शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

रुग्णांवर उपचार कमी, हेळसांडच जास्त : हातकणंगले तालुक्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:24 IST

प्राथमिक आरोग्य केंद्राकडील डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस, आजारावरील थातूरमातूर उपचारपद्धती, आरोग्य केंद्राकडील अपुरा औषधसाठा, कर्मचाऱ्यांची अरेरावी, शहराच्या ठिकाणी रुग्णाला पाठविताना डॉक्टराची लिंकिंग पद्धत, चाचण्यांसाठी रुग्णांची होणारी दमछाक आणि लूट

ठळक मुद्देअपुरा औषधसाठा, कर्मचाऱ्यांची अरेरावीरुग्णाला खासगी रुग्णालयात पाठविताना डॉक्टराची लिंकिंग पद्धत

दत्ता बिडकर ।हातकणंगले : प्राथमिक आरोग्य केंद्राकडील डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस, आजारावरील थातूरमातूर उपचारपद्धती, आरोग्य केंद्राकडील अपुरा औषधसाठा, कर्मचाऱ्यांची अरेरावी, शहराच्या ठिकाणी रुग्णाला पाठविताना डॉक्टराची लिंकिंग पद्धत, चाचण्यांसाठी रुग्णांची होणारी दमछाक आणि लूट यामुळे ‘डॉक्टर तुमचे उपचार आवरा’ म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील रुग्णांवर आली आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये होणारी रुग्णांची लूट पाहता ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे गोरगरिबांची जीवनदायी म्हणून पाहिले जाते. अवघ्या दोन रुपयांत सलाईन-औषधपासून रक्त-लघवी तपासणी तसेच महिलांच्या सोनोग्राफी व बाळंतपणापासून सर्व प्रकारच्या लसीकरणाचे उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देण्याची सुविधा शासनाकडून सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या गोरगरिबांची थट्टा सुरू असते.

डॉक्टराच्या शहरी कनेक्शनमुळे रुग्णाची ससेहोलपाटे मात्र थांबलेली नाही. किरकोळ आजारापासून मोठ्या आजारांवरील उपचारासाठी ग्रामीण भागातील रुग्णांना आजही डॉक्टरांच्या लिंकिंग पद्धतीमुळे शहराचा आधार घ्यावा लागत आहे.

तालुक्यामध्ये आळते, सावर्डे, भादोले, अंबप, शिरोली, हेरले, साजणी, पट्टणकोडोली आणि हुपरी अशी ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुकडी व कुंभोज येथे दोन आरोग्य पथके, तर हातकणंगले, नवे पारगाव येथे ग्रामीण रुग्णालये आहेत. ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती सुसज्ज आहेत. सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची संख्या पुरेशी आहे. मात्र, काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिला आरोग्य सेविकेच्या सहा जागा रिक्त आहेत. पुरुष आरोग्य सेवकाचीही एक जागा रिक्त आहे.

तालुक्यात सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये परिचरच्या जागा रिक्त आहेत. चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वाहनचालकच नसल्यामुळे महिलांसह गंभीर रुग्णांची गैरसोय होते. आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना डॉक्टरांकडून लिहून दिलेल्या बाहेरील औषधांवरच गुजराण करावी लागते. ग्रामीण भागातील एका केंद्रामध्ये दिवसाला सरासरी ७५ पासून १२५ रुग्णांवर उपचार केले जातात.सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्वच्छता रामभरोसे आहे. कंत्राटी स्विपरच्या नेमणुकी केल्या आहेत, मात्र त्यांच्या पगाराच्या अपेक्षा आणि त्यांच्या कामाची व्याप्ती पाहता ते आरोग्य केंद्राची स्वच्छता नाममात्रच करत असल्याचे चित्र सर्वच ठिकाणी पाहावयास मिळते.

गरोदर स्त्रियांना रक्तवाढीच्या गोळ्या, गरोदर स्त्रियांची एक वेळ मोफत सोनोग्राफी आणि मोफत बाळंतपणाची सोय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होत असल्याने आजही महिला रुग्णांचा ओघ या केंद्रांकडे वाढत आहे. येथे मलेरिया, डेंग्यू, लहान मुलांचे रोटाव्हारस, पोलिओ यासह इतर सर्व प्रकारची लसीकरण सुविधा मोफत असल्याने रुग्णांना चांगली सेवा मिळावी हीच येणाºया रुग्णाची अपेक्षा असते. आजही गंभीर आजाराच्या रुग्णांना रक्त आणि लघवीच्या तपासण्यांसाठी बाहेरील पॅथॅलॉजिस्टकडे पदरमोड करावी लागत आहे. शासनाने अशा चाचण्या बाहेरील पॅथॅलॉजिस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बोलावून मोफत कराव्यात अशा सूचना करूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण भागासाठी जीवनदायी ठरावीत अशी माफक आशा रुग्णांना आहे. मात्र, तीच अपेक्षा फोल ठरत आहे.

ग्रामीण भागात दूषित पाणी ही आरोग्याची प्रमुख समस्या आहे. प्रत्येक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये आठ आठ दिवसाला पिण्याच्या पाण्याचे नमुने ग्रामपंचायतीकडून पुरवठा होत असलेल्या स्रोतामधून घ्यावेत. त्यांची प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून ग्रामपंचायतींना दूषित पाणी, आजार पसरण्याची कारणे, साथीच्या आजाराबाबत पूर्वसूचना देण्याची यंत्रणा, पाण्यात टाकण्यात येणारे टिशेलचे प्रमाण याबाबत मार्गदर्शन करण्याची यंत्रणा सर्वच आरोग्य केंद्र व उपकेंद्रांकडे आहे. मात्र, आरोग्य केंद्रातील कर्मचारी कागदोपत्री रेकॉर्ड करून सर्व काही अलबेल असल्याचे दाखवितात. एखाद्या गावात आजाराची साथ सुरू झाली की मग यंत्रणा जागी होते. हीच आरोग्यसेवा वेळच्यावेळी दिली तर आरोग्य विभागाची विश्वासार्हता वाढेल.क्षयरोगमुक्त गाव अभियानतालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. पाटील यांनी तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने सध्या क्षयरोगमुक्त गाव अभियान सुरू केले आहे. त्यानुसार तालुक्यातील लाटवडे, वाठार तर्फ वडगाव, हिंगणगाव, मौजे वडगाव, मुडशिंगी, साजणी, यळगूड या सात गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर क्षयरोगमुक्त गाव अभियान सुरू आसल्याचे सांगितले. तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मोफत सोयी-सुविधा आणि उपचाराच्या पद्धतीमुळे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आकर्षित होत असल्याचे सांगितले.आरोग्य केंद्रांचे ‘आरोग्य’

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर