शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

पुढील वाढदिवस अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावरच, कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या आमदाराचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 12:07 IST

'वाढदिवसाच्या कार्यक्रमामुळे विरोधक जागरूक होतात'

गडहिंग्लज : महाराष्ट्राच्या विधानसभेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाहिले आहे. त्यासाठीच त्यांनी भाकरी परतवली आहे. परंतु, इकडे भाकरी परतणार नाही याची काळजी घेवूया. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत व चंदगडमध्ये लालदिव्याची गाडी यावी यासाठी मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, असे आवाहन करतानाच अजितदादा मुख्यमंत्री होईपर्यंत आपला पुढील वाढदिवस साजरा न करण्याचा निर्धार आमदार राजेश पाटील यांनी बुधवारी (१४) केला.महागाव येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर, रामाप्पा करिगार यांची प्रमुख उपस्थिती होती.पाटील म्हणाले, वडील स्व. नरसिंगराव, कुपेकर व मंडलिकांच्या शिकवणीतून घडलो. निष्ठावंत कार्यकर्ते व पुरोगामी मतदारांमुळेच आमदार झालो. अजितदादा, जयंत पाटील यांचे पाठबळ आणि हसन मुश्रीफ यांची साथ यामुळेच कोट्यवधींची कामे झाली. यापुढेही चांगले तेच करेन. कुणाचे वाईट करण्याचे पाप करणार नाही.रेडेकर म्हणाल्या, आमदार पाटील हे स्व. मंडलिक व नरसिंगराव यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. मुकुंद देसाई म्हणाले, आमदार पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळेच कुपेकरांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांची फळी अधिक मजबूत झाली.यावेळी शिवानंद हुंबरवाडी, अल्बर्ट डिसोझा, अमर चव्हाण, संतोष पाटील, शिवप्रसाद तेली, रघुनाथ पाटील, प्रकाश पाटील, राजेश औरनाळकर, बाळू चौगुले, संगीता पाटील यांचीही मनोगते झाली.कार्यक्रमास भिकू गावडे, बाबासाहेब पाटील, जयकुमार मुन्नोळी, गंगाधर व्हसकोटी, मुन्नासोा नाईकवाडे, लक्ष्मण तोडकर, बाळकृष्ण परीट आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. जयसिंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. अभय देसाई यांनी आभार मानले.

आमदार पाटील म्हणाले...!- वाढदिवसाच्या कार्यक्रमामुळे विरोधक जागरूक होतात. वडील नरसिंगराव पाटील यांची एकसष्टी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात साजरी केली. परंतु, दगाफटक्यामुळेच पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. दिवंगत आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आणि आपला वाढदिवस एकाच दिवशी येतो. म्हणूनच वाढदिवस साजरा करू नये, अशीच आपली भावना आहे. परंतु, गडहिंग्लजकरांच्या प्रेमामुळेच सलग दुसऱ्यावर्षी वाढदिवसाला यावे लागले.- नव्या सरकारच्या स्थगितीमुळे राज्यातील अनेक विकासकामे खोळंबली आहेत. चंदगडच्या ट्रामा केअर सेंटरचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. कर्नाटकात झाले तेच महाराष्ट्रात होईल. महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर येईल. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करावे, जातीयवादी शक्तींना जागा दाखवावी. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री