शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

रुग्णांवर उपचार कमी, हेळसांडच जास्त : हातकणंगले तालुक्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:24 IST

प्राथमिक आरोग्य केंद्राकडील डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस, आजारावरील थातूरमातूर उपचारपद्धती, आरोग्य केंद्राकडील अपुरा औषधसाठा, कर्मचाऱ्यांची अरेरावी, शहराच्या ठिकाणी रुग्णाला पाठविताना डॉक्टराची लिंकिंग पद्धत, चाचण्यांसाठी रुग्णांची होणारी दमछाक आणि लूट

ठळक मुद्देअपुरा औषधसाठा, कर्मचाऱ्यांची अरेरावीरुग्णाला खासगी रुग्णालयात पाठविताना डॉक्टराची लिंकिंग पद्धत

दत्ता बिडकर ।हातकणंगले : प्राथमिक आरोग्य केंद्राकडील डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस, आजारावरील थातूरमातूर उपचारपद्धती, आरोग्य केंद्राकडील अपुरा औषधसाठा, कर्मचाऱ्यांची अरेरावी, शहराच्या ठिकाणी रुग्णाला पाठविताना डॉक्टराची लिंकिंग पद्धत, चाचण्यांसाठी रुग्णांची होणारी दमछाक आणि लूट यामुळे ‘डॉक्टर तुमचे उपचार आवरा’ म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील रुग्णांवर आली आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये होणारी रुग्णांची लूट पाहता ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे गोरगरिबांची जीवनदायी म्हणून पाहिले जाते. अवघ्या दोन रुपयांत सलाईन-औषधपासून रक्त-लघवी तपासणी तसेच महिलांच्या सोनोग्राफी व बाळंतपणापासून सर्व प्रकारच्या लसीकरणाचे उपचार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देण्याची सुविधा शासनाकडून सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या गोरगरिबांची थट्टा सुरू असते.

डॉक्टराच्या शहरी कनेक्शनमुळे रुग्णाची ससेहोलपाटे मात्र थांबलेली नाही. किरकोळ आजारापासून मोठ्या आजारांवरील उपचारासाठी ग्रामीण भागातील रुग्णांना आजही डॉक्टरांच्या लिंकिंग पद्धतीमुळे शहराचा आधार घ्यावा लागत आहे.

तालुक्यामध्ये आळते, सावर्डे, भादोले, अंबप, शिरोली, हेरले, साजणी, पट्टणकोडोली आणि हुपरी अशी ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुकडी व कुंभोज येथे दोन आरोग्य पथके, तर हातकणंगले, नवे पारगाव येथे ग्रामीण रुग्णालये आहेत. ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारती सुसज्ज आहेत. सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची संख्या पुरेशी आहे. मात्र, काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिला आरोग्य सेविकेच्या सहा जागा रिक्त आहेत. पुरुष आरोग्य सेवकाचीही एक जागा रिक्त आहे.

तालुक्यात सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये परिचरच्या जागा रिक्त आहेत. चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वाहनचालकच नसल्यामुळे महिलांसह गंभीर रुग्णांची गैरसोय होते. आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना डॉक्टरांकडून लिहून दिलेल्या बाहेरील औषधांवरच गुजराण करावी लागते. ग्रामीण भागातील एका केंद्रामध्ये दिवसाला सरासरी ७५ पासून १२५ रुग्णांवर उपचार केले जातात.सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्वच्छता रामभरोसे आहे. कंत्राटी स्विपरच्या नेमणुकी केल्या आहेत, मात्र त्यांच्या पगाराच्या अपेक्षा आणि त्यांच्या कामाची व्याप्ती पाहता ते आरोग्य केंद्राची स्वच्छता नाममात्रच करत असल्याचे चित्र सर्वच ठिकाणी पाहावयास मिळते.

गरोदर स्त्रियांना रक्तवाढीच्या गोळ्या, गरोदर स्त्रियांची एक वेळ मोफत सोनोग्राफी आणि मोफत बाळंतपणाची सोय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होत असल्याने आजही महिला रुग्णांचा ओघ या केंद्रांकडे वाढत आहे. येथे मलेरिया, डेंग्यू, लहान मुलांचे रोटाव्हारस, पोलिओ यासह इतर सर्व प्रकारची लसीकरण सुविधा मोफत असल्याने रुग्णांना चांगली सेवा मिळावी हीच येणाºया रुग्णाची अपेक्षा असते. आजही गंभीर आजाराच्या रुग्णांना रक्त आणि लघवीच्या तपासण्यांसाठी बाहेरील पॅथॅलॉजिस्टकडे पदरमोड करावी लागत आहे. शासनाने अशा चाचण्या बाहेरील पॅथॅलॉजिस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बोलावून मोफत कराव्यात अशा सूचना करूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण भागासाठी जीवनदायी ठरावीत अशी माफक आशा रुग्णांना आहे. मात्र, तीच अपेक्षा फोल ठरत आहे.

ग्रामीण भागात दूषित पाणी ही आरोग्याची प्रमुख समस्या आहे. प्रत्येक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये आठ आठ दिवसाला पिण्याच्या पाण्याचे नमुने ग्रामपंचायतीकडून पुरवठा होत असलेल्या स्रोतामधून घ्यावेत. त्यांची प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून ग्रामपंचायतींना दूषित पाणी, आजार पसरण्याची कारणे, साथीच्या आजाराबाबत पूर्वसूचना देण्याची यंत्रणा, पाण्यात टाकण्यात येणारे टिशेलचे प्रमाण याबाबत मार्गदर्शन करण्याची यंत्रणा सर्वच आरोग्य केंद्र व उपकेंद्रांकडे आहे. मात्र, आरोग्य केंद्रातील कर्मचारी कागदोपत्री रेकॉर्ड करून सर्व काही अलबेल असल्याचे दाखवितात. एखाद्या गावात आजाराची साथ सुरू झाली की मग यंत्रणा जागी होते. हीच आरोग्यसेवा वेळच्यावेळी दिली तर आरोग्य विभागाची विश्वासार्हता वाढेल.क्षयरोगमुक्त गाव अभियानतालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. पाटील यांनी तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने सध्या क्षयरोगमुक्त गाव अभियान सुरू केले आहे. त्यानुसार तालुक्यातील लाटवडे, वाठार तर्फ वडगाव, हिंगणगाव, मौजे वडगाव, मुडशिंगी, साजणी, यळगूड या सात गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर क्षयरोगमुक्त गाव अभियान सुरू आसल्याचे सांगितले. तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मोफत सोयी-सुविधा आणि उपचाराच्या पद्धतीमुळे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आकर्षित होत असल्याचे सांगितले.आरोग्य केंद्रांचे ‘आरोग्य’

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर