शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

शेती नुकसानभरपाईचा जीआरच नाही, तर मोर्चे कशाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST

कोल्हापूर : महापूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसान ठरवण्यासाठी पंचनाम्याकरता जीआर काढला आहे, प्रत्यक्षात किती मदत द्यायची याचा अजून ...

कोल्हापूर : महापूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीचे नुकसान ठरवण्यासाठी पंचनाम्याकरता जीआर काढला आहे, प्रत्यक्षात किती मदत द्यायची याचा अजून जीआरच निघालेला नाही, मग मोर्चे आंदोलने तरी कशाला काढता, अशी विचारणा करत पालकमंत्री सतेज पाटील यांनी दोन दिवसांत जीआर निघेल, त्यातील त्रुटी बघा आणि मग आंदोलनाचा निर्णय घ्या, २०१९ पेक्षा चांगली मदत आम्ही देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी येथील काही भाग वगळता पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. पंचनामे कसे करावेत याबाबत मार्गदर्शन म्हणून राज्य शासनाने मागील पंधरवड्यात जीआर काढला आहे; पण तो मदतीचा नाही. मदतीसाठी राज्य सरकार स्वतंत्र जीआर काढणार आहे, त्याची मंत्रालयात तयारी पूर्ण झाली असून, दोन दिवसांत तो जाहीर केला जाणार आहे. यामध्ये २०१९ मध्ये शेतीच्या नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम यावेळी मदत म्हणून दिली जाणार आहे. दोन्ही वर्षांतील महापुरातील तुलना जीआर आल्यानंतरच शेतकऱ्यांनी करावी. तरीदेखील यात त्रुटी आढळल्यास त्या निदर्शनास आणून द्याव्यात, मोर्चे काढणे हा त्यावरचा उपाय नाही, ही पूर्णपणे राजकीय स्टंटबाजी आहे.

जिल्ह्यातील पूरग्रस्तांना नुकसाभरपाईपोटी पहिल्या टप्प्यात १७ कोटींचा निधी शासनाने दिला आहे. त्याचे वाटपही सुरू झाले आहे. आता दोन दिवसांत आणखी १७ कोटी रुपये मिळणार आहेत. पूरग्रस्तांना सर्वांत चांगला दिलासा महाविकास आघाडीचे सरकारच देत आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.