शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचा मुंबईत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 12:19 PM

राज्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचा मुंबईतील टिळक भवनमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात कोल्हापूरमधील आमदार चंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे आणि ऋतुराज पाटील यांचा सत्कार झाला.

ठळक मुद्देचंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे, ऋतुराज पाटील यांचा समावेश कोल्हापूर भाजपमुक्त केल्याबद्दल अभिनंदन

कोल्हापूर : राज्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचा मुंबईतील टिळक भवनमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात कोल्हापूरमधीलआमदार चंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे आणि ऋतुराज पाटील यांचा समावेश होता.

कोल्हापूर भाजपमुक्त केल्याबद्दल जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित आमदार आणि आमदार सतेज पाटील यांचे खर्गे यांनी अभिनंदन केले. काँग्रेसला साथ दिल्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेला त्यांनी धन्यवाद दिले.या कार्यक्रमात कोल्हापूरकर आणि नवनिर्वाचित आमदारांच्या वतीने मल्लिकार्जुन खर्गे यांना पुष्पगुच्छ देऊन आमदार सतेज पाटील आणि चंद्रकांत जाधव यांनी सत्कार केला. राज्यातील नवनिर्वाचित युवा आमदारांनी संयुक्तपणे खर्गे यांचा सत्कार केला.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रमुख उपस्थित होते. नवनिर्वाचित आमदारांनी जनतेचे प्रश्न, समस्या सोडविण्यासह विकासकामांवर भर द्यावा. युवा आमदारांनी राजकारणातील बारकावे समजून घेऊन कार्यरत राहावे, असे आवाहन मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी केले असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भोगावती साखर कारखान्याची सभा असल्याने आमदार पी. एन. पाटील हे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.

राज्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम मुंबईत प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडून करण्यात आला. त्यात आमदार सतेज पाटील आणि चंद्रकांत जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांचा सत्कार केला. यावेळी डावीकडून आमदार राजूबाबा आवळे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार ऋतुराज पाटील, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूरMLAआमदार