शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद रस्ता, रोज ७० हजार वाहनांची धाव --असुविधांचा ‘महा’मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 01:06 IST

संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारत जोडणारा हा मुंबई ते बंगलोर राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावर किणी टोल नाका ते कोगनोळी टोल नाका हा सुमारे ४८ कि.मी. लांबीचा महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. सध्या जिल्ह्यातील हा महामार्ग चौपदरी आहे.

ठळक मुद्देकिणी ते कागल : जमिनीचे अधिग्रहण होऊनही सहापदरीकरण रखडलेदेखभालीत हयगय; अपघातांच्या संख्येत वाढ

तानाजी पोवार।कोल्हापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागलपासून किणीपर्यंत सुमारे ४८ किलोमीटर लांबीचा मार्ग सध्या समस्यांचे आगार बनला आहे. या महामार्गावर धावणाऱ्या वाहनांना सध्या रस्त्यांची रुंदी अपुरी पडू लागल्याने हा महामार्ग म्हणजे धोक्याची घंटाच बनला आहे. सुविधांची वानवा, रस्त्यांच्या निकृष्ट दर्जामुळे अपघाताच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.महामार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. रोज किमान ७० हजार वाहनांची ये-जा असूनही सहापदरीकरणाला ‘खो’ बसला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) व नॅशनल हायवे आॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) या दोघांच्या वादात हे सहापदरीकरण कोणी करायचे हाच प्रश्न उभा आहे. तोपर्यंत अपघाताची मालिका वाहनधारकांच्या जिवावर बेतत आहे.

संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारत जोडणारा हा मुंबई ते बंगलोर राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावर किणी टोल नाका ते कोगनोळी टोल नाका हा सुमारे ४८ कि.मी. लांबीचा महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. सध्या जिल्ह्यातील हा महामार्ग चौपदरी आहे. महामार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी अपुरी पडून हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. महामार्गावर ६० हजारांपेक्षा अधिक वाहनांची धाव असेल तर तो सहापदरीकरण असणे बंधनकारक आहे. पण, सध्या ६० हजार वाहनांचा आकडा कधीच पूर्ण झाला आहे.

सहापदरीकरण रस्ता करण्यासाठी सुमारे ६० मीटर जमीन राष्ट्रीय महामार्ग विभागाने यापूर्वीच अधिग्रहण केली आहे; पण सहापदरीकरणाच्या कामाला ग्रहण लागले आहे. टोल वसुली ‘एमएसआरडीसी’कडे अन् सहापदरीकरणाचे काम एनएचएआय यांच्याकडे असा खोळंबा बनला आहे.

महामार्गावर स्वच्छतागृह, बिघडलेल्या वाहनांना दुरुस्तीसाठी साईट पार्किंगची कमतरता, रस्ता दुभाजकांमध्ये गुडघाभर वाढलेले खुरटे गवत, तसेच झाडे गर्द असली तरी त्याची योग्य पद्धतीने कटिंग न करता निगा राखलेली दिसत नाही. रस्त्यावर तुंबलेले अगर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्ता दुभाजकांमध्ये बसविलेली गटर्सची चॅनल पूर्णपणे कोसळली असून, रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी केलेले नळही मातींनी भरले आहेत. टोल आकारणीतून या सुविधांचे पैसे घेत असले, तरी प्रत्यक्ष सुविधांची वानवाच आहे.

६०,000पेक्षा अधिक वाहनांची दररोज वर्दळ असल्यास सहापदरीकरण बंधनकारककिणी ते कागलपर्यंत४८कि. मी. रस्तारोज किमान ७०हजार वाहनांचीये-जाटोल आकारणीची२०२२पर्यंतची जबाबदारी एमएसआरडीसीकडेसहापदरीकरणासाठी ६०मीटरजमीन पूर्वीच अधिग्रहण२०२२ पर्यंत टोलवसुलीची मुदत (राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत)

टॅग्स :highwayमहामार्गkolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग