शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महापालिका हद्दीत १० हजारांवर पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 11:51 IST

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराचा महापालिका हद्दीतील नागरिकांना तसेच उद्योजक, व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्याच्या मूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. महसूल विभागातर्फे १० हजार १६० पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यापैकी ९२१४ पूरग्रस्तांना आतापर्यंत चार कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचे अनुदान वाटप झाले असून, उर्वरित पूरग्रस्तांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरूच आहे.

ठळक मुद्देमहापालिका हद्दीत १० हजारांवर पंचनामे पूर्ण९२१४ पूरग्रस्तांना साडेचार कोटींचे अनुदान वाटप

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराचा महापालिका हद्दीतील नागरिकांना तसेच उद्योजक, व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, त्याच्या मूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. महसूल विभागातर्फे १० हजार १६० पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यापैकी ९२१४ पूरग्रस्तांना आतापर्यंत चार कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचे अनुदान वाटप झाले असून, उर्वरित पूरग्रस्तांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरूच आहे.कोल्हापूर शहराचे कधी नव्हे इतके मोठे नुकसान अतिवृष्टी व महापुरामुळे झाले आहे. अनेक कुटुंबांनी या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न सुरू केला असला, तरी शेकडो उद्योजक व व्यावसायिक या नुकसानीतून पुन्हा उभे राहणे अवघड आहे. शहर हद्दीत झालेल्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे काम पुणे महानगरपालिका उपायुक्त संतोष भोर यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांनी महापालिका, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जलदगतीने आतापर्यंत १० हजार १६० पंचनामे पूर्ण केले आहेत.

अद्याप काही नागरिक घरात पोहोचले नसल्याने पंचनामे पूर्ण व्हायचे आहेत. ९२१४ पूरग्रस्तांना चार कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचे अनुदान वाटप पूर्ण झाले असून, अद्याप ८०० पूरग्रस्तांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येकांना रोखीने पाच हजार देण्यात आले, तर १0 हजार बॅँक खात्यावर जमा केले जाणार आहेत.यापुढे महापुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन केले जाणार असून, त्याची जबाबदारी कोल्हापूर महानगरपालिकेचे उपशहर अभियंता रमेश मस्कर यांच्याकडे देण्यात आली असून, त्यांना आयकर विभाग, जीएसटीचे कर्मचारी देण्यात आले आहेत.महापुरामुळे १0 हजारांवर कुटुंबे बाधित झाली असून, सर्वांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. औद्योगिक वसाहतीतील १७ उद्योजकांची न भरून निघणारी हानी झाली आहे. प्रत्येक पूरग्रस्तांना कमीत कमी ५0 हजारांपासून ते ३0-४0 लाखांपर्यंत पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. अनेक कुटुंबांच्या घरातील टी. व्ही. फ्रीज, वॉशिंगमशिन, इलेक्ट्रीक उपकरणे, गाद्या, संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले.पूर ओसरल्यानंतर महसूल विभागातर्फे शहरातील ८५७९ पूरग्रस्त कुटुंबांना १0 किलो तांदूळ व १0 किलो गहू देण्यात आला, तर सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने ६७७७ पूरग्रस्तांना २३ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. ज्यांची पूर्ण घरे पडली, त्यांना प्रत्येकी ९५ हजार १०० रुपये, तर ज्यांची अंशत: घरे पडली, त्यांना प्रत्येकी ३० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

महापुरात झालेली हानी

  • अंशत: पडलेली घरे-२७५
  •  पूर्णत: पडलेली घरे-४०
  •  पूरबाधित व्यावसायिक दुकानांची संख्या-२२०८
  •  पूरबाधित कारागीरांची संख्या- ४१३
  • पूरबाधित उद्योजकांची संख्या- १७

 

महापुरामुळे शहरातील कुटुंबे, व्यावसायिक, उद्योजक यांचे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात असून, त्याचे मूल्यांकन सुरू झाले आहे. तातडीची मदत म्हणून पंचनामे करतेवेळी प्रत्येकी पाच हजार रुपये, तसेच धान्यवाटप केले.- संतोष भोर, उपायुक्तपुणे महानगरपालिका

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर