शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

केर्ले मार्गावरील कचऱ्यावरुन अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : शिवाजी पूल ते केर्ले या राज्य मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात लोकांनी कचरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबा बावडा : शिवाजी पूल ते केर्ले या राज्य मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात लोकांनी कचरा टाकल्याने या रस्त्याचा अक्षरश: कोंडाळा झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर दुर्गंधी पसरली असून, या रस्त्याच्या स्वच्छतेची नेमकी जबाबदारी कोणाची? असा प्रश्न करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मीनाक्षी पाटील होत्या. या सभेत शिक्षण, ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाला चांगलेच धारेवर धरण्यात आले.

शिवाजी पूल ते रत्नागिरी या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे. या कामाला गती द्यावी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली. ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामाच्या गुंठेवारीचा प्रश्न प्रदीप झांबरे यांनी उपस्थित केला. नवीन बांधकाम करताना रस्ते सोडले नाहीत, गटार नाही. बिल्डर लॉबी मनाला येईल तसे काम करते, त्यांच्यावर अंकुश कोणाचा आहे, असा प्रश्नही झांबरे यांनी विचारला. तर सुनील पोवार यांनी बिल्डर, ग्रामपंचायत पैसे खाणार आणि नाहक त्रास पंचायतीला का, असा प्रश्न उपस्थित केला. पंचायत समिती सदस्यांना अधिकारी कोणत्याही गोष्टीची माहिती देत नाहीत. सदस्यांना अधिकार आहेत की नाहीत, हे एकदा आम्हाला सांगा, या शब्दात विजय भोसले यांनी संताप व्यक्त केला. तर राजेंद्र सूर्यवंशी यांनीही आम्हाला कोणी विचारत नाही, अंधारात ठेवतात, असा आरोप केला. कोविड लसीकरणाच्या बाबतीत पंचायत समिती पाठी आहे. म्हणावी तशी जनजागृती केली जात नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवावा, अशी मागणी रमेश चौगले, राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. या सभेत अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी रक्कम वाढवून दहा लाख रुपये मिळावेत, अशी मागणी अश्विनी धोत्रे यांनी केली. पशुधनाबाबत विमा कंपनी व्यवस्थित सेवा देत नाही, त्यामुळे चांगली सेवा देणाऱ्या विमा कंपनीकडे येथून पुढे विमा उतरावा, असा ठराव सागर पाटील यांनी मांडला. करवीर तालुक्यात बचत गटांचे काम चांगल्याप्रकारे सुरू असून, ते आणखी गतिमान केले जाईल, अशी माहिती उमेद अभियानाच्या तालुका व्यवस्थापक आरती पाटील यांनी सभागृहात दिली. यावेळी उपसभापती अविनाश पाटील, गटविकास अधिकारी जयवंत उगले, शोभा राजमाने, इंद्रजीत पाटील, अर्चना खाडे, मोहन पाटील, सविता पाटील, यशोदा पाटील उपस्थित होते.

चौकट:

पंच म्हणून इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बोलवा

शासकीय पंच म्हणून पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना वरचेवर बोलावले जाते. जिल्हा परिषद व अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही करवीर पोलीस व लाचलुचपत कार्यालयाने या कामासाठी बोलवावे, असा ठराव सभेत चंद्रकांत पाटील यांनी मांडला. यावेळी सुनील पवार यांनी काही शाळेत शिक्षक कामावर येत नसतानाही त्यांचा पगार नित्यनेमाने काढला जातो, असा आरोप करत ही एक साखळी आहे. यात दोषी असलेल्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. उपसभापती अविनाश पाटील यांनी याबाबत ग्रामपंचायतीने पंचायत समिती सदस्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची माहिती दिली पाहिजे, अशी मागणी केली.