शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विभागाचा प्रश्न लटकला

By admin | Updated: July 13, 2015 00:34 IST

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा प्रश्न : महासंघाच्या माध्यमातून ३० वर्षांचा लढा; शासनाचे दुर्लक्ष

संतोष मिठारी - कोल्हापूर -समितीची स्थापना, अभ्यासगटाची शिफारस होऊनदेखील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या स्वतंत्र विभागाचा प्रश्न अद्यापही रखडलेला आहे. विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीचा पर्याय असलेल्या संबंधित विभागाच्या स्थापनेसाठी कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांचा गेल्या ३० वर्षांपासून लढा सुरू आहे.जुनी अकरावी १९७६मध्ये बंद झाली. यावेळी ज्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जुनी अकरावी होती, तेथे बारावी सुरू करण्यास तसेच प्री-डिग्री असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयांत बारावी सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली. यात हायस्कूल आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची विभागणी झाली. त्यामुळे विद्यार्थीसंख्या, तासिकांची वेळ, शिक्षकांची पदे यांच्यात असमानता निर्माण झाली. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर झाला. त्यावर गेल्या ३० वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने हायस्कूल आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अडकलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या कामकाजात एकजिनसीपणासाठी स्वतंत्र विभागाची मागणी केली. शासनाच्या शिक्षण विभागाला निवेदने दिली, चर्चा केली. आंदोलनाचा जोर वाढल्याने शासनाने वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांना माध्यमिक शाळा संहिता लागू केली. मात्र, स्वतंत्र विभागाचा प्रश्न ‘जैसे थे’ राहिला. त्यानंतर स्वतंत्र विभागासाठी महासंघाचा लढा सुरूच राहिला. याबाबतची महासंघाची सकारात्मक भूमिका लक्षात घेऊन तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने स्वतंत्र विभाग स्थापनेसाठी पाचसदस्यीय समिती स्थापन केली. समितीच्या दोन बैठका झाल्या. मात्र, त्यानंतर सरकार बदलल्याने पुढील कार्यवाही ठप्प झाली. नव्या भाजप-शिवसेना सरकारला स्वतंत्र विभागासह विविध प्रलंबित प्रश्नांची माहिती व्हावी यासाठी महासंघाने एक वर्षाची मुदत दिली. त्यानंतर सरकारकडून आश्वासने मिळाली. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाही काहीच झाली नाही. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी स्वतंत्र विभागाची स्थापना महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.विभाग केल्यास बोजा पडणार नाही...तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित अशा एकूण ७ हजार ५०० कनिष्ठ महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विभाग स्थापनेबाबत समिती स्थापन केली. तिच्या दोन बैठका झाल्या असल्याचे कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे सचिव प्रा. ए. एस. तळेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, समितीच्या अभ्यासगटाने राज्यातील चार हजार कनिष्ठ महाविद्यालयांसाठी प्राचार्य व शिक्षकेतर संवर्गातील पदे नेमावी लागणार असल्याचा शेरा दिला आहे. मात्र, चार हजारांपैकी प्रत्यक्षात महाविद्यालयांमध्ये दोन हजार प्राध्यापक हे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांना निव्वळ पदोन्नती द्यावी लागणार आहे. उरला प्रश्न शिक्षकेतर संवर्गातील पदांचा. संबंधित पदे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असून, ती निव्वळ वर्ग करावी लागणार आहेत. त्यामुळे विभाग केल्यास त्याचा बोजा शासनावर पडणार नाही. शिवाय महाविद्यालयीन शिक्षणातील अकरावी आणि बारावीचा पाया भक्कम होईल.