शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीविरोधी धोरणांचा डाव्या संघटनांकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST

या आंदोलनात शेकाप, भाकप, माकप, एआयएसएफ, आप, जनता दल, रेशन बचाव कृती समितीसह विविध २५ संघटना सहभागी झाल्या. त्यांनी ...

या आंदोलनात शेकाप, भाकप, माकप, एआयएसएफ, आप, जनता दल, रेशन बचाव कृती समितीसह विविध २५ संघटना सहभागी झाल्या. त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला. नवीन कृषी कायदे रद्द होईपर्यंत केंद्र सरकारशी लढा देण्याचा निर्धार आंदोलकांनी यावेळी केला. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील, चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, अतुल दिघे, गिरीश फोंडे, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, बाबूराव कदम, उदय नारकर, बाबासाहेब देवकर, संदीप देसाई, वसंत पाटील, रवी जाधव, कुमार जाधव, आदींनी मनोगतातून केंद्र सरकारचा निषेध केला.

आंदोलनात शिवाजीराव परुळेकर, बी. के. शिंदे, टी. एस. पाटील, हसन देसाई, डी. एम. सूर्यवंशी, केरबा पाटील, राजेश वरक, सुनीता अमृतसागर, स्नेहल कांबळे, आनंदा मोरे, आरती रेडेकर, प्रशांत आंबी, आदी सहभागी होते. दरम्यान, या आंदोलनावेळी काही कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा प्रतीकात्मक पुतळा आणला. आंदोलक हे त्या पुतळ्याचे दहन करताना पोलिसांनी त्यांना रोखले. त्यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली.

कोण, काय म्हणाले?

संपतराव पवार-पाटील : भांडवलदारांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी केंद्र सरकारने हे नवीन कृषी विधेयक धोरण मंजूर केले आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे.

चंद्रकांत यादव : शेतकरीविरोधी कायदे करून केंद्र सरकारने शेती आणि शेतकरी यांना धोक्यात आणले आहे.

नामदेव गावडे : दिल्लीतील आंदोलन हे केवळ पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांबरोबरच संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे आहे.

अतुल दिघे : केंद्र सरकारने केलेल्या या कायद्यामुळे शेतकरी, ग्राहकांचे नुकसान होणार आहे.

फोटो (०४१२२०२०-कोल-डाव्या संघटना आंदोलन ०१, ०२) : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसह शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात गुरुवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि विविध घटक, डाव्या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

फोटो (०४१२२०२०-कोल-डाव्या संघटना आंदोलन ०३, ०४,०५) : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसह शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात गुरुवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि विविध घटक, डाव्या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.