शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला, २ हजार ८२८ क्युसेकने विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 15:54 IST

पुन्हा धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता, पंचगंगेच्या पातळीत तीन इंचांची वाढ

कोल्हापूर : जिल्ह्यात काल शुक्रवार पासून पावसाचा जोर ओसरला असून, नद्यांची पाणी पातळी स्थिरावली आहे. दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळीत केवळ ३ इंचांची वाढ झाली असून, ५३ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक काहीशी ठप्पच आहे. आगामी दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘यलो’ अलर्ट दिल्याने पाऊस कमी होईल असा अंदाज आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर केर्ली (ता. करवीर) येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने काल, शुक्रवारी या मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू होती.

धरण परिसरात पावसाचा जोर कमी असला तरी पाण्याची आवक सुरु असल्याने आज, शनिवारी पुन्हा राधानगरीधरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला. दुपारी १.१५ मिनिटांनी क्रमांक ६ हा दरवाजा खुला झाला. यातून १४२८ क्युसेकने विसर्ग सुरु आहे. तर पॉवर हाऊसमधून १४०० क्युसेक असा एकूण २८२८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.गुरुवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीची पातळी वाढू लागल्याने नागरिक चांगलेच धास्तावले होते. राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले राहिल्याने विसर्ग वाढल्याने पंचगंगा धोका पातळी गाठणार असे वाटत असतानाच अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवल्याने नद्यांची पातळी संथगतीने वाढत गेली. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे राधानगरी धरणाचे पाच ही दरवाजे बंद झाले. शुक्रवार पहाटे एक दरवाजा तर सायंकाळी ७:३० नंतर चार ही स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने विसर्ग कमी झाला होता. आज शनिवारी दुपारी पुन्हा एक स्वयंचलित दरवाजा खुला झाल्याने पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. महापुराचा धोका सध्यातरी कमी दिसत आहे. पुराच्या भीतीपोटी कोल्हापूर शहरातील स्थलांतरित केलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी सोडण्यास सुरुवात झाली असली तरी काही नागरिक आपल्या मूळ घरात जात नाहीत.

पडझडीत १२.४२ लाखांचे नुकसानशुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात विविध ठिकाणी ३८ खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये १२ लाख ४२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.अद्याप ३३ मार्ग बंदचजिल्ह्यातील विविध नद्यांना आलेल्या पुरामुळे राज्य मार्ग १० व प्रमुख जिल्हा मार्ग २३, असे ३३ मार्ग बंद आहेत. त्याशिवाय एसटीचेही अनेक मार्ग बंद राहिले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसradhanagari-acराधानगरीDamधरणriverनदी