शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

नऊ प्रश्न रद्द करण्याची परीक्षा परिषदेवर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 12:48 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी १६ फेबु्रवारी रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे परीक्षा परिषदेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पहिल्या पेपरमधील ७५ पैकी नऊ प्रश्न रद्द करण्याची नामुष्की परिषदेवर आली असून, तब्बल १२ बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरेच बहुपर्यायी आहेत.

ठळक मुद्देशिष्यवृत्ती परीक्षेतील सावळागोंधळ तब्बल १२ बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरेच बहुपर्यायी

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी १६ फेबु्रवारी रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे परीक्षा परिषदेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पहिल्या पेपरमधील ७५ पैकी नऊ प्रश्न रद्द करण्याची नामुष्की परिषदेवर आली असून, तब्बल १२ बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरेच बहुपर्यायी आहेत.आपल्याकडे शिष्यवृत्ती परीक्षेला खूपच महत्त्व दिले जाते. मुले पहिलीला गेल्यापासूनच पालक शिष्यवृत्तीच्या परीक्षेची तयारी सुरू करतात. चौथीची वार्षिक परीक्षा झाल्यानंतर लगेच शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास सुरू केला जातो. मुलांना उन्हाळ्याची सुट्टी नसतेच. शाळा सुरू झाल्यानंतर तर मुले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अभ्यासातच गुंतलेली असतात. मात्र या परीक्षेकडे संबंधित यंत्रणा किती गांभीर्याने पाहते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.कोणतीही परीक्षा असूदे; तिचे नियोजन काटेकोरपणे असायलाच पाहिजे. पेपर तयार करण्यापासून त्या परीक्षेचा निकाल लागेपर्यंत त्या नियोजनानुसार अचूक काम होणे अपेक्षित असते. त्यातून किरकोळ चुका होतात. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात चुका होताना दिसत आहेत. गेल्या वर्षीच्या परीक्षेत चार प्रश्नच चुकीचे होते. त्यावेळी ते रद्द करून ३०० ऐवजी २९२ गुणांचे प्रश्न गृहीत धरून निकाल दिला.

गेल्या वर्षी झालेल्या चुका लक्षात घेता या वर्षी तरी त्यात सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र उलट दुप्पट चुका झाल्या. तब्बल नऊ प्रश्नच चुकीचे होते आणि १२ प्रश्न असे होते की, ज्यांचे एकापेक्षा अधिक पर्याय योग्य होते. यामुळे विद्यार्थी पुरते गोंधळून गेले होते. मुले न सुटणाऱ्या प्रश्नांभोवतीच गुरफटत राहिल्याने अनेकांना पूर्ण पेपर सोडविता आला नाही.परीक्षा परिषदेने काढलेल्या उत्तरसूचीत नऊ प्रश्न रद्द केल्याचे म्हटले आहे; तर १२ बहुपर्यायी प्रश्नांची बहुपर्यायी उत्तरे दिली आहेत. यावरून परिषदेचा सावळागोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

मुले वर्षभर खेळ, पाहुण्यांच्या गावाला जाणे टाळून शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करतात आणि परीक्षेत चुकीचे प्रश्न आले तर त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. या परीक्षेकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे.- सुनील पाटील, जरगनगर 

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीkolhapurकोल्हापूर