शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका हद्दीत १० हजारांवर पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 11:51 IST

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराचा महापालिका हद्दीतील नागरिकांना तसेच उद्योजक, व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्याच्या मूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. महसूल विभागातर्फे १० हजार १६० पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यापैकी ९२१४ पूरग्रस्तांना आतापर्यंत चार कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचे अनुदान वाटप झाले असून, उर्वरित पूरग्रस्तांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरूच आहे.

ठळक मुद्देमहापालिका हद्दीत १० हजारांवर पंचनामे पूर्ण९२१४ पूरग्रस्तांना साडेचार कोटींचे अनुदान वाटप

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराचा महापालिका हद्दीतील नागरिकांना तसेच उद्योजक, व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्याच्या मूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. महसूल विभागातर्फे १० हजार १६० पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यापैकी ९२१४ पूरग्रस्तांना आतापर्यंत चार कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचे अनुदान वाटप झाले असून, उर्वरित पूरग्रस्तांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरूच आहे.कोल्हापूर शहराचे कधी नव्हे इतके मोठे नुकसान अतिवृष्टी व महापुरामुळे झाले आहे. अनेक कुटुंबांनी या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न सुरू केला असला, तरी शेकडो उद्योजक व व्यावसायिक या नुकसानीतून पुन्हा उभे राहणे अवघड आहे. शहर हद्दीत झालेल्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे काम पुणे महानगरपालिका उपायुक्त संतोष भोर यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी महापालिका, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जलदगतीने आतापर्यंत १० हजार १६० पंचनामे पूर्ण केले आहेत.

अद्याप काही नागरिक घरात पोहोचले नसल्याने पंचनामे पूर्ण व्हायचे आहेत. ९२१४ पूरग्रस्तांना चार कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचे अनुदान वाटप पूर्ण झाले असून, अद्याप ८०० पूरग्रस्तांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येकांना रोखीने पाच हजार देण्यात आले, तर १0 हजार बॅँक खात्यावर जमा केले जाणार आहेत.यापुढे महापुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन केले जाणार असून, त्याची जबाबदारी कोल्हापूर महानगरपालिकेचे उपशहर अभियंता रमेश मस्कर यांच्याकडे देण्यात आली असून, त्यांना आयकर विभाग, जीएसटीचे कर्मचारी देण्यात आले आहेत.महापुरामुळे १0 हजारांवर कुटुंबे बाधित झाली असून, सर्वांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. औद्योगिक वसाहतीतील १७ उद्योजकांची न भरून निघणारी हानी झाली आहे. प्रत्येक पूरग्रस्तांना कमीत कमी ५0 हजारांपासून ते ३0-४0 लाखांपर्यंत पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. अनेक कुटुंबांच्या घरातील टी. व्ही. फ्रीज, वॉशिंगमशिन, इलेक्ट्रीक उपकरणे, गाद्या, संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले.पूर ओसरल्यानंतर महसूल विभागातर्फे शहरातील ८५७९ पूरग्रस्त कुटुंबांना १0 किलो तांदूळ व १0 किलो गहू देण्यात आला, तर सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने ६७७७ पूरग्रस्तांना २३ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. ज्यांची पूर्ण घरे पडली, त्यांना प्रत्येकी ९५ हजार १०० रुपये, तर ज्यांची अंशत: घरे पडली, त्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

महापुरात झालेली हानी

  • अंशत: पडलेली घरे-२७५
  •  पूर्णत: पडलेली घरे-४०
  •  पूरबाधित व्यावसायिक दुकानांची संख्या-२२०८
  •  पूरबाधित कारागीरांची संख्या- ४१३
  • पूरबाधित उद्योजकांची संख्या- १७

 

महापुरामुळे शहरातील कुटुंबे, व्यावसायिक, उद्योजक यांचे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात असून, त्याचे मूल्यांकन सुरू झाले आहे. तातडीची मदत म्हणून पंचनामे करतेवेळी प्रत्येकी पाच हजार रुपये, तसेच धान्यवाटप केले.- संतोष भोर, उपायुक्तपुणे महानगरपालिका

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर