शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

पाण्यासाठी वस्त्रनगरीत एकीची गरज, वारणा पाणी योजना : आंदोलनात राजकीय पक्षांनी उतरण्याची गरज;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:50 IST

इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी,

ठळक मुद्देसामाजिक संघटनांचा पुढाकारही आवश्यक

इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी, यासाठी इचलकरंजीत सुरू असलेले जनआंदोलन एकाच पक्षाचे होऊन राहिले आहे. मात्र, ते खऱ्या अर्थाने जनआंदोलन होण्यासाठी त्यामध्ये सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी उतरण्याची गरज निर्माण झाली आहे.

पंचगंगा नदीत पाणी असले तरी जानेवारी ते जून या कालावधीत ते दूषित होते. कृष्णा नदीतून पाण्याचा उपसा करणाºया नळ योजनेची दाबनलिका सडल्याने तिला वारंवार गळती लागते. अशा परिस्थितीत पिण्याच्या स्वच्छ व पुरेशा पाण्यासाठी पुरवठा करणारी वारणा योजना हा एकमेव पर्याय राहतो. वारणा मंजूर करताना धरणामध्ये एक टीएमसी पाण्याचे आरक्षणही आहे.

तसेच या योजनेसाठी दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीत बंधारासुद्धा बांधण्याची तरतूद आहे.अशा पार्श्वभूमीवर दानोळी अथवा वारणा काठच्या गावांना शेती सिंचन किंवा तत्सम वापराच्या पाण्यासाठी पाणी अपुरे पडणार नाही, याची खात्री शासनाकडून वारंवार देण्यात आली. विशेष म्हणजे इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणानेच वारणा नदीवरील पाणीपुरवठा योजना सुचविली आहे. जीवन प्राधिकरणामार्फतच या योजनेचा सविस्तर अहवालही तयार करण्यात आला आहे. अशा परिस्थितीतसुद्धा वारणा नदीकाठावरील ग्रामस्थांची वारणा नळ योजनेला विरोधाची असलेली भूमिका अनाकलनीय आहे. अशा स्थितीत इचलकरंजीतून वारणा पाणी जनआंदोलन समितीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी कोपरा सभा घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर ही योजना मार्गी लागावी, यासाठी दोनवेळा मोटारसायकल रॅली काढण्यातआली.

आंदोलन समितीच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देताना नगराध्यक्षांसह भाजपचे नगरसेवक व काही पदाधिकारी उपस्थित होते. वास्तविक पिण्याचे पाणी ही समस्या सोडविण्यासाठी राजकारणविरहित आंदोलन होण्याची गरज आहे. जेणेकरून शासनालाही जाग आली पाहिजे. त्यासाठी मात्र शहरातील सामाजिक संघटना व राजकीय पक्षांची एकजुटीची आवश्यकता आहेकोल्हापूरकरांसारखे एकजुटीचे आंदोलन हवेकाळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनची योजना असो किंवा शहरांतर्गत रस्त्यावरील टोलला टोला लावण्याचे आंदोलन असो, कोल्हापूरकरांमध्ये त्यासाठी राजकारणविरहित एकजुटीने आंदोलन होते. अशाच आंदोलनाची गरज इचलकरंजीमध्ये होणे आवश्यक आहे. त्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये नगरपालिकेत झालेल्या एका कार्यक्रमावेळी आमदार सुरेश हाळवणकर यांनी लोकांना हाक दिली होती. त्यावेळी पाण्याची तीव्रता नसल्याने आमदारांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता उन्हाळ्यात तरी आमदारांच्या या आवाहनाला शहरातील सर्व राजकीय पक्ष व संघटना प्रतिसाद देतात का, असाच सवाल शहरवासीयांकडून विचारला जात आहे..

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPower Shutdownभारनियमन