लेखिका नव्या पिढीतील इतिहास संशोधक आहेत.)जो धर्म माणसाला माणसासारखे वागवतो तोच खरा धर्म, हे तत्त्वज्ञान शाहू महाराज खऱ्या अर्थाने जगले. मूळ धर्माला कोठेही धक्का न लावता त्यांनी काळाच्या पुढे जाऊन मांडलेला धर्म विचार आजच्या घडीलाही तितकेच दिशादर्शक, क्रांतिकारक आहेत. संस्थान इंग्रजांच्या अंकीत असतानाही त्यांनी धर्मसुधारणेच्या प्रयत्नांना जे बळ दिले, त्यातून सत्यशोधक धर्माचा विचार कोल्हापुरात अधिक बळकट झाला. आजही याच विचारांमुळे कोल्हापूर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पुरोगामी म्हणून ओळखले जाते. कोल्हापुरातील जाती-धर्मातील वीण घट्ट आहे, त्याचे मूळ शाहू महाराजांच्या धर्मविचारात सापडते. त्यांनी धर्मसुधारणेमध्ये केलेले कार्य काळाच्या खूप पुढे पाहणारे होते.शाहू महाराजांचे धार्मिक विचार त्यांच्या शालेय वयातच दिसू लागले. शिकत असताना १८९१ मध्ये अभ्यास सहलीच्या निमित्ताने ते बनारसला गेले. त्यांचे आवडते गुरु फ्रेझर सोबत होतेच. तेथील मणिकर्णिका कुंडात स्नान करूनच देवदर्शन, असा प्रघात होता; पण कुंडातील घाण पाणी पाहून शाहूंनी त्यामध्ये स्नानास नकार दिला. यावरून पुजाऱ्यांमध्ये खळबळ माजली; पण शाहू महाराज ठाम राहिले. धर्मातील अनिष्ठ चालीरितीवर प्रहार करण्याची शाहू महाराजांची ही सुरुवात होती. यावेळी त्यांचे वय होते १७ वर्षे. पुढे याच विचाराचे गारुड त्यांच्यावर राहिले.आपला धर्म तर सोडायचा नाही, पण त्यात इतर धर्मातील चांगल्या गोष्टींचा समावेश करून धर्माला अधिक मानवतावादी कसे करता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. देशात, राज्यात त्यावेळी सामाजिक सुधारणांचे वारे जोरात होते. धार्मिक चळवळी सुरू होत्या, धर्मातील अनिष्ठ चालीरितीविरोधात आवाज उठवला जात होता. शाहू महाराजांनी आर्यसमाज, प्रार्थना समाज, थिऑसॉफीकल सोसायटी यांच्या माध्यमातून धर्मसुधारणा सुरू केल्या. हे सुरू असतानाच त्यांना वेदोक्त प्रकरणाला सामोरे जावे लागले. यानंतर त्यांनी धर्मशुद्धीकरणाकडे अधिकच लक्ष दिले. भास्करराव जाधव यांना सत्यशोधक समाजाच्या प्रसारासाठी मदत केली.बहुजन समाजातील पुराेहित तयार व्हावेत म्हणून वैदिक स्कूल सुरू केले. शंकराचार्यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी तत्त्वज्ञानात पीएच.डी. मिळवलेले डॉ. कुर्तकोठी यांची नियुक्ती करून समानतेचा विचार कसा रुजेल, हे पाहिले; पण कुर्तकाेठी यांनी प्रवचनाला दलितांना कुंपणाबाहेरच बसवल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपण कोठींना ओळखण्यात चूक केल्याचे शाहू महाराजांच्या लक्षात आले. हा प्रयत्न फसल्यावर त्यांनी बहुजनातील एकाला क्षात्र जगदगुरु म्हणून बसवले. माणूस आणि देव यांच्यात दलाल म्हणून काम करायचे नाही. माणसांनी खांद्यावरून वाहून नेणाऱ्या पालखीत बसायचे नाही, अशा अटी घातल्या. जगदगुरुंना घोडागाडीची सोय करून दिली. असे अनेक पायंडे आहेत, जे काळाच्या पुढे जाऊन समाजसुधारक शाहू महाराज धर्मसुधारकही कसे होते, हे सिद्ध करतात.

अंबाबाई दर्शनासही होता विरोध

स्वत: राजा असतानादेखील शाहू महाराजांना अंबाबाई मंदिरात दर्शन देण्यावरून वाद निर्माण झाला. तत्कालीन प्रथांनुसार परदेश प्रवास करून आल्यावर माणसाची धर्मशुद्धी केली जात होती. समुद्र उल्लंघन करून आल्यावर केल्या जाणाऱ्या या विधीला शाहू महाराजांनी नकार दिला. यावरून त्यांना दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली; पण शाहू महाराज ठाम राहिले. वाद मिटवून पुढे दर्शनही सुरू राहिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती