शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

पाण्यासाठी वस्त्रनगरीत एकीची गरज, वारणा पाणी योजना : आंदोलनात राजकीय पक्षांनी उतरण्याची गरज;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:50 IST

इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी,

ठळक मुद्देसामाजिक संघटनांचा पुढाकारही आवश्यक

इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी, यासाठी इचलकरंजीत सुरू असलेले जनआंदोलन एकाच पक्षाचे होऊन राहिले आहे. मात्र, ते खऱ्या अर्थाने जनआंदोलन होण्यासाठी त्यामध्ये सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी उतरण्याची गरज निर्माण झाली आहे.

पंचगंगा नदीत पाणी असले तरी जानेवारी ते जून या कालावधीत ते दूषित होते. कृष्णा नदीतून पाण्याचा उपसा करणाºया नळ योजनेची दाबनलिका सडल्याने तिला वारंवार गळती लागते. अशा परिस्थितीत पिण्याच्या स्वच्छ व पुरेशा पाण्यासाठी पुरवठा करणारी वारणा योजना हा एकमेव पर्याय राहतो. वारणा मंजूर करताना धरणामध्ये एक टीएमसी पाण्याचे आरक्षणही आहे.

तसेच या योजनेसाठी दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीत बंधारासुद्धा बांधण्याची तरतूद आहे.अशा पार्श्वभूमीवर दानोळी अथवा वारणा काठच्या गावांना शेती सिंचन किंवा तत्सम वापराच्या पाण्यासाठी पाणी अपुरे पडणार नाही, याची खात्री शासनाकडून वारंवार देण्यात आली. विशेष म्हणजे इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणानेच वारणा नदीवरील पाणीपुरवठा योजना सुचविली आहे. जीवन प्राधिकरणामार्फतच या योजनेचा सविस्तर अहवालही तयार करण्यात आला आहे. अशा परिस्थितीतसुद्धा वारणा नदीकाठावरील ग्रामस्थांची वारणा नळ योजनेला विरोधाची असलेली भूमिका अनाकलनीय आहे. अशा स्थितीत इचलकरंजीतून वारणा पाणी जनआंदोलन समितीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी कोपरा सभा घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर ही योजना मार्गी लागावी, यासाठी दोनवेळा मोटारसायकल रॅली काढण्यातआली.

आंदोलन समितीच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देताना नगराध्यक्षांसह भाजपचे नगरसेवक व काही पदाधिकारी उपस्थित होते. वास्तविक पिण्याचे पाणी ही समस्या सोडविण्यासाठी राजकारणविरहित आंदोलन होण्याची गरज आहे. जेणेकरून शासनालाही जाग आली पाहिजे. त्यासाठी मात्र शहरातील सामाजिक संघटना व राजकीय पक्षांची एकजुटीची आवश्यकता आहेकोल्हापूरकरांसारखे एकजुटीचे आंदोलन हवेकाळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनची योजना असो किंवा शहरांतर्गत रस्त्यावरील टोलला टोला लावण्याचे आंदोलन असो, कोल्हापूरकरांमध्ये त्यासाठी राजकारणविरहित एकजुटीने आंदोलन होते. अशाच आंदोलनाची गरज इचलकरंजीमध्ये होणे आवश्यक आहे. त्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये नगरपालिकेत झालेल्या एका कार्यक्रमावेळी आमदार सुरेश हाळवणकर यांनी लोकांना हाक दिली होती. त्यावेळी पाण्याची तीव्रता नसल्याने आमदारांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता उन्हाळ्यात तरी आमदारांच्या या आवाहनाला शहरातील सर्व राजकीय पक्ष व संघटना प्रतिसाद देतात का, असाच सवाल शहरवासीयांकडून विचारला जात आहे..

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPower Shutdownभारनियमन