शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

नऊ प्रश्न रद्द करण्याची परीक्षा परिषदेवर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 12:48 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी १६ फेबु्रवारी रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे परीक्षा परिषदेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पहिल्या पेपरमधील ७५ पैकी नऊ प्रश्न रद्द करण्याची नामुष्की परिषदेवर आली असून, तब्बल १२ बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरेच बहुपर्यायी आहेत.

ठळक मुद्देशिष्यवृत्ती परीक्षेतील सावळागोंधळ तब्बल १२ बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरेच बहुपर्यायी

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी १६ फेबु्रवारी रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे परीक्षा परिषदेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पहिल्या पेपरमधील ७५ पैकी नऊ प्रश्न रद्द करण्याची नामुष्की परिषदेवर आली असून, तब्बल १२ बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरेच बहुपर्यायी आहेत.आपल्याकडे शिष्यवृत्ती परीक्षेला खूपच महत्त्व दिले जाते. मुले पहिलीला गेल्यापासूनच पालक शिष्यवृत्तीच्या परीक्षेची तयारी सुरू करतात. चौथीची वार्षिक परीक्षा झाल्यानंतर लगेच शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास सुरू केला जातो. मुलांना उन्हाळ्याची सुट्टी नसतेच. शाळा सुरू झाल्यानंतर तर मुले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अभ्यासातच गुंतलेली असतात. मात्र या परीक्षेकडे संबंधित यंत्रणा किती गांभीर्याने पाहते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.कोणतीही परीक्षा असूदे; तिचे नियोजन काटेकोरपणे असायलाच पाहिजे. पेपर तयार करण्यापासून त्या परीक्षेचा निकाल लागेपर्यंत त्या नियोजनानुसार अचूक काम होणे अपेक्षित असते. त्यातून किरकोळ चुका होतात. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात चुका होताना दिसत आहेत. गेल्या वर्षीच्या परीक्षेत चार प्रश्नच चुकीचे होते. त्यावेळी ते रद्द करून ३०० ऐवजी २९२ गुणांचे प्रश्न गृहीत धरून निकाल दिला.

गेल्या वर्षी झालेल्या चुका लक्षात घेता या वर्षी तरी त्यात सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र उलट दुप्पट चुका झाल्या. तब्बल नऊ प्रश्नच चुकीचे होते आणि १२ प्रश्न असे होते की, ज्यांचे एकापेक्षा अधिक पर्याय योग्य होते. यामुळे विद्यार्थी पुरते गोंधळून गेले होते. मुले न सुटणाऱ्या प्रश्नांभोवतीच गुरफटत राहिल्याने अनेकांना पूर्ण पेपर सोडविता आला नाही.परीक्षा परिषदेने काढलेल्या उत्तरसूचीत नऊ प्रश्न रद्द केल्याचे म्हटले आहे; तर १२ बहुपर्यायी प्रश्नांची बहुपर्यायी उत्तरे दिली आहेत. यावरून परिषदेचा सावळागोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

मुले वर्षभर खेळ, पाहुण्यांच्या गावाला जाणे टाळून शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करतात आणि परीक्षेत चुकीचे प्रश्न आले तर त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. या परीक्षेकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे.- सुनील पाटील, जरगनगर 

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीkolhapurकोल्हापूर