शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

कंबरडे मोडले । कोल्हापूर जिल्ह्यात साडेचार हजार पोल्ट्रीधारक; १५ कोटींची मासिक उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 4:31 PM

नसीम सनदी । कोल्हापूर : कोरोना विषाणूपेक्षा कित्येक पटीने अधिक वेगाने पसरलेल्या अफवेने पोल्ट्री व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे. लाखो ...

ठळक मुद्देकोंबडीचा उत्पादन खर्च ७० रुपये येत असताना केवळ १० रुपये किलो या दराने विकावे लागत आहे.आम्ही अक्षरश: रस्त्यावर आलो आहे.

नसीम सनदी ।कोल्हापूर : कोरोना विषाणूपेक्षा कित्येक पटीने अधिक वेगाने पसरलेल्या अफवेने पोल्ट्री व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे. लाखो रुपये गुंतवून लखपती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यावसायिकांवर अक्षरश: रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. कर्जाचा डोंगर फेडायचा कसा असा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

बेरोजगारी आणि बेभरवशाच्या शेतीमुळे अनेक तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळले, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला; पण कोणताही विषाणू आला की त्याचा पहिला बळी पोल्ट्रीच पडत आहे. स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू ही त्याचीच काही अलीकडची उदाहरणे आहेत. जिल्ह्यात ४५०० पोल्ट्रीधारक आहेत. महिन्याची उलाढाल १५ कोटींच्या घरात आहे. गेल्या १५ दिवसांपासून चिकन खाऊच नये असा अप्प्रचार झाल्याने चिकन विक्री आणि मागणी निम्म्यावर आली आहे. दर निम्म्याने कमी झाले आहेत, जिवंत कोंबडी दराने तर कहरच केला आहे. ज्या कोंबडीचा उत्पादन खर्च ७० रुपये येत असताना केवळ १० रुपये किलो या दराने विकावे लागत आहे.

चिकनची मागणीच नसल्याने कोंबड्यांचा उठाव थंडावला आहे. या पक्ष्यांच्या खाण्या-पिण्याचा खर्च अंगावर पडत आहे. हा खर्च मिळणा-या उत्पन्नापेक्षा जास्त होत असल्याने कोंबड्यांच्या आठवडी बाजारात १०० रुपयांना ३ ते ४ याप्रमाणे विकण्याची पाळी पोल्ट्रीधारकांवर आली आहे. काही ठिकाणी तर फुकट विक्री सुरू आहे. आरोग्यमंत्री व राज्य शासनातर्फे चिकनमुळे कोरोना होत नाही, असे वारंवार स्पष्ट केले आहे, तरीदेखील अफवा पसरविणे सुरूच आहे. त्याचा फास पोल्टीधारकांच्या गळ््याला लागला आहे.

नागरिकांचा दुटप्पीपणाचिकन विकत आणायचे म्हटले तर कोरोना विषाणू आहे, असे सांगणारे ते कमी दरात आणि फुकटात मिळत आहे म्हटल्यावर घेऊन खाताना दिसत आहेत. या प्रवृत्तीमुळे मात्र पोल्ट्रीधारक अक्षरश: खड्ड्यात गेले आहेत.शेतकरी संघटनेने कर्जमाफी व नुकसानभरपाईची मागणी केली आहे. होणारे नुकसान मोठे असल्याने ही माफी मिळायला हवी म्हणून स्वाभिमानीने थेट मुख्यमंत्री यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनीही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला आहे.फायदा राहू दे; खर्चही अंगावरएकेक पोल्ट्रीमध्ये ३ ते ८ हजार पक्षी असतात. त्यासाठी १० ते २० लाखांचा खर्च येतो. रोजचा खर्च किमान १५ हजारांचा असतो.कोरोनामुळे फायदा राहू दे, घातलेला खर्चही निघत नसल्याने पोल्ट्री व्यवसाय आतबट्ट्यात आला आहे.

 

आम्ही अक्षरश: रस्त्यावर आलो आहे. ६० दिवसांत कंपनी कोंबड्या घेऊन जात होती; आता ८० दिवस झाले तरी उचल होत नाही. त्यामुळे खाद्यावरचा खर्च दुपटीने वाढला आहे.- विनायक क्षीरसागर, पोल्ट्रीधारक

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस