शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग: कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या खात्यात रस्ता भूसंपादनाचे ५४४ कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 13:15 IST

परिसरातील १२ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या अंदाजे साडेतीनशे हेक्टर जमिनी संपादन केल्या जाणार

कोल्हापूर : नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात येत असलेल्या चोकाक ते आंबा टप्प्यातील भूसंपादनासाठी आतापर्यंत ५४४ कोटी ६१ लाख इतक्या नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत वाटप झालेल्या रकमेची टक्केवारी ४५.१३ असून, जिल्हा भूसंपादन विभागाच्यावतीने युद्धपातळीवर नुकसानभरपाई वाटपाचे काम सुरू आहे. ते अधिक जलदगतीने व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची विभागात नियुक्ती केली आहे. परिसरातील १२ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या अंदाजे साडेतीनशे हेक्टर जमिनी संपादन केल्या जाणार आहेत.नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातील कोल्हापूर जिल्ह्यातील लांबी ७८ किलोमीटर असून, त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते आंबा येथील भूसंपादन करण्यात येत आहे. त्यात बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने १२०६.७२ कोटी रुपये भूसंपादन विभागाला वर्ग केले आहेत. त्यापैकी ५४४ कोटी ६१ लाख वाटप विभागाने पूर्ण केले आहे.

यात मूळ निवाडे ४९ व अतिरिक्त निवाडे ६९ असे एकूण ११८ निवाडे पूर्ण झाले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, त्यासाठी आता गावनिहाय शिबिरे घेण्यात येत आहेत. यापूर्वी झालेल्या शिबिरात ५५० अर्ज आले होते. तपासणी पूर्ण करून त्यांना मोबदला वाटप सुरू झाले आहे. ज्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आहे ते अर्ज पुन्हा तलाठ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात गावनिहाय शिबिर ठेवण्यात आले आहे.

तालुकानिहाय बाधित गावांची यादीतालुका : गावशाहुवाडी : २५पन्हाळा : १०करवीर : ८हातकणंगले : ६एकूण : ४९ गावे

१० कोटी न्यायालयात जमाकाही शेतकऱ्यांच्या जमिनींचे न्यायालयीन वाद सुरू आहे. या वादाच्या प्रकरणातील १० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यात येत आहेत.

तक्रारीत अडकले १५० कोटीजमिनीच्याबाबतीत अनेक शेतकऱ्यांचे कौटूंबिक वाद आहेत. एकाच जागेवर अनेकांचा दावा आहे. अशी तक्रारीतील प्रकरणे सध्या बाजूला ठेवली जात आहेत. चार तालुक्यांपैकी हातकणंगले येथील ३८ कोटी करवीर मधील ४५ कोटी रुपये तक्रारीत अडकली आहेत. आणखी दोन तालुक्यांच्या तक्रारी काढण्याचे काम सुरू असून ही रक्कम जवळपास १५० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले प्रकरण दाखल करून नुकसान भरपाई घ्यावी. व महामार्ग पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. - शक्ती कदम, उपजिल्हाधिकारी भूसंपादन कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्गFarmerशेतकरी