शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

कोल्हापूर वनवृत्तात ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट : क्लेमेंट बेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:58 AM

  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर वनवृत्तामध्ये यंदा ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्या ...

ठळक मुद्देकोल्हापूर वनवृत्तात ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट : क्लेमेंट बेनकोल्हापूर जिल्ह्यातील ७५ टक्के झाडे जगल्याचा दावा

 

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर वनवृत्तामध्ये यंदा ४ कोटी १२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्या दृष्टीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत तयारी झाल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांनी दिली.शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती देण्यासाठी सोमवारी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ, विभागीय वनसंरक्षक सूर्यकांत काटकर आणि विभागीय वनअधिकारी दीपक खाडे उपस्थित होते.बेन म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला १ कोटी १३ लाख २२ हजार, साताऱ्यासाठी १ कोटी २४ लाख १ हजार, सांगलीसाठी ७२ लाख ३० हजार, सिंधुदुर्गसाठी ४१ लाख ६६ हजार आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ४८ लाख ९३ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभागासोबतच सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ग्रामपंचायत आणि इतर शासकीय विभागांसह स्वयंसेवी संस्था यांच्याकडून हे उद्दिष्ट पूर्ण करून घेण्यात येणार आहे.या सर्व जिल्ह्यांमध्ये खड्डे खुदाईची कामे पूर्ण झाली आहेत. याअंतर्गत या जिल्ह्यांमध्ये २३ ओढ्यांच्या दुतर्फा प्रायोगिक तत्त्वांवर ५० हजार बांबूची रोपे लावण्यात येणार आहेत. या कालावधीत ३० सप्टेंबरपर्यंत वनमहोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्याद्वारे रोपांची विक्री केली जाणार आहे.उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला १ कोटी १३ लाख २२ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून, त्यासाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाकडे १ कोटी २१ लाख ४७ हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात ४ लाख ४० हजार हरित सेना सदस्यांची नोंदणी करावयाची असून, त्यापैकी ३ लाख ७२ हजार नोंद झाली आहे.................................नवे पारगाव येथे वृक्षारोपण आरंभशासनाचा १ जुलैचा वृक्षारोपण आरंभ हा पारगाव (ता. हातकणगंले) येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी येथे आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे........................................झाडे वाळलेली दिसली म्हणजे मेली असे नव्हेगेल्या दोन वर्षांतील वृक्षलागवडीपैकी ७३ टक्के झाडे जगल्याचा दावा यावेळी करण्यात आला. क्लेमेंट बेन म्हणाले, सर्वच १०० टक्के झाडे जगली असा आमचा दावा नाही; परंतु झाडे वाळली म्हणजे ती लगेच मरत नाही. पावसाळ्यात पुन्हा ती जगतात.................................समीर

 

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर