शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

रंकाळ्यात ‘ग्रीन अल्गी’चा प्रादुर्भाव, जलचर धोक्यात : वातावरणाचा परिणाम शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:42 IST

कोल्हापूर : प्रशासकीय पातळीवर कोट्यवधी रुपयांचे आराखडे तयार करून सुशोभीकरणाच्या केवळ जोर-बैठकाच सुरू असतानाच ऐतिहासिक रंकाळा तलावास पुन्हा एकदा ...

ठळक मुद्देतलावाच्या पश्चिम बाजूस काही मासे मृतजलचर प्राण्यांचा जीव गुदमरत आहे.

कोल्हापूर : प्रशासकीय पातळीवर कोट्यवधी रुपयांचे आराखडे तयार करून सुशोभीकरणाच्या केवळ जोर-बैठकाच सुरू असतानाच ऐतिहासिक रंकाळा तलावास पुन्हा एकदा ‘ग्रीन अल्गी’चे ग्रहण लागले असून, त्यामुळे तलावातील जलचर प्राण्यांचा जीव गुदमरायला लागला आहे. तलावाच्या पश्चिम बाजूस काही मासे मेले असल्याचे बुधवारी निदर्शनास आल्याने तातडीने काही उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.कोल्हापूरचे वैभव असलेला रंकाळा तलाव नैसर्गिक संकटामुळे तसेच पाण्याच्या प्रदूषणामुळेसतत चर्चेत राहिलेला आहे.

एक-दोन वर्षांच्या अंतराने तलावाचे वैभव धोक्यात येते, त्यावर चर्चा होते. जुजबी उपाययोजना केल्या जातात; पण दुखणं मात्र काही थांबतनाही. काही वर्षांपूर्वी ग्रीन अल्गीने रंकाळा तलावातील पाण्याला ग्रासले होते. त्यातून नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले. महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न संपला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ग्रीन अल्गीने पुन्हा डोके वर काढले आहे.वातावरणातील बदल, तलावात मिसळणारे सांडपाणी, नायट्रोजनव फॉस्फरसचे वाढलेले प्रमाण, प्राणवायूची कमतरता या साऱ्या कारणांनी तलावात ग्रीनअल्गीचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत आहे. त्यामुळे पाण्यावर एक प्रकारची हिरवी चादर लपेटली आहे.विशेष म्हणजे दिवसभर हवानसल्याने तलावातील पाणी संथ राहत आहे.त्यामुळे एरिएशन होत नाही, हेही एक कारण असल्याचे सांगितले जाते. काही महिन्यांपासून शाम हौसिंग सोसायटीक डून मैलामिश्रित सांडपाणी तलावात मिसळत आहे. सांडपाणी रोखण्यात ड्रेनेज विभागास अपयश आले आहे. ड्रेनेज दुरुस्तीचे कारण देऊन सांडपाणी तलावात सोडले जात आहे.

तलावात मिसळणारे चार नाले महापालिका प्रशासनाने उपाययोजना करून रोखण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु शाम हौसिंग सोसायटीकडून येणारा नाला रोखण्यात मात्र अद्याप यश आलेले नाही. सांडपाण्याचा प्रवाहन आणि उपसा करण्याची क्षमता यांचा कुठेही ताळतंत्र बसत नसल्यामुळे थेट तलावात मिसळणारे पाहण्यापलीकडे कर्मचारीही काही करीत नाहीत. सांडपाण्यात नायट्रोजन आणि फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते आणि हे सांडपाणी तलावात मिसळते. गाळात या घटकांचा समावेश होतो. त्यामुळेच तलावातील पाणी प्रदूषित बनले आहे.तो प्रस्ताव अजून ‘एनजीटी’कडेच?रंकाळा तलावाच्या प्रदूषणाबाबत राष्टÑीय हरित लवादासमोर याचिका दाखल झाली असून, प्रत्येक महिन्याला त्यावर सुनावणी होते. तलाव प्रदूषणमुक्त करण्याकरिता कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत, अशी विचारणा लवादाने महापालिकेकडे केली तेव्हा १२५ कोटींचा एक प्रस्ताव सादर केला.परंतु, प्रदूषण रोखण्याकरिता एवढा निधी लागतो का, अशी शंका उपस्थित झाली. त्यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामध्ये गाळाचा उपसा करण्याच्या कामाचा समावेश आहे.सध्याची स्थिती कशी आहे? तलावाच्या पाण्यात ग्रीन अल्गीचा थर साचलेला आहे.त्यामुळे पाण्यात हिरवी चादर पसरल्याचे दिसते.जलचर प्राण्यांचा जीव गुदमरत आहे.

इराणी खणीकडील बाजूलाकाही मासे मेल्याचे दिसून आले.तलावात किमान ४५ टक्केगाळाचे प्रमाण आहे.गाळात नायट्रोजन व फॉस्फरसचे प्रमाण अधिक आहे.तातडीचे उपाय काय आहेत?तलावात एरिएशन होणेआवश्यक.त्याकरिता बोटी फिरविणे,पाणी ढवळून काढणे.पाणी शुद्धिकरणात वापरल्या जाणाºया पीएसी पावडरचा डोस वाढविणे.तलावाच्या पाण्यावरील ग्रीनअल्गी सक्शन टॅँकरने ओढूनघेणे. तलावाच्या पश्चिम भागातील चरीतून पाणी सोडणे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषणDeathमृत्यू