शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

पाण्यासाठी वस्त्रनगरीत एकीची गरज, वारणा पाणी योजना : आंदोलनात राजकीय पक्षांनी उतरण्याची गरज;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:50 IST

इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी,

ठळक मुद्देसामाजिक संघटनांचा पुढाकारही आवश्यक

इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी, यासाठी इचलकरंजीत सुरू असलेले जनआंदोलन एकाच पक्षाचे होऊन राहिले आहे. मात्र, ते खऱ्या अर्थाने जनआंदोलन होण्यासाठी त्यामध्ये सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी उतरण्याची गरज निर्माण झाली आहे.

पंचगंगा नदीत पाणी असले तरी जानेवारी ते जून या कालावधीत ते दूषित होते. कृष्णा नदीतून पाण्याचा उपसा करणाºया नळ योजनेची दाबनलिका सडल्याने तिला वारंवार गळती लागते. अशा परिस्थितीत पिण्याच्या स्वच्छ व पुरेशा पाण्यासाठी पुरवठा करणारी वारणा योजना हा एकमेव पर्याय राहतो. वारणा मंजूर करताना धरणामध्ये एक टीएमसी पाण्याचे आरक्षणही आहे.

तसेच या योजनेसाठी दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीत बंधारासुद्धा बांधण्याची तरतूद आहे.अशा पार्श्वभूमीवर दानोळी अथवा वारणा काठच्या गावांना शेती सिंचन किंवा तत्सम वापराच्या पाण्यासाठी पाणी अपुरे पडणार नाही, याची खात्री शासनाकडून वारंवार देण्यात आली. विशेष म्हणजे इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणानेच वारणा नदीवरील पाणीपुरवठा योजना सुचविली आहे. जीवन प्राधिकरणामार्फतच या योजनेचा सविस्तर अहवालही तयार करण्यात आला आहे. अशा परिस्थितीतसुद्धा वारणा नदीकाठावरील ग्रामस्थांची वारणा नळ योजनेला विरोधाची असलेली भूमिका अनाकलनीय आहे. अशा स्थितीत इचलकरंजीतून वारणा पाणी जनआंदोलन समितीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी कोपरा सभा घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर ही योजना मार्गी लागावी, यासाठी दोनवेळा मोटारसायकल रॅली काढण्यातआली.

आंदोलन समितीच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देताना नगराध्यक्षांसह भाजपचे नगरसेवक व काही पदाधिकारी उपस्थित होते. वास्तविक पिण्याचे पाणी ही समस्या सोडविण्यासाठी राजकारणविरहित आंदोलन होण्याची गरज आहे. जेणेकरून शासनालाही जाग आली पाहिजे. त्यासाठी मात्र शहरातील सामाजिक संघटना व राजकीय पक्षांची एकजुटीची आवश्यकता आहेकोल्हापूरकरांसारखे एकजुटीचे आंदोलन हवेकाळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनची योजना असो किंवा शहरांतर्गत रस्त्यावरील टोलला टोला लावण्याचे आंदोलन असो, कोल्हापूरकरांमध्ये त्यासाठी राजकारणविरहित एकजुटीने आंदोलन होते. अशाच आंदोलनाची गरज इचलकरंजीमध्ये होणे आवश्यक आहे. त्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये नगरपालिकेत झालेल्या एका कार्यक्रमावेळी आमदार सुरेश हाळवणकर यांनी लोकांना हाक दिली होती. त्यावेळी पाण्याची तीव्रता नसल्याने आमदारांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता उन्हाळ्यात तरी आमदारांच्या या आवाहनाला शहरातील सर्व राजकीय पक्ष व संघटना प्रतिसाद देतात का, असाच सवाल शहरवासीयांकडून विचारला जात आहे..

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPower Shutdownभारनियमन