शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
3
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
4
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
5
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
6
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
7
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
8
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
9
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
10
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
11
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
12
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
13
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
14
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
15
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
16
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
17
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
18
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
19
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
20
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-रत्नागिरी महामार्ग पूरबाधित क्षेत्रातून नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : प्रस्तावित नागपूर-रत्नागिरी महामार्ग हा शिये (ता. करवीर) येथील पूरबाधित क्षेत्रातून जात आहे. येथे भराव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : प्रस्तावित नागपूर-रत्नागिरी महामार्ग हा शिये (ता. करवीर) येथील पूरबाधित क्षेत्रातून जात आहे. येथे भराव टाकून रस्ता झाल्यास पुराचा फटका करवीर तालुक्यासह कोल्हापूर शहराला बसणार आहे. यासाठी सध्याच्या राज्य मार्गाचे रुंदीकरण करून महामार्ग करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. याबाबत गावकऱ्यांच्या वतीने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ॲड. शिंदे म्हणाले, महामार्गाचा नकाशा राजकीय हस्तक्षेपामुळे दोन वेळा बदलण्यात आला. राजकीय मंडळींचा चार-आठ घरे वाचविण्यासाठी शिये परिसरातील शेतकऱ्यांची ९० एकर जमिनी गिळंकृत करण्याचा डाव आहे. या रस्त्याच्या रेखांकनास आम्ही विरोध केला. मात्र पोलीस बळाचा वापर करून तो मोडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेतच, त्याशिवाय रेखांकित भागात दहा फूट पुराचे पाणी होते. त्यामुळे महामार्ग करताना येथे मोठ्या प्रमाणात मुरूम टाकला जाणार असल्याने पाण्याच्या तुंबीने करवीर तालुक्यातील अनेक गावांसह कोल्हापूर शहर पाण्याखाली जाणार आहे. हा महामार्ग सांगलीतून इस्लामपूर, शिराळा, मलकापूर असा करावा अथवा हातकणंगले, वाठार, वारणा, बोरपाडळे हा मार्गही योग्य आहे. या मार्गासाठी कोणाचीही हरकत नसताना शियेतूनच महामार्ग काढण्याचा अट्टहास कोणाचा, या रस्त्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती घेतल्या होत्या. मात्र, त्याची दखलही घेतली नाही. आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत असून तरीही रस्ता सुुरू केला तर मुरमाच्या ट्रकखाली आडवे होऊ, असा इशारा ॲड. शिंदे यांनी दिला. यावेळी राजेश नाईक, परशराम शिंदे, कृष्णात खुटाळे, उत्तम पाटील, मानसिंग पाटील, निखिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.