शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

पावसाच्या एंट्रीने शेतकऱ्यांना दिलासा, अधूनमधून जोरदार सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:14 PM

कोल्हापूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेले १० दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. विशेषत: माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.

ठळक मुद्दे पावसाच्या एंट्रीने शेतकऱ्यांना दिलासा, अधूनमधून जोरदार सरीमाळरानावरील पिकांच्या तोंडात पाणी

कोल्हापूर : जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेले १० दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. विशेषत: माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात धुवाधार पावसाने लोकांना सळो की पळो करून सोडले होते. आता पाऊस नको नको म्हणत, पाऊस थांबविण्यासाठी देवाकडे साकडे घालण्याची वेळ आली होती. ११ आॅगस्टनंतर पाऊस हळूहळू कमी होत गेला; पण त्यानंतर एकदमच पावसाने दडी मारली. गेले १० दिवस खडखडीत ऊन पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत.माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. १० दिवसांपूर्वी अस्ताव्यस्त पसरलेल्या नद्या, ओढ्यांचे पाणी पात्रात जाऊन शांतपणे वाहू लागले आहे. नद्यांची पाणीपातळी एकदमच कमी झाली आहे. शिवारे कोरडी पडल्याने पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे.गुरुवार, शुक्रवारपासून पावसाचे वातावरण तयार होत गेले आणि अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. सकाळपासून मात्र वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरणासह दिवसभरात जोरदार सरी कोसळल्या. पावसाने पुन्हा एंट्री केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गगनबावड्यात अतिवृष्टीशुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८४.५९ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ७१ मिलिमीटर झाला आहे.तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असाहातकणंगले (०.६३), शाहूवाडी (१.६७), राधानगरी (२.००), गगनबावडा (७१.००), करवीर (१.३६), कागल (०.२९), गडहिंग्लज (२.४३), भुदरगड (१.८०), आजरा (२.२५), चंदगड (१.१७). 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरFarmerशेतकरी