शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

केर्ले मार्गावरील कचऱ्यावरुन अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : शिवाजी पूल ते केर्ले या राज्य मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात लोकांनी कचरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबा बावडा : शिवाजी पूल ते केर्ले या राज्य मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात लोकांनी कचरा टाकल्याने या रस्त्याचा अक्षरश: कोंडाळा झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर दुर्गंधी पसरली असून, या रस्त्याच्या स्वच्छतेची नेमकी जबाबदारी कोणाची? असा प्रश्न करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मीनाक्षी पाटील होत्या. या सभेत शिक्षण, ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाला चांगलेच धारेवर धरण्यात आले.

शिवाजी पूल ते रत्नागिरी या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. या कामाला गती द्यावी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली. ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामाच्या गुंठेवारीचा प्रश्न प्रदीप झांबरे यांनी उपस्थित केला. नवीन बांधकाम करताना रस्ते सोडले नाहीत, गटार नाही. बिल्डर लॉबी मनाला येईल तसे काम करते, त्यांच्यावर अंकुश कोणाचा आहे, असा प्रश्नही झांबरे यांनी विचारला. तर सुनील पोवार यांनी बिल्डर, ग्रामपंचायत पैसे खाणार आणि नाहक त्रास पंचायतीला का, असा प्रश्न उपस्थित केला. पंचायत समिती सदस्यांना अधिकारी कोणत्याही गोष्टीची माहिती देत नाहीत. सदस्यांना अधिकार आहेत की नाहीत, हे एकदा आम्हाला सांगा, या शब्दात विजय भोसले यांनी संताप व्यक्त केला. तर राजेंद्र सूर्यवंशी यांनीही आम्हाला कोणी विचारत नाही, अंधारात ठेवतात, असा आरोप केला. कोविड लसीकरणाच्या बाबतीत पंचायत समिती पाठी आहे. म्हणावी तशी जनजागृती केली जात नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवावा, अशी मागणी रमेश चौगले, राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. या सभेत अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी रक्कम वाढवून दहा लाख रुपये मिळावेत, अशी मागणी अश्विनी धोत्रे यांनी केली. पशुधनाबाबत विमा कंपनी व्यवस्थित सेवा देत नाही, त्यामुळे चांगली सेवा देणाऱ्या विमा कंपनीकडे येथून पुढे विमा उतरावा, असा ठराव सागर पाटील यांनी मांडला. करवीर तालुक्यात बचत गटांचे काम चांगल्याप्रकारे सुरू असून, ते आणखी गतिमान केले जाईल, अशी माहिती उमेद अभियानाच्या तालुका व्यवस्थापक आरती पाटील यांनी सभागृहात दिली. यावेळी उपसभापती अविनाश पाटील, गटविकास अधिकारी जयवंत उगले, शोभा राजमाने, इंद्रजीत पाटील, अर्चना खाडे, मोहन पाटील, सविता पाटील, यशोदा पाटील उपस्थित होते.

चौकट:

पंच म्हणून इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बोलवा

शासकीय पंच म्हणून पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना वरचेवर बोलावले जाते. जिल्हा परिषद व अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही करवीर पोलीस व लाचलुचपत कार्यालयाने या कामासाठी बोलवावे, असा ठराव सभेत चंद्रकांत पाटील यांनी मांडला. यावेळी सुनील पवार यांनी काही शाळेत शिक्षक कामावर येत नसतानाही त्यांचा पगार नित्यनेमाने काढला जातो, असा आरोप करत ही एक साखळी आहे. यात दोषी असलेल्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. उपसभापती अविनाश पाटील यांनी याबाबत ग्रामपंचायतीने पंचायत समिती सदस्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची माहिती दिली पाहिजे, अशी मागणी केली.