शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

वाळू ठेकेदारांचे प्रस्ताव स्वातंत्र्यदिनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 31, 2015 22:50 IST

ग्रामसभाकडे लक्ष : शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीतून वाळू उपसा करण्याचे तब्बल ७२ प्रस्ताव

संदीप बावचे - शिरोळ -तालुक्यातील कृष्णा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी तब्बल ७२ प्रस्ताव गौण खनिज विभागास प्राप्त झाले आहेत. वाळू उपशाच्या परवानगीसाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असल्याने तो मंजुरीचा प्रयत्न १५ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामसभेत ठेकेदारांकडून होणार आहे. यंदाही लघुत्तम किमती वाढणार असल्यामुळे वाळू पुन्हा महागच होणार आहे.जिल्ह्यात वाळूचे केंद्र म्हणून शिरोळ तालुक्याला ओळखले जाते. कृष्णा नदीपात्रातील वाळू म्हणजे काळं सोनं म्हणून नावारूपास आले आहे. तालुक्यातून औरवाडसह गौरवाड, कवठेगुलंद, आलास, बुबनाळ, उदगांव, चिंचवाड, कोथळी, राजापूर, अकिवाट, खिद्रापूर, कवठेसार आदी ठिकाणांहून वाळूचे प्लॉट काढले जातात. २५ लाखांपासून काही कोटींपर्यंत प्लॉटचे लिलाव बोलले जातात. असे असले तरी शिरोळ तालुक्यातील ठेकेदारांना वाळू तस्करी नवीन नाही. वाळूचा एक प्लॉट घ्यायचा व बेकायदेशीर अनेक प्लॉट सुरू करायचे यात ठेकेदारांचा हातखंडा आहे. चालू वर्षी तर वाळू तस्करांनी अक्षरश: नदी पात्रात बोटींचे तळच टाकल्याचे चित्र होते. वाळूचे प्लॉट बदलण्याचे प्रकारही अनेक ठिकाणी झाले होते. शिवाय पावसाने दडी मारल्याने मोेठ्या प्रमाणात वाळू उपसा झाला. तसेच वाळू साठ्यांचे अनेक बेकायदेशीर साठे ठेकेदारांनी केले आहेत. आता नव्याने होणाऱ्या वाळू उपसा परवान्यासाठी तब्बल ७२ प्रस्ताव गौण खनिज विभागास आले आहेत. हे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. वाळू उपसाच्या परवान्यासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असल्याने तो मंजूर करण्यासाठी वाळू तस्करांचा प्रयत्न असणार आहे. विशेषकरून नदी पलीकडील सात गावातील तस्करांचा प्रयत्न असणार आहे.गतवर्षी लघुत्तम किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे सुमारे दोन कोटी रूपयांपर्यंत एका वाळू प्लॉटचा लिलाव झाला. अव्वाच्या सव्वा असा लघुत्तम किमतीचा दर म्हणणाऱ्या वाळू ठेकेदारांनी कोटीचे प्लॉट घेतले होते. यामुळे वाळू व्यवसायातून निश्चितच मोठा फायदा ठेकेदारांना होतो हे उघड झाले आहे. गतवर्षी ९० पेक्षा अधिक वाळू साठ्यांचे प्रस्ताव गौण खनिज विभागाला प्राप्त झाले होते. यंदा कमी प्रमाणात प्रस्ताव आले आहेत. चालूवर्षी मोठ्या प्रमाणात वाळू तस्करीमुळे अनेक ठेकेदारांचे उखळ पांढरे झाल्यामुळे वाळूचे प्रस्ताव कमी आल्याची चर्चा आहे. येणाऱ्या हंगामात तस्करी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.