शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

पुराने वेढलेल्या १३ गावांच्या स्थलांतराचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 10:36 IST

महापुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढले गेलेल्या जिल्ह्यातील १३ गावांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून या १३ गावांमध्ये गावसभा घेऊन ग्रामस्थांचे मत जाणून घेतले जात आहे; मात्र बहुतांशी ठिकाणी ग्रामस्थांनी गाव सोडण्याची मानसिकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देपुराने वेढलेल्या १३ गावांच्या स्थलांतराचा प्रस्तावगावसभांचे आयोजन, मात्र गाव सोडण्यास ग्रामस्थ नाखूश

समीर देशपांडे

कोल्हापूर : महापुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढले गेलेल्या जिल्ह्यातील १३ गावांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून या १३ गावांमध्ये गावसभा घेऊन ग्रामस्थांचे मत जाणून घेतले जात आहे; मात्र बहुतांशी ठिकाणी ग्रामस्थांनी गाव सोडण्याची मानसिकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.जिल्ह्यातील २४९ गावे सुरुवातीच्या टप्प्यात पूरबाधित होती. तो आकडा आता ३८६ वर गेला आहे. यामधील २७ गावांचा संपर्क तुटला होता, तर १३ हून अधिक गावे चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेली होती. या गावांची अवस्था इतकी बिकट झाली होती, की शेवटच्या टप्प्यात ग्रामस्थांना गावाबाहेर काढणेही जिकीरीचे बनले होते. काही ठिकाणी ग्रामस्थांनी जनावरे असल्याने बाहेर पडण्यास नकार दिल्यानंतर त्यांना जीवनावश्यक वस्तूही पोहोचविण्यात आल्या.पूर ओसरल्यानंतर मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने हालचाली सुरू ठेवल्या आहेत. पूर कमी आला आहे, म्हणून निवांत न राहता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तातडीने जिल्ह्यातील प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना आदेश काढून जिल्ह्यातील १३ गावांच्या पुनर्वसनासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.या गावांमध्ये सन १९८९, २00५ आणि २0१९ मध्ये आलेल्या पुरात गावातील घरांमध्ये किती प्रमाणात पाणी जाऊन हानी झाली आहे, किती घरे पूर्ण, अंशत: पडलेली आहेत आणि किती राहण्यास योग्य नाहीत, याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून, गावामध्ये पुराने झालेली हानी त्याचप्रमाणे स्थलांतरित होण्याबाबतची तयारी विचारात घेऊन पुनर्वसन करण्याबाबत अहवाल द्यावा, तसेच संपूर्ण गाव स्थलांतरित होण्यासाठी तयार नसल्यास अतिपूरबाधित ठिकाणे किंवा विशिष्ट भागातील ग्रामस्थ पुनर्वसनासाठी तयार आहेत का? याची पाहणी करण्याचे आदेश दौलत देसाई यांनी दिले आहेत.या गावांच्या स्थलांतराचा प्रस्तावकरवीर तालुक्यातील आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे, तर शिरोळ तालुक्यातील टेकवाडी, खिद्रापूर, राजापूरवाडी, हसूर, राजापूर, अर्जुनवाड, कुटवाड, बस्तवाड, निलेवाडी, कनवाड.ग्रामस्थांचा संपूर्ण स्थलांतरास विरोधज्या गावांमध्ये पिढ्यान्पिढ्या गेल्या, ते गाव जमीन जुमला सोडून जाण्यासाठी मात्र ग्रामस्थ तयार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी गावसभांमध्ये स्थलांतरासाठी विरोधही होत आहे. शासन देणार एक-दीड गुंठा जागा. आम्ही घर, जनावरे एवढ्यात कशी बांधायची असेही ग्रामस्थांचे काही मुद्दे आहेत. वर्षानुवर्षे नांदणारे घर सोडून पूरकाळातील आठ-१0 दिवसांसाठी परक्या ठिकाणी पुन्हा नवी सुरुवात करण्याची ग्रामस्थांची मानसिकता नसल्याचे स्पष्ट होत आहे.

महापुरामुळे पूर्णपणे वेढल्या गेलेल्या गावांच्या स्थलांतराबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेतली जात आहेत. या ग्रामस्थांचे सुरक्षित पुनर्वसन करण्याची शासनाची भूमिका आहे; परंतु त्यासाठी त्यांची कितपत तयारी आहे, याचाही विचार होण्याची गरज आहे. म्हणूनच माझ्या विभागाचे अधिकारी गावोगावी गावसभा घेत आहेत. त्यांचे अहवाल आल्यानंतर पुढच्या प्रक्रियेची दिशा ठरवली जाईल.दौलत देसाईजिल्हाधिकारी, कोल्हापूर 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरcollectorजिल्हाधिकारी