शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

महापालिका निवडणूक : सत्ताधारी तिन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 15:18 IST

विश्वास पाटील कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असली, तरी ही निवडणूक मुदतीत होणार ...

ठळक मुद्देमहापालिका निवडणूक : सत्ताधारी तिन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याची चिन्हेभाजप-ताराराणीशी होणार झुंज

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असली, तरी ही निवडणूक मुदतीत होणार का हीच मुख्य संभ्रमावस्था आहे. परंतु, तरीही राजकीय पातळीवर हालचाली सुुरू झाल्या आहेत. निवडणुकीचे संभाव्य चित्र पाहता राज्यातील सत्ताधारी तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविण्याचीच शक्यता जास्त आहे. भाजप-ताराराणी आघाडी त्यांच्या विरोधात सध्यातरी रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. हेच चित्र कायम राहिल्यास किमान चौरंगी लढत होऊ शकते.दोन्ही काँग्रेससह शिवसेनाही सध्या राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून कारभार करत आहे. गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या राजकारणातही हे तिन्ही पक्ष एकत्र होते. मागच्या (२०१५)च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना सत्तेत असतानाही त्यावेळी भाजपचा काटा काढायचा म्हणून शिवसेनेने भाजपची पाठराखण केली नाही.

सत्ताधारी पक्ष असल्याने मुख्यत: दोन्ही काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या जास्त राहील. त्या सर्वांना संधी द्यायची आणि प्रभाग पातळीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी करायची म्हणून हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढू शकतात. त्यातून कार्यकर्त्याला संधी मिळते व आघाडी केल्यास आपल्याच पक्षाचा ताकदीचा उमेदवार विरोधी आघाडीला मिळू शकतो हा धोका टाळता येतो. त्यामुळे गेल्या निवडणुकीतही दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढल्या आणि निवडणूक झाल्यावर ते एकत्र आले. शिवेसनाही स्वतंत्रच लढली होती.आताही पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. तसा कोणताही समन्वय शिवसेनेच्या जिल्हा पातळीवर कोणत्याच नेत्याशी या दोघांचा नाही. गेल्या निवडणुकीत त्या पक्षाला कशाबशा चारच जागा मिळाल्या. त्यातील काही तर उमेदवाराच्या स्वत:च्या करिष्म्यावर मिळाल्या. विधानसभेला शिवसेनेचा पराभव झाला असला तरी निवडणुकीची सूत्रे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडेच राहतील असे चित्र आहे. पक्षांतर्गत बेदिली जास्त असल्याने शिवसेनेला सोबत घेण्यात अडचणीच जास्त आहेत.गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे तगड्या उमेदवारांची फळी होती. त्यामुळे भाजप-ताराराणी आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होईल असा सर्वांचाच आणि त्यातही भाजप-ताराराणीच्या नेत्यांचा होरा होता. त्यांनी काँग्रेस व त्यातही तत्कालीन माजी आमदार सतेज पाटील यांना बेरजेतच धरले नाही. त्यांचा विधानसभेला कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात पराभव झाला होता.

त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांत काहीशी सहानुभूती होती आणि भाजपने व त्यातही महाडिक गटाने राष्ट्रवादी पुढच्या राजकारणात आपली डोकेदुखी ठरू नये यासाठी सगळी ताकद त्या पक्षाच्या प्रबळ उमेदवारांच्या विरोधात लावली. त्यात काँग्रेसकडे कुणाचे लक्षच गेले नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की, काँग्रेसला सर्वांत जास्त जागा मिळाल्या. राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. त्याचा फटका पुढे माजी खासदार धनंजय महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत बसला.हसन मुश्रीफ-सतेज पाटील केंद्रस्थानीराज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामध्ये हसन मुश्रीफ व सतेज पाटील हे मंत्री असल्याने ही निवडणूक त्यांच्याभोवतीच केंद्रिभूत होणार आहे. गेल्या निवडणुकीत सत्ता नसताना त्यांनी महापालिकेवरील वर्चस्व कायम राखले होते. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी हे संख्याबळ निर्णायक ठरत असल्याने पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ हे जोडण्या लावण्यात पुढे असतील.राजकारण असेही..दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढल्या तरी त्या पक्षांच्या नेत्यांमध्ये चांगले अंडरस्टँडिंग असते. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या उमेदवारास चांगले पाठबळ मिळत आहे हे पाहून सगळी ताकद त्याच्यामागे लावली जाते. ज्या भागात विरोधी उमेदवारास चांगली मते मिळू शकतात, त्याच भागात ताकदीचा उमेदवार देऊन त्याची रसद तोडण्यासाठी म्हणूनही स्वतंत्र लढणे पथ्यावर पडते.महाडिकच केंद्रस्थानीगेल्या निवडणुकीत प्रत्येकी ४० जागा लढवून ताराराणीला २० आणि भाजपला १३ जागा मिळाल्या. त्यावेळी भाजप एकदम फॉर्मात होता. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सगळी ताकद उमेदवारांच्या पाठीशी असूनही भाजपला मर्यादित यश मिळाले. त्यामुळे यावेळेला भाजपपेक्षा ताराराणीकडे उमेदवारीसाठी जास्त गर्दी होऊ शकते. ताराराणीच्या पाठीशी महाडिक गटाचे नेटवर्क असते. त्याचा त्यांना फायदा होतो. माजी खासदार धनंजय महाडिक हे भाजपमध्ये असल्याने त्या पक्षातील वजन वाढविण्यासाठी त्या पक्षाला चांगले यश मिळवून देण्याचा दबाव त्यांच्यावर राहील.निवडणूक होणार का याबाबतच संभ्रमनिवडणुकीची प्राथमिक तयारी अजून म्हणावी तशी झालेली नाही. महापालिकेने पत्र पाठविले म्हणून आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीवेळी १ जुलैला प्रभाग रचना तयार झाली होती. ३१ ऑक्टोबरला निवडणूक लागायची असेल तर ३१ ऑगस्टला आचारसंहिता लागायला हवी. कोरोनाच्या सोबतीला कोल्हापुरात महापुराचाही धोका असतो. गेल्या वर्षी महापालिकेची सगळी यंत्रणा त्यास राबली होती. यंदा पूर किती येणार हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे त्याचा विचार करता निवडणुका वेळेत होणार का याबाबतच संभ्रम आहे.

भाजप व ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांची लवकरच बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भातील रणनीती निश्चित केली जाईल. निवडणूक एकत्रच लढण्याचा प्रयत्न राहील.स्वरूप महाडिक

प्रमुख ताराराणी आघाडी

सध्याचे बलाबल

  • काँग्रेस : २७
  • राष्ट्रवादी : १५
  • ताराराणी आघाडी : १९
  • भाजप : १३
  • शिवसेना : ०४
  • अपक्ष : ०३(त्यातील दोघांचा काँग्रेसला व एकाचा ताराराणी आघाडीस पाठिंबा)
टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाPoliticsराजकारणkolhapurकोल्हापूर