शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

२७ ऐवजी १४ कोटींचा प्रस्ताव

By admin | Updated: August 13, 2016 00:38 IST

इचलकरंजीतील कृष्णा दाबनलिका : वारणा कार्यान्वित होईपर्यंत गरज

इचलकरंजी : शहरासाठी नवीन वारणा नळ पाणी योजना मंजूर झाली असली तरी ती कार्यान्वित होईपर्यंत चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत इचलकरंजीकरांची तहान भागविण्यासाठी कृष्णा नळ योजना आवश्यक आहे. त्यामुळे कृष्णा योजनेची दाबनलिका बदलण्याचा २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव पूर्णपणे रद्द करण्याऐवजी आवश्यक तितकाच १४ कोटी रुपयांचा प्रस्ताव करून तो राबविण्याच्या हालचाली नगरपालिकेत सुरू आहेत.शहरास पंचगंगा व कृष्णा या दोन्ही नद्यांतून पाणी उपसा करून हे पाणी नळाद्वारे पुरविले जाते. पंचगंगा नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे जानेवारी ते जून असे सहा महिने तेथून होणाऱ्या पाण्याचा पुरवठा बंद होतो. शहरवासीयांना फक्त कृष्णा नदीतील पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. सहा महिन्यांच्या कालावधीत कृष्णा योजनेतून चार दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो. कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्यास तिथून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने शहरवासीयांना आठवडाभर पाणी मिळत नाही. कृष्णा योजनेकडील १९ किलोमीटर दाबनलिका टाकून इचलकरंजीत पाणी आणले जाते. ही दाबनलिका जमिनीखालून टाकण्यात आल्यामुळे दाबनलिकेवर शेतातील रासायनिक खतांचा परिणाम होऊन ती कमकुवत झाली आहे. अकरा किलोमीटरची दाबनलिका बदलणे अत्यावश्यक आहे, तर कृष्णा नदीतील पाणी उपसा करणाऱ्या मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील जॅकवेलमधील पाण्याचे पंपसुद्धा जुने झाल्यामुळे त्याची क्षमता कमी झाली आहे.दरम्यान, शासनाने ७२ कोटी रुपयांची नवीन वारणा नळ योजना मंजूर केली. त्यामुळे आता कृष्णा नळ योजनेची दाबनलिका व पंप बदलण्याची आवश्यकता नाही म्हणून २७ कोटी रुपयांचा असलेला प्रस्ताव रद्द करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू झाल्या. मात्र, वारणा योजना तयार होण्यासाठी किमान चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत कृष्णा योजनेचे महत्त्व लक्षात घेता ही अत्यावश्यक आहे, असा सूर नगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांतून उमटू लागला. अशा पार्श्वभूमीवर नगरपालिकेमध्ये काही प्रमुख नगरसेवकांच्यात झालेल्या बैठकीत आवश्यक तेवढीच दाबनलिका बदलणे व जुना असलेला एकतरी पंप नवीन घेणे, असा चौदा कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे देऊन तो मंजूर करण्याचे ठरले.पाणीपुरवठा सभापतींची उच्च न्यायालयात याचिकाअकरा किलोमीटरची दाबनलिका बदलणे आणि पंप नवीन घेणे, यासाठी २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव शासन स्तरावर मंजूर झाला. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर हे काम नगरपालिकेऐवजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने करावे, म्हणून आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रयत्न केले.