शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी, कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर केर्लीजवळ आले पुराचे पाणी; ४ राज्यमार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 14:34 IST

वाहतूक विस्कळीत, कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी धुवाधार पाऊस कोसळत असून, सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तब्बल ७९ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, तळकोकणाला जोडणाऱ्या कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने बंद झाला आहे. 

कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर केर्लीजवळ पाणी आल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. पाणी पातळीत वाढ झाल्यास चारपर्यंत वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीने ४०.०६ फुटांची पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकर धास्तावले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, रात्रभर एकसारखा पाऊस सुरू राहिला. मंगळवारी सकाळपासूनही पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. धरण क्षेत्रात चोवीस तासांत सरासरी १५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील १३९ शाळा बंदजिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीचे मार्ग बंद झाले आहेत. पूर परिस्थितीमुळे भुदरगड तालुक्यातील ९,  गगनबावडा ४६, करवीर ५, पन्हाळा ३४ राधानगरी ३० व शाहूवाडी तालुक्यातील १५ अशा एकूण १३९ शाळा आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी बंद आहेत. याबाबत जिल्हा स्तरावरुन वारंवार आढावा घेतला जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी दिली.

राधानगरी धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे बंद

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून धरणाच्या एकूण स्वयंचलित ७ दरवाजांपैकी ४ दरवाजे बंद झाले आहेत. सध्या ३ दरवाजे खुले आहेत. स्वयंचलित द्वार क्र. ३, ६ व ७ मधून  ४२८४ क्युसेक्स व बीओटी पॉवर हाऊस मधून १५०० क्युसेक्स असा एकूण ५७८४ क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.४ राज्यमार्ग बंद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सुरू आहेत. राज्यमार्ग ४ बंद झाले असून १२ प्रमुख जिल्हा मार्ग, तर एक इतर जिल्हा मार्ग आणि १० ग्रामीण मार्ग असे एकूण ११ रस्ते बंधाऱ्यावर, रस्त्यावर पाणी आल्यामुळे बंद आहेत. बंद असलेल्या मार्गासाठी पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे.सहा तासांत पंचगंगेच्या पातळीत दोन फुटांनी वाढमंगळवारी सकाळी आठपासूनच्या सहा तासांत पंचगंगेच्या पातळीत दोन फुटांनी वाढ झाली. तर पंधरा बंधारे पाण्याखाली गेलेत.

६८ मालमत्तांची पडझडमंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ६८ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये ३२ लाखांचे नुकसान झाले आहे.

एसटीचे ८ मार्ग ठप्पएसटी महामंडळाला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. काेल्हापूर ते गगनबावडा, वाळवा ते बाचणी, गडहिंग्लज ते ऐनापूर आदी ८ मार्गांवरील वाहतूक बंद आहे.

धामणी खोऱ्याला बेटाचे स्वरूपधामणी खोऱ्यातील बंधारे पाण्याखाली गेल्याने म्हासुर्ली, गवशी, अंबर्डे, पनोरे आदी गावांचा बेटाचे स्वरुप आले आहे.