शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग: कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या खात्यात रस्ता भूसंपादनाचे ५४४ कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 13:15 IST

परिसरातील १२ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या अंदाजे साडेतीनशे हेक्टर जमिनी संपादन केल्या जाणार

कोल्हापूर : नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात येत असलेल्या चोकाक ते आंबा टप्प्यातील भूसंपादनासाठी आतापर्यंत ५४४ कोटी ६१ लाख इतक्या नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत वाटप झालेल्या रकमेची टक्केवारी ४५.१३ असून, जिल्हा भूसंपादन विभागाच्यावतीने युद्धपातळीवर नुकसानभरपाई वाटपाचे काम सुरू आहे. ते अधिक जलदगतीने व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची विभागात नियुक्ती केली आहे. परिसरातील १२ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या अंदाजे साडेतीनशे हेक्टर जमिनी संपादन केल्या जाणार आहेत.नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातील कोल्हापूर जिल्ह्यातील लांबी ७८ किलोमीटर असून, त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते आंबा येथील भूसंपादन करण्यात येत आहे. त्यात बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने १२०६.७२ कोटी रुपये भूसंपादन विभागाला वर्ग केले आहेत. त्यापैकी ५४४ कोटी ६१ लाख वाटप विभागाने पूर्ण केले आहे.

यात मूळ निवाडे ४९ व अतिरिक्त निवाडे ६९ असे एकूण ११८ निवाडे पूर्ण झाले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, त्यासाठी आता गावनिहाय शिबिरे घेण्यात येत आहेत. यापूर्वी झालेल्या शिबिरात ५५० अर्ज आले होते. तपासणी पूर्ण करून त्यांना मोबदला वाटप सुरू झाले आहे. ज्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आहे ते अर्ज पुन्हा तलाठ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात गावनिहाय शिबिर ठेवण्यात आले आहे.

तालुकानिहाय बाधित गावांची यादीतालुका : गावशाहुवाडी : २५पन्हाळा : १०करवीर : ८हातकणंगले : ६एकूण : ४९ गावे

१० कोटी न्यायालयात जमाकाही शेतकऱ्यांच्या जमिनींचे न्यायालयीन वाद सुरू आहे. या वादाच्या प्रकरणातील १० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यात येत आहेत.

तक्रारीत अडकले १५० कोटीजमिनीच्याबाबतीत अनेक शेतकऱ्यांचे कौटूंबिक वाद आहेत. एकाच जागेवर अनेकांचा दावा आहे. अशी तक्रारीतील प्रकरणे सध्या बाजूला ठेवली जात आहेत. चार तालुक्यांपैकी हातकणंगले येथील ३८ कोटी करवीर मधील ४५ कोटी रुपये तक्रारीत अडकली आहेत. आणखी दोन तालुक्यांच्या तक्रारी काढण्याचे काम सुरू असून ही रक्कम जवळपास १५० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले प्रकरण दाखल करून नुकसान भरपाई घ्यावी. व महामार्ग पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. - शक्ती कदम, उपजिल्हाधिकारी भूसंपादन कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्गFarmerशेतकरी