शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

‘फुले जनआरोग्य’ योजना नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:27 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णालयांना काहीसे वावडे ...

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णालयांना काहीसे वावडे आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ रुग्णालयात एकूण बाधित रुग्णांपैकी केवळ २९३८ रुग्णांवरच (३ टक्के) या योजनेंतर्गत उपचार झाले आहेत. काही रुग्णालये जाणीवपूर्वक उपचार करण्यास टाळाटाळ करत असल्याने कर्जे काढून बिले भरण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू आहे. या योजनेतून इतर आजारावर उपचार करण्यासाठी रुग्णालयामध्ये स्पर्धा असायची. त्याला कारणेही वेगवेगळी आहेत. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून या योजनेंतर्गत उपचार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; मात्र कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची टाळाटाळ आहे. या योजनेपोटी शासनाकडून पॅकेज कमी मिळते. त्याचबरोबर मनमानी बिले लावता येत नसल्यामुळेच अंमलबजावणी करण्यास रुग्णालय प्रशासन नाखुश असल्याचे समजते.

एकूण कोरोनाबाधित - ९० हजार ९७१

कोरोनामुक्त - ७३ हजार ९७०

मृत्यू - ३१३९ (पैकी ३९५ जिल्हा बाहेरील)

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - १३ हजार ८६२

योजनेचा लाभ घेतलेले रुग्ण - २९३८

कागदपत्राआधी उपचार

महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयात आरोग्य मित्रांमार्फत नोंदणी करता येते. रुग्णांकडे कागदपत्रे जवळ नसली तरी प्रथम उपचार सुरु करून नंतर कागदपत्रे देण्याची मुभाही शासनाने दिली आहे.

तक्रार करायची की उपचार

खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजनेंतर्गत उपचार नाकारल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा समन्वयाकडे तक्रार करायची असते; मात्र कोरोना बाधिताचा रिपोर्ट हातात पडल्यानंतर रुग्णालयात बेड मिळण्यासाठी नातेवाईकांची धडपड सुरू असते. शर्तीचे प्रयत्न करून बेड उपलब्ध झाल्यानंतर वेळेत उपचार व्हावेत, याकडे लक्ष असते. त्यानंतर महात्मा फुले योजनेबाबत विचारले असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे तक्रार करत बसण्यापेक्षा उपचार करून रुग्णाचा जीव वाचवण्याकडे नातेवाईकांचा कल असतो.

सामान्यांनी कोरोना झाल्यावर मरायचेच का

बेड नसल्याने सरकारी रुग्णालये दाखल करून घेत नाहीत. खासगी रुग्णालयात बेड मिळाला तर बिलाचा आकडा बघूनच डोळे पांढरे होतात. मग कोरोना झाल्यावर सामान्य माणसाने मरायचेच का? असा उद्विग्न सवाल विचारला जात आहे.

कोट-

मला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झालो. आठ दिवसात तब्बल १ लाख ७० हजार रुपये बिल भरून घेतले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली.

- सर्जेराव कवडे (आवळी बुद्रुक)