शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

कोल्हापुरात पावसाची उघडझाप; पूर पाणीपातळीत घसरण; राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 11:47 IST

अद्याप ५५ मार्ग पाण्याखाली : पिके सलग दहा दिवस पाण्यात

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची उघडझाप राहिली. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. सद्या धरणातून प्रतिसेकंद १५०० घनफूट विसर्ग सुरु आहे. पाऊस कमी झाल्याने पंचगंगा नदीची पातळी हळूहळू कमी होत असून, ४०.५ फुटांपर्यंत आली आहे. नदीकाठची पिके सलग आठ दिवस पाण्याखाली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गेली दोन दिवस पाऊस काहीसा कमी आहे, तरीही दिवसभर उघडझाप असली, तरी रात्री अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. रविवारी सकाळी काहीकाळ ऊन पडले होते. दुपारनंतर पुन्हा जोरदार सरी कोसळल्या. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. सद्या धरणातून प्रतिसेकंद १५०० घनफूट विसर्ग सुरु आहे. वारणेतून ११ हजार ५७०, दूधगंगेतून ९ हजार २५० घनफूट पाणी बाहेर पडत असल्याने पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले आहे. साधारणत: तासाला एक इंचाने पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत आहे. नदीकाठची ऊस, भात, सोयाबीन पिके दहा दिवस पाण्याखाली असल्याने मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतित आहे.अद्याप ६८ बंधारे पाण्याखाली असल्याने एसटीचे २० मार्ग बंद आहेत, १० राज्य, तर ४५ प्रमुख जिल्हामार्ग, असे ५५ मार्ग बंद आहेत.

पडझडीत २२ लाखांचे नुकसानजिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत ७५ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये २२ लाख २३ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.पाणी संथगतीने कमी दिवसभरात पाऊस कमी झाला असला, तरी पुराचे पाणी एकदम संथगतीने कमी होत आहे. रविवारी दिवसभरात केवळ ६ इंचांनी पुराचे पाणी कमी झाले होते.

दृष्टिक्षेपात पाऊस :सध्याची पातळी : ४०.५ फूटबंधारे पाण्याखाली : ५८मार्ग बंद : ५५नुकसान : ७५ मालमत्तानुकसानीची रक्कम : २२ लाख २३ हजार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणradhanagari-acराधानगरी