शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग: कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या खात्यात रस्ता भूसंपादनाचे ५४४ कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 13:15 IST

परिसरातील १२ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या अंदाजे साडेतीनशे हेक्टर जमिनी संपादन केल्या जाणार

कोल्हापूर : नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात येत असलेल्या चोकाक ते आंबा टप्प्यातील भूसंपादनासाठी आतापर्यंत ५४४ कोटी ६१ लाख इतक्या नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत वाटप झालेल्या रकमेची टक्केवारी ४५.१३ असून, जिल्हा भूसंपादन विभागाच्यावतीने युद्धपातळीवर नुकसानभरपाई वाटपाचे काम सुरू आहे. ते अधिक जलदगतीने व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची विभागात नियुक्ती केली आहे. परिसरातील १२ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या अंदाजे साडेतीनशे हेक्टर जमिनी संपादन केल्या जाणार आहेत.नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातील कोल्हापूर जिल्ह्यातील लांबी ७८ किलोमीटर असून, त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते आंबा येथील भूसंपादन करण्यात येत आहे. त्यात बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने १२०६.७२ कोटी रुपये भूसंपादन विभागाला वर्ग केले आहेत. त्यापैकी ५४४ कोटी ६१ लाख वाटप विभागाने पूर्ण केले आहे.

यात मूळ निवाडे ४९ व अतिरिक्त निवाडे ६९ असे एकूण ११८ निवाडे पूर्ण झाले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, त्यासाठी आता गावनिहाय शिबिरे घेण्यात येत आहेत. यापूर्वी झालेल्या शिबिरात ५५० अर्ज आले होते. तपासणी पूर्ण करून त्यांना मोबदला वाटप सुरू झाले आहे. ज्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आहे ते अर्ज पुन्हा तलाठ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात गावनिहाय शिबिर ठेवण्यात आले आहे.

तालुकानिहाय बाधित गावांची यादीतालुका : गावशाहुवाडी : २५पन्हाळा : १०करवीर : ८हातकणंगले : ६एकूण : ४९ गावे

१० कोटी न्यायालयात जमाकाही शेतकऱ्यांच्या जमिनींचे न्यायालयीन वाद सुरू आहे. या वादाच्या प्रकरणातील १० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यात येत आहेत.

तक्रारीत अडकले १५० कोटीजमिनीच्याबाबतीत अनेक शेतकऱ्यांचे कौटूंबिक वाद आहेत. एकाच जागेवर अनेकांचा दावा आहे. अशी तक्रारीतील प्रकरणे सध्या बाजूला ठेवली जात आहेत. चार तालुक्यांपैकी हातकणंगले येथील ३८ कोटी करवीर मधील ४५ कोटी रुपये तक्रारीत अडकली आहेत. आणखी दोन तालुक्यांच्या तक्रारी काढण्याचे काम सुरू असून ही रक्कम जवळपास १५० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले प्रकरण दाखल करून नुकसान भरपाई घ्यावी. व महामार्ग पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. - शक्ती कदम, उपजिल्हाधिकारी भूसंपादन कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्गFarmerशेतकरी