शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस, मान्सून ५ जूनपर्यंत सक्रिय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:47 IST

खरिपपूर्व शेतमशागतीची कामे पूर्णत: खोळंबली

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाची रोज हजेरी असून आगामी तीन-चार दिवस असेच वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.गेली पाच-सहा दिवस जिल्ह्यात कोठे ना कोठे जोरदार पाऊस कोसळला. रविवारी पहाटेपासूनच आकाश गच्च झाले आणि हलक्या सरी सुरू झाल्या. सकाळी नऊपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर ऊन पडले आणि उष्मा जाणवू लागला. दिवसभर वातावरणात उष्मा होता, सायंकाळी पाचनंतर आकाश गच्च झाले. मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहरात पंधरा ते वीस मिनिटे एकसारखा पाऊस झाला. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा गारवा मिळाला असला, तरी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना कसरत करावी लागली.

मान्सून ५ जूनपर्यंत कोल्हापुरातमान्सूनला पूरक असेच सध्या वातावरण आहे. यंदा मान्सून लवकर सक्रिय होणार हे अगोदरच सांगितले आहे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषता कोल्हापुरात ५ ते ६ जून रोजी मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती हवामान साक्षरता अभियानाचे मुख्य प्रबंधक राहुल पाटील यांनी दिली.

गडहिंग्लज तालुक्याला वळवाने तासभर झोडपले, वीटभट्टी व्यावसायिक अडचणीतगडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्याला वळीव पावसाने रविवारी सायंकाळी तासभर झोडपून काढले. त्यामुळे शहरासह शेतशिवारात पाणीच पाणी पाहायला मिळाले. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे आठवडी बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांसह नागरिकांची भंबेरी उंडाली. वारंवार पडणाऱ्या वळवामुळे खरिपपूर्व शेतमशागतीची कामे पूर्णत: खोळंबली आहेत. मान्सूनच्या तोंडावरही वळवाने पाठ न सोडल्याने शेतमशागतीची कामे कशी करायची, या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे.मार्च ते मे या ऐन घरे बांधणीच्या हंगामातच वळवाने सतत तडाखा दिल्यामुळे यंदा तालुक्यातील वीटभट्टी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, वळवामुळे शेतकऱ्यांचे हुकमी पीक उसाला मोठी ताकद मिळाली असून अनेक भागांत मोठ्या डौलाने ऊस पिके तरारून आली आहेत. हुमणी कीड मरण्यास पाऊस उपयुक्त ठरत आहे.चिकोत्रा खोऱ्याला झोडपून काढलेपांगिरे : चिकोत्रा खोऱ्यात गेल्या दोन दिवसांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, वादळी वाऱ्यासह पावसाने सायंकाळी चिकोत्रा खोऱ्याला झोडपून काढले. रोहिणी जवळ आल्यामुळे येथील शेतकरी भात शेती तयार करण्यात सुरुवात केली आहे. काही वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पावसाचे गेले तीन दिवस वातावरण होते. चिकोत्रा खोऱ्यातील पांगिरे, पिंपळगाव, बारवे, मुरुक्टे, मानवळे, बामणे, नागणवाडी, हेळेवाडी, दिंडेवाडी, आदी गावांना पावसाने झोडपून काढले. मात्र, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे शेतीची कामे खोळंबळी आहेत. येथील शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरीfarmingशेती